शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

साडेपाच कोटींचे नियोजन मंत्रालयात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:26 IST

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या सुमारे ५ कोटी ५० लाखांच्या नियोजनाचे ७ डिसेंबर व १७ फेब्रुवारीच्या सभेतील ठराव क्र. ८ आणि २४ विभागीय आयुक्तांनी योग्य असल्याचा निर्णय दिला.

ठळक मुद्देविरोधकांच्या हालचाली : सत्ताधारी कामे मार्गी लावण्याच्या तयारीत

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या सुमारे ५ कोटी ५० लाखांच्या नियोजनाचे ७ डिसेंबर व १७ फेब्रुवारीच्या सभेतील ठराव क्र. ८ आणि २४ विभागीय आयुक्तांनी योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी विकासकामे मार्गी लावण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी वरील दोन्ही ठरावांना स्थगीती देवून या प्रकरणाची चौकशीसाठी ग्रामविकास मंत्र्याच्या दरबारात जाण्याची तयारी चालविली आहे.. सत्ताधारी पक्षाने केलेल्या सुमारे ५ कोटी ५० लाखांच्या नियोजनाविरोधात विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांच्यासह ९ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी संपूर्ण पडताळणी करून ९ मार्च रोजी अंतिम निर्णय दिला.सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात निधी जमा न करता अध्यक्षांनी परस्पर २५१५-१०१-२७ लोकपयोगी व लहान कामे या योजनेवर ३ कोटी५० लाख खर्चाकरिता वळती केल्याचा ठराव मंजूर केल्याचा आरोप विरोधकांचा होता. योजना शासन अधिनियम १९६१ च्या कलम १०० अंतर्गत नसल्याने ठराव रद्द करावा स्वउत्पन्न व वाढीव उपकराचे सन २०१६-१७ अखेर शिल्लक निधी २ कोटी व झेडपी गुंतवणुकीमधून व्याजाव्दारे प्राप्त निधीचे ३ कोटी ५० लाख असे एकूण ५ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीवर आक्षेप होता. यावर तपशिलवार अहवाल वित्त विभागाने सादर केला. हा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने नियमसंगत असल्याचे नमूद केले होते. त्याआधारे पडताळणीनंतर साडेपाच कोटींच्या नियोजनाचा ठराव योग्य असून ते रद्द करणे उचित होणार नाही, असे स्पष्ट केले. या निर्णयाचे सत्ताधारी पक्षाने स्वागत केले आहे. मात्र विरोधकांनी असमाधान व्यक्त करीत आता यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयात स्थगीती व चौकशी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.कामांची प्रशासकीय कारवाई सुरूसत्तापक्षाने साडेपाच कोटीचे नियोजन केले आहे. यामधील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय कारवाई सुरू आहे. आता तर विभागीय आयुक्ताकडूृन ठराव योग्य असल्याचा निर्वाळा आला आहे. त्यानुसार सध्या यामधून विकास कामांच्या नियोजनावर प्रशासकीय सोपस्कार व निविदा प्रक्रियेची कारवाई होताच लवकरच ही कामे सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी सांगितले.