शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात ‘झाडू’

By admin | Updated: July 1, 2014 01:16 IST

अल्पसंख्यकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने चांदूरबाजारात सुरू केलेल्या उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांना तिलांजली देण्यात आली आहे.

सुरेश सवळे - चांदूरबाजारअल्पसंख्यकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने चांदूरबाजारात सुरू केलेल्या उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांना तिलांजली देण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शाळा प्रवेशाचे स्वागत करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश असताना येथे मात्र शाळा परिसर साफ करण्यासाठी मुख्याध्यापकांसह सर्व विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेतल्याचे आढळले.ज्या ब्रिटिशांनी या शाळेचा शुभारंभ केला त्यांचा ध्वज आजही शाबूत असला तरी शाळा परिसरात मात्र घाणीचे साम्राज्य आहे. आजही चिमुकले विद्यार्थी आसनपट्टीवरच बसतात. नगर परिषद प्रशासनाचे मात्र या शाळेतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील उर्दू भाषिकांची संख्या लक्षात घेता सन १८९२ मध्ये ब्रिटिशांनी येथे नगर परिषद उर्दू देशी पूर्व नावाने प्राथमिक शाळा सुरू केली. अवघ्या २९ विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या शाळेत आज ४१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आज त्यांना मिळणारी मूलभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासोबतच आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालिका प्रशासन नागरिकांकडून मालमत्ता करासोबत शिक्षण कराच्या स्वरूपात लाखो रूपये वसूल करते. याशिवाय शासनाकडूनही शाळेतील मूलभूत सुविधेसाठी निधी दिला जातो. मात्र पालिका प्रशासनाकडून याकडे होणारे दुर्लक्ष हा चर्चेचा विषय झाला आहे. आज या उर्दू शाळेला १२२ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी तेव्हाच्या परिस्थितीनुसार सुविधा होत्या. त्यावेळी विद्यार्थी आसनावर बसून शिक्षण घ्यायचे. आजही तिच परिस्थिती कायम आहे. पिण्याचे पाणी आहे; मात्र ते शुध्द असेल याची शाश्वती देता येत नाही. नळ आहे, पण त्याला तोट्या नाहीत. नळाजवळ घाण साचलेली आहे. ज्या इमारतीत हे चिमुकले शिक्षण घेतात त्याचे छत तुटलेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वर्ग खोलीत शिरते. शाळा परिसरात असलेले प्रसाधनगृहसुध्दा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले आहे. या परिसरातून जाणारी नाली घाणीने बुजलेली असतानादेखील त्याची सफाई होत नाही. पोषण आहारसुध्दा विद्यार्थी उघड्यावरच खातात. यामुळे नगरपालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे.