शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पाच लाख क्विंटल तुरीचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:49 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांना १८ एप्रिलची डेडलाईन : पाच दिवस हाती, ३९ हजार शेतकऱ्यांची खरेदी बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश सरव्यवस्थापकांनी सर्व ‘डीएमओं’ना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ६१,९२७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात २३,०१७ शेतकऱ्यांची ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे. यंदाच्या हंगामात साधारणपणे १ लाख १० हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १३.५० क्विंटल जाहीर केली.शनिवारी ८६१ क्विंटल तूर खरेदीजिल्ह्यात यंदा १४.८५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या घरात किमान पाच लाख क्विंटल तूर पडून आहे. आता तूर खरेदीला पाचच दिवस बाकी आहे. जिल्ह्यात सध्या गोडाऊनचा अभाव असल्याने तूर खरेदी मंदावली आहे. ७ तारखेला आठ केंद्रांवरील तूर खरेदी निरंक आहे. उर्वरित चार केंद्रांवर फक्त ८६१ क्विंटल खरेदी करण्यात आली.जिल्ह्यातील बाराही केंद्रावर तूर खरेदीच्या नावावर निव्वळ टाईमपास सुरू आहे. गतवर्षी दरदिवशी १५ ते २० हजार क्विंटल खरेदी होत असताना यंदा मात्र केविलवानी स्थिती निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसांत किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी करणे अशक्य असल्याने या तुरीच्या घुगऱ्या कराव्यात काय, असा शेतकºयांना संतप्त सवाल आहे.अशी आहे केंद्रनिहाय खरेदीच्अचलपूर केंद्रावर ३२,५५५, अमरावती ५२,७३५, अंजनगाव सुर्जी १९,९२१, चांदूरबाजार २९,०८२, चांदूर रेल्वे २९,२६२, दर्यापूर ५६८७५, धारणी ७,०१२, नांदगाव खंडेश्वर १७,४३२, तिवसा १७,९९६ ,धामणगाव २४,९९०, मोर्शी ३७,१०२ व वरुड तालुक्यात ३४,१७३ क्विंटल खरेदी करण्यात आली.तूर साठवणुकीसाठी गोदामांची कमतरता आहे, तर हरभरा खरेदीबाबत ग्रेडर कमी आहेत. आता ग्रेडर उपलब्ध होतील व बुटीबोरीचे गोदामदेखील उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी अधिकाधिक तूर खरेदीचा प्रयत्न राहील.- रमेश पाटील, डीएमओ