शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गोळीबारात आदिवासी जखमी; मेळघाटात संघर्ष चिघळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 06:15 IST

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला

चिखलदरा/धारणी (अमरावती) : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला असून, बुधवारी वन संरक्षकांनी केलेला गोळीबार व मारहाणीत २५ ते ३० आदिवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमोना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेलपानीसह आठ पुनर्वसित गावांमधील आदिवासींनी जंगलातील त्यांच्या मूळगावी आठवडाभरापूर्वी बस्तान मांडले. त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. वनाधिकारी व आदिवासी यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने मंगळवारी सशस्त्र संघर्ष झाला. त्यामुळे येथील जंगलात लावण्यात आलेली आग धगधगत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.चिखलदरा तालुक्यातील तेलपाणी या आदिवासीे गावातील नागरिकांचे अकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत. मोबदल्यातील शेती आणि पूर्ण आर्थिक साहाय्य अदिवासींना मिळालेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास विभागीय वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेलपानी येथील आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी बधले नाहीत. त्यामुळे गोळीबार करण्यात आला. त्यात चंपालाल लाभू बेठेकर यांच्यासह काही आदिवासी जखमी झाले. जखमी चंपालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनखात्याचे कर्मचारी आदिवासींवर जबरदस्ती करत आहेत. आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलास आग लावण्यात आली असून साहित्याची नासधूस करण्यात आली आहे. आदिवासी युवकांच्या १० दुचाकी पेटविल्या, तर २० दुचाकी जप्त केल्या. लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.चर्चेतून तोडगा निघाला नाहीपुनर्वसनस्थळी आदिवासींनी परत जावे, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना संबंधित गावांमध्ये पाठविले आहे. पटेल यांच्या सोबतीला उपविभागीय अधिकारी आणि पोलीसांचा ताफा आहे. पटेल यांनी अमोना कासोद येथील आदिवासींशी चर्चा केली, पण चर्चेतून कुठलाही तोडगा निघाला नाही.अनेक कुटूंब परांगदा!आदिवासी ग्रामस्थ वनखात्याच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. दहशतीमुळे मुले, महिला व वृद्ध असे एकूण २० पेक्षा अधिक आदिवासी बेपत्ता झालेत. त्यांची माहिती अद्यापही मिळालेली नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये सोमठाणा येथील पसरराम दादू कासदेकर, त्यांच्या पत्नी व एक वर्षाचा मुलगा, बालकराम शंकर बेठेकर, पत्नी व मुलगा, मोती सानू कासदेकर, धारगड येथील बापूराव मान्सू सावलकर, सुरेंद्र हिरालाल कासदेकर, हिरा मावसकर, तेलपानी येथील हिराय फालतू कासदेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी चंपालाल बेठेकर यांना अमोना कासोद येथे आणण्यात आले. मारहाणीत २५ ते ३० आदिवासी महिला-पुरुष जखमी झाले आहेत. त्यांनाही अमोना येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Firingगोळीबार