शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

साडेपाच कोटींचे नियोजन मंत्रालयात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:26 IST

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या सुमारे ५ कोटी ५० लाखांच्या नियोजनाचे ७ डिसेंबर व १७ फेब्रुवारीच्या सभेतील ठराव क्र. ८ आणि २४ विभागीय आयुक्तांनी योग्य असल्याचा निर्णय दिला.

ठळक मुद्देविरोधकांच्या हालचाली : सत्ताधारी कामे मार्गी लावण्याच्या तयारीत

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या सुमारे ५ कोटी ५० लाखांच्या नियोजनाचे ७ डिसेंबर व १७ फेब्रुवारीच्या सभेतील ठराव क्र. ८ आणि २४ विभागीय आयुक्तांनी योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी विकासकामे मार्गी लावण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी वरील दोन्ही ठरावांना स्थगीती देवून या प्रकरणाची चौकशीसाठी ग्रामविकास मंत्र्याच्या दरबारात जाण्याची तयारी चालविली आहे.. सत्ताधारी पक्षाने केलेल्या सुमारे ५ कोटी ५० लाखांच्या नियोजनाविरोधात विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांच्यासह ९ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी संपूर्ण पडताळणी करून ९ मार्च रोजी अंतिम निर्णय दिला.सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात निधी जमा न करता अध्यक्षांनी परस्पर २५१५-१०१-२७ लोकपयोगी व लहान कामे या योजनेवर ३ कोटी५० लाख खर्चाकरिता वळती केल्याचा ठराव मंजूर केल्याचा आरोप विरोधकांचा होता. योजना शासन अधिनियम १९६१ च्या कलम १०० अंतर्गत नसल्याने ठराव रद्द करावा स्वउत्पन्न व वाढीव उपकराचे सन २०१६-१७ अखेर शिल्लक निधी २ कोटी व झेडपी गुंतवणुकीमधून व्याजाव्दारे प्राप्त निधीचे ३ कोटी ५० लाख असे एकूण ५ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीवर आक्षेप होता. यावर तपशिलवार अहवाल वित्त विभागाने सादर केला. हा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने नियमसंगत असल्याचे नमूद केले होते. त्याआधारे पडताळणीनंतर साडेपाच कोटींच्या नियोजनाचा ठराव योग्य असून ते रद्द करणे उचित होणार नाही, असे स्पष्ट केले. या निर्णयाचे सत्ताधारी पक्षाने स्वागत केले आहे. मात्र विरोधकांनी असमाधान व्यक्त करीत आता यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयात स्थगीती व चौकशी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.कामांची प्रशासकीय कारवाई सुरूसत्तापक्षाने साडेपाच कोटीचे नियोजन केले आहे. यामधील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय कारवाई सुरू आहे. आता तर विभागीय आयुक्ताकडूृन ठराव योग्य असल्याचा निर्वाळा आला आहे. त्यानुसार सध्या यामधून विकास कामांच्या नियोजनावर प्रशासकीय सोपस्कार व निविदा प्रक्रियेची कारवाई होताच लवकरच ही कामे सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी सांगितले.