शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच रिंगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:04 IST

बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी रिंगण सोहळा रंगला. पंचक्रोशीतील पालखी दिंडीसह हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झालेत.

ठळक मुद्देमाऊलींच्या अश्वाचे आकर्षण : सोहळ्यासाठी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी

सुमित हरकुट ।आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी रिंगण सोहळा रंगला. पंचक्रोशीतील पालखी दिंडीसह हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झालेत. रिंगणात अग्रस्थानाचा मान असणारे माऊलींचे अश्व पाहण्यासाठी व दिंडी सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थित होती. ६० हजार वारकºयांच्या टाळमृदंगाच्या गजराने बहिरमच्या आसंमतात निनादत होता.नवसाला पावणारा म्हणून बहिमरमबुवाची ख्याती आहे. याच श्रद्धेतून नवस फेडण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक बहिरामबुवाच्या चरणी नतमस्तक होतात. यंदा आळंदी येथील संजय आलोने महाराज यांच्या वाणीतून संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन बहिरम यात्रेमध्ये करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रबोधन करणार आहेत. चांदूर बाजार तालुक्यातील १५ वारकरी दिंड्यांनी हजेरी दर्शविली. यामध्ये भक्तीधाम चांदूर बाजार येथील पालकी तसेच प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या पादुका पालखीत बहिरमपर्यंत आणण्यात आल्या.चांदूरबाजार तालुक्यातील आखतवाडा, सर्फापूर, करजगाव, लाखनवाडी, येवता, नायगाव या गावातील वारकरी मंडळी व दिंडी या रिंगण सोहळ्यात उपस्थित होती. या संपूर्ण रिगण सोहळ्याचे छायाचिीत्रकरण अनेकांनी डोळ्यासह मोबाईल, ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून साठविले. अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक काळ म्हणजेच एक महिना चालणारी ही बहिरम यात्रा संत गाडगेबाबांच्या कार्यकाळात प्रसिद्ध झाली आहे.वाहतूक खोळंबलीशिरजगाव कसबाकडून बहिरमकडे येत असताना कारंजा ते बहिरम अशी भरगच्च वाहनांची रांग लागली होती. पार्किंगसाठी एक तास भाविक ट्रॅफिकमध्ये अडकले होते. वाहनांच्या गर्दीतून पादचाºयांना वाट काढताना अडचण निर्माण झाली.रोडग्यांचा घेतला स्वादरविवार हा सुटीचा दिवस असल्याने जिल्ह्यासह विदर्भातील भाविकांनी गर्दी केली होती. रोडगे व हंडीतील मटणाचा आस्वाद घेतला. अनेकांना स्वयंपाक करण्यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने त्यांनी खुल्या आवरात चूल मांडली.रविवारी सुमारे ८० हजार भाविकांनी उपस्थिती लावली. बहिरमकडे येणारे सर्व रास्त्यांवर भाविकांचे लोंढे दिसत होते. बाजारातही चांगलीच गर्दी झालेली होती. खºया अर्थाने यात्रा रंगात आल्याची चर्चा बहिरममध्ये होती.