शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारात आदिवासी जखमी; मेळघाटात संघर्ष चिघळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 06:15 IST

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला

चिखलदरा/धारणी (अमरावती) : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला असून, बुधवारी वन संरक्षकांनी केलेला गोळीबार व मारहाणीत २५ ते ३० आदिवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमोना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेलपानीसह आठ पुनर्वसित गावांमधील आदिवासींनी जंगलातील त्यांच्या मूळगावी आठवडाभरापूर्वी बस्तान मांडले. त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. वनाधिकारी व आदिवासी यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने मंगळवारी सशस्त्र संघर्ष झाला. त्यामुळे येथील जंगलात लावण्यात आलेली आग धगधगत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.चिखलदरा तालुक्यातील तेलपाणी या आदिवासीे गावातील नागरिकांचे अकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत. मोबदल्यातील शेती आणि पूर्ण आर्थिक साहाय्य अदिवासींना मिळालेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास विभागीय वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेलपानी येथील आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी बधले नाहीत. त्यामुळे गोळीबार करण्यात आला. त्यात चंपालाल लाभू बेठेकर यांच्यासह काही आदिवासी जखमी झाले. जखमी चंपालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनखात्याचे कर्मचारी आदिवासींवर जबरदस्ती करत आहेत. आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलास आग लावण्यात आली असून साहित्याची नासधूस करण्यात आली आहे. आदिवासी युवकांच्या १० दुचाकी पेटविल्या, तर २० दुचाकी जप्त केल्या. लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.चर्चेतून तोडगा निघाला नाहीपुनर्वसनस्थळी आदिवासींनी परत जावे, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना संबंधित गावांमध्ये पाठविले आहे. पटेल यांच्या सोबतीला उपविभागीय अधिकारी आणि पोलीसांचा ताफा आहे. पटेल यांनी अमोना कासोद येथील आदिवासींशी चर्चा केली, पण चर्चेतून कुठलाही तोडगा निघाला नाही.अनेक कुटूंब परांगदा!आदिवासी ग्रामस्थ वनखात्याच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. दहशतीमुळे मुले, महिला व वृद्ध असे एकूण २० पेक्षा अधिक आदिवासी बेपत्ता झालेत. त्यांची माहिती अद्यापही मिळालेली नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये सोमठाणा येथील पसरराम दादू कासदेकर, त्यांच्या पत्नी व एक वर्षाचा मुलगा, बालकराम शंकर बेठेकर, पत्नी व मुलगा, मोती सानू कासदेकर, धारगड येथील बापूराव मान्सू सावलकर, सुरेंद्र हिरालाल कासदेकर, हिरा मावसकर, तेलपानी येथील हिराय फालतू कासदेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी चंपालाल बेठेकर यांना अमोना कासोद येथे आणण्यात आले. मारहाणीत २५ ते ३० आदिवासी महिला-पुरुष जखमी झाले आहेत. त्यांनाही अमोना येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Firingगोळीबार