शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारात आदिवासी जखमी; मेळघाटात संघर्ष चिघळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 06:15 IST

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला

चिखलदरा/धारणी (अमरावती) : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला असून, बुधवारी वन संरक्षकांनी केलेला गोळीबार व मारहाणीत २५ ते ३० आदिवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमोना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेलपानीसह आठ पुनर्वसित गावांमधील आदिवासींनी जंगलातील त्यांच्या मूळगावी आठवडाभरापूर्वी बस्तान मांडले. त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. वनाधिकारी व आदिवासी यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने मंगळवारी सशस्त्र संघर्ष झाला. त्यामुळे येथील जंगलात लावण्यात आलेली आग धगधगत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.चिखलदरा तालुक्यातील तेलपाणी या आदिवासीे गावातील नागरिकांचे अकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत. मोबदल्यातील शेती आणि पूर्ण आर्थिक साहाय्य अदिवासींना मिळालेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास विभागीय वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेलपानी येथील आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी बधले नाहीत. त्यामुळे गोळीबार करण्यात आला. त्यात चंपालाल लाभू बेठेकर यांच्यासह काही आदिवासी जखमी झाले. जखमी चंपालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनखात्याचे कर्मचारी आदिवासींवर जबरदस्ती करत आहेत. आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलास आग लावण्यात आली असून साहित्याची नासधूस करण्यात आली आहे. आदिवासी युवकांच्या १० दुचाकी पेटविल्या, तर २० दुचाकी जप्त केल्या. लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.चर्चेतून तोडगा निघाला नाहीपुनर्वसनस्थळी आदिवासींनी परत जावे, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना संबंधित गावांमध्ये पाठविले आहे. पटेल यांच्या सोबतीला उपविभागीय अधिकारी आणि पोलीसांचा ताफा आहे. पटेल यांनी अमोना कासोद येथील आदिवासींशी चर्चा केली, पण चर्चेतून कुठलाही तोडगा निघाला नाही.अनेक कुटूंब परांगदा!आदिवासी ग्रामस्थ वनखात्याच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. दहशतीमुळे मुले, महिला व वृद्ध असे एकूण २० पेक्षा अधिक आदिवासी बेपत्ता झालेत. त्यांची माहिती अद्यापही मिळालेली नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये सोमठाणा येथील पसरराम दादू कासदेकर, त्यांच्या पत्नी व एक वर्षाचा मुलगा, बालकराम शंकर बेठेकर, पत्नी व मुलगा, मोती सानू कासदेकर, धारगड येथील बापूराव मान्सू सावलकर, सुरेंद्र हिरालाल कासदेकर, हिरा मावसकर, तेलपानी येथील हिराय फालतू कासदेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी चंपालाल बेठेकर यांना अमोना कासोद येथे आणण्यात आले. मारहाणीत २५ ते ३० आदिवासी महिला-पुरुष जखमी झाले आहेत. त्यांनाही अमोना येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Firingगोळीबार