शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पाच वर्षांत प्रथमच प्रकल्पात साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:34 IST

यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : मध्यम, लघु प्रकल्पांनी वाढविली चिंता

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. ऐन थंडीत जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात सरासरी ६७ टक्के जलसाठा आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेत प्रकल्पामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठा आहे. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक झाल्याने केवळ उर्ध्व वर्धा व पूर्णा प्रकल्पात ७५ टक्कयांपर्यत साठा आहे.जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. सद्यस्थितीत या प्रकल्यात समाधानकारक साठा आहे. मध्यम चार प्रकल्प आहेत. यामध्ये सरासरी ६७ टक्के साठा आहे. यामध्ये जर १० टक्के मृतसाठा व आगामी बाष्पीभवन गृहीत धरल्यास जिल्ह्याची तहान भागविण्यास हा साठा अपुरा ठरणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील किमान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे अश्याव९रळी प्रकल्यातील पाणीसाठा देखील कमी होणार असल्याने जिल्ह्यात पाण्याची चांगलीच टंचाई जानवणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.जलसंपदा विभागाच्या सोमवारच्या अहवालानुसार उर्ध्व वर्र्धा प्रकल्पात ३९७.५५ टिएमसी म्हणजेच ७०.४८ टक्के साठा आहे.परतीच्या पावसाच्या काळात मध्यप्रदेशातून पावसाची आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा व पूर्णा या प्रकल्पात पाण्याची पातली वाढली होती. मात्रशहानूर प्रकल्पात सद्यस्थितित ६२ टक्के, पूर्णा प्रकल्पात ७७.४२ टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ६८.४८ टक्के तर सपन प्रकल्पात २७.८७ टिएमसी म्हणजेच २८.१२ टक्के जलसाठा आहे. या मध्यम प्रकल्पात एकूण ८२.९० टीएमसी साठा व ६७ टक्के साठा आहे. मागील वर्षी या सर्व प्रकल्पात याच तारखेला ८३.०४ टीएमसी, २०१४ मध्ये ९७.३३ टीएमसी, २०१३ मध्ये १११.३१ टीएमसी, तर २०१२ मध्ये ८६.८९ टीएमसी साठा होता. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.लघु प्रकल्पात ४१ टक्केच साठाजिल्ह्यात एकूण ४६ लघुु प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४१. ४७ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये याच तारखेला ६२.६८ टक्के, २०१६ मध्ये ६७.९२ टक्के, २०१५ मध्ये ७६.११ टक्के, २०१३ मध्ये ६९.०५ टक्के, तर २०१२ मध्ये ६७.६६ टक्के साठा शिल्लक होता. यंदा मात्र सरासरीपेक्षा कमी पावसामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी साठा आहे.