शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आरटीईच्या ३,०७० जागांसाठी पहिली सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:42 IST

शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन अर्जाची दुसऱ्या टप्प्यातील सोडत १२ मार्चला एकूण ३ हजार ०७० जागासाठी सोडत काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देसात हजारांवर अर्ज : २४ मार्चपर्यंत प्रवेश करावा निश्चित

 आॅनलाईन लोकमतअमरावती : शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन अर्जाची दुसऱ्या टप्प्यातील सोडत १२ मार्चला एकूण ३ हजार ०७० जागासाठी सोडत काढण्यात आली आहे. यात ७ हजार ०८१ अर्जांची सोडत काढण्यात आली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत सोमवारी झेडपीचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, विस्तार अधिकारी किशोर पुरी, प्रिती गावंडे आदींच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीत नेमके किती प्रवेश निश्चित होतील, हे मात्र १३ मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई)साठी जिल्ह्यात ३ हजार ७० जागांसाठी तब्बल ११ हजार ०९ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले होते. त्यापैकी ३ हजार ९२८ पालकांनकडून निश्चित केले नाही. त्यामुळे ७ हजार ०८१ अर्जच आरटीईसाठी निश्चित करण्यात आले. यासर्व अर्जासाठी ही सोडत काढली आहे. शिक्षण विभागाकडे आरटीई प्रवेशासाठी एकूण २३३ शाळांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २७ शाळा नर्सरीच्या २१० जागासाठी आहेत. उर्वरित २८६० जागा इयत्ता पहिलीसाठी आहेत. भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या आरटीई सोडतीची प्रक्रिया तीन प्लेटांमध्ये चिठ्ठया टाकूण काढण्यात आली. यावेळी केजीवनचा विद्यार्थी प्रणव आनंद भैसारे व अथर्व दीपक गावंडे या चिमुकल्याच्या हाताने चिठ्ठ्या काढूृन सोडतीची प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे.सर्व प्रक्रिया आॅनलाईन असून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत अशा सर्व पालकांना सोडतीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते २४ मार्चपर्यंत प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक शाळांमध्ये जागा मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी पसंतीच्या कोणत्याही एकाच शाळेत प्रवेश घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.