शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत प्रथमच प्रकल्पात साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:34 IST

यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : मध्यम, लघु प्रकल्पांनी वाढविली चिंता

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. ऐन थंडीत जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात सरासरी ६७ टक्के जलसाठा आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेत प्रकल्पामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठा आहे. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक झाल्याने केवळ उर्ध्व वर्धा व पूर्णा प्रकल्पात ७५ टक्कयांपर्यत साठा आहे.जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. सद्यस्थितीत या प्रकल्यात समाधानकारक साठा आहे. मध्यम चार प्रकल्प आहेत. यामध्ये सरासरी ६७ टक्के साठा आहे. यामध्ये जर १० टक्के मृतसाठा व आगामी बाष्पीभवन गृहीत धरल्यास जिल्ह्याची तहान भागविण्यास हा साठा अपुरा ठरणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील किमान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे अश्याव९रळी प्रकल्यातील पाणीसाठा देखील कमी होणार असल्याने जिल्ह्यात पाण्याची चांगलीच टंचाई जानवणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.जलसंपदा विभागाच्या सोमवारच्या अहवालानुसार उर्ध्व वर्र्धा प्रकल्पात ३९७.५५ टिएमसी म्हणजेच ७०.४८ टक्के साठा आहे.परतीच्या पावसाच्या काळात मध्यप्रदेशातून पावसाची आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा व पूर्णा या प्रकल्पात पाण्याची पातली वाढली होती. मात्रशहानूर प्रकल्पात सद्यस्थितित ६२ टक्के, पूर्णा प्रकल्पात ७७.४२ टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ६८.४८ टक्के तर सपन प्रकल्पात २७.८७ टिएमसी म्हणजेच २८.१२ टक्के जलसाठा आहे. या मध्यम प्रकल्पात एकूण ८२.९० टीएमसी साठा व ६७ टक्के साठा आहे. मागील वर्षी या सर्व प्रकल्पात याच तारखेला ८३.०४ टीएमसी, २०१४ मध्ये ९७.३३ टीएमसी, २०१३ मध्ये १११.३१ टीएमसी, तर २०१२ मध्ये ८६.८९ टीएमसी साठा होता. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.लघु प्रकल्पात ४१ टक्केच साठाजिल्ह्यात एकूण ४६ लघुु प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४१. ४७ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये याच तारखेला ६२.६८ टक्के, २०१६ मध्ये ६७.९२ टक्के, २०१५ मध्ये ७६.११ टक्के, २०१३ मध्ये ६९.०५ टक्के, तर २०१२ मध्ये ६७.६६ टक्के साठा शिल्लक होता. यंदा मात्र सरासरीपेक्षा कमी पावसामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी साठा आहे.