शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

पाच लाख क्विंटल तुरीचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:49 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांना १८ एप्रिलची डेडलाईन : पाच दिवस हाती, ३९ हजार शेतकऱ्यांची खरेदी बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश सरव्यवस्थापकांनी सर्व ‘डीएमओं’ना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ६१,९२७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात २३,०१७ शेतकऱ्यांची ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे. यंदाच्या हंगामात साधारणपणे १ लाख १० हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १३.५० क्विंटल जाहीर केली.शनिवारी ८६१ क्विंटल तूर खरेदीजिल्ह्यात यंदा १४.८५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या घरात किमान पाच लाख क्विंटल तूर पडून आहे. आता तूर खरेदीला पाचच दिवस बाकी आहे. जिल्ह्यात सध्या गोडाऊनचा अभाव असल्याने तूर खरेदी मंदावली आहे. ७ तारखेला आठ केंद्रांवरील तूर खरेदी निरंक आहे. उर्वरित चार केंद्रांवर फक्त ८६१ क्विंटल खरेदी करण्यात आली.जिल्ह्यातील बाराही केंद्रावर तूर खरेदीच्या नावावर निव्वळ टाईमपास सुरू आहे. गतवर्षी दरदिवशी १५ ते २० हजार क्विंटल खरेदी होत असताना यंदा मात्र केविलवानी स्थिती निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसांत किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी करणे अशक्य असल्याने या तुरीच्या घुगऱ्या कराव्यात काय, असा शेतकºयांना संतप्त सवाल आहे.अशी आहे केंद्रनिहाय खरेदीच्अचलपूर केंद्रावर ३२,५५५, अमरावती ५२,७३५, अंजनगाव सुर्जी १९,९२१, चांदूरबाजार २९,०८२, चांदूर रेल्वे २९,२६२, दर्यापूर ५६८७५, धारणी ७,०१२, नांदगाव खंडेश्वर १७,४३२, तिवसा १७,९९६ ,धामणगाव २४,९९०, मोर्शी ३७,१०२ व वरुड तालुक्यात ३४,१७३ क्विंटल खरेदी करण्यात आली.तूर साठवणुकीसाठी गोदामांची कमतरता आहे, तर हरभरा खरेदीबाबत ग्रेडर कमी आहेत. आता ग्रेडर उपलब्ध होतील व बुटीबोरीचे गोदामदेखील उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी अधिकाधिक तूर खरेदीचा प्रयत्न राहील.- रमेश पाटील, डीएमओ