शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात ‘झाडू’

By admin | Updated: July 1, 2014 01:16 IST

अल्पसंख्यकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने चांदूरबाजारात सुरू केलेल्या उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांना तिलांजली देण्यात आली आहे.

सुरेश सवळे - चांदूरबाजारअल्पसंख्यकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने चांदूरबाजारात सुरू केलेल्या उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांना तिलांजली देण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शाळा प्रवेशाचे स्वागत करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश असताना येथे मात्र शाळा परिसर साफ करण्यासाठी मुख्याध्यापकांसह सर्व विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेतल्याचे आढळले.ज्या ब्रिटिशांनी या शाळेचा शुभारंभ केला त्यांचा ध्वज आजही शाबूत असला तरी शाळा परिसरात मात्र घाणीचे साम्राज्य आहे. आजही चिमुकले विद्यार्थी आसनपट्टीवरच बसतात. नगर परिषद प्रशासनाचे मात्र या शाळेतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील उर्दू भाषिकांची संख्या लक्षात घेता सन १८९२ मध्ये ब्रिटिशांनी येथे नगर परिषद उर्दू देशी पूर्व नावाने प्राथमिक शाळा सुरू केली. अवघ्या २९ विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या शाळेत आज ४१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आज त्यांना मिळणारी मूलभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासोबतच आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालिका प्रशासन नागरिकांकडून मालमत्ता करासोबत शिक्षण कराच्या स्वरूपात लाखो रूपये वसूल करते. याशिवाय शासनाकडूनही शाळेतील मूलभूत सुविधेसाठी निधी दिला जातो. मात्र पालिका प्रशासनाकडून याकडे होणारे दुर्लक्ष हा चर्चेचा विषय झाला आहे. आज या उर्दू शाळेला १२२ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी तेव्हाच्या परिस्थितीनुसार सुविधा होत्या. त्यावेळी विद्यार्थी आसनावर बसून शिक्षण घ्यायचे. आजही तिच परिस्थिती कायम आहे. पिण्याचे पाणी आहे; मात्र ते शुध्द असेल याची शाश्वती देता येत नाही. नळ आहे, पण त्याला तोट्या नाहीत. नळाजवळ घाण साचलेली आहे. ज्या इमारतीत हे चिमुकले शिक्षण घेतात त्याचे छत तुटलेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वर्ग खोलीत शिरते. शाळा परिसरात असलेले प्रसाधनगृहसुध्दा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले आहे. या परिसरातून जाणारी नाली घाणीने बुजलेली असतानादेखील त्याची सफाई होत नाही. पोषण आहारसुध्दा विद्यार्थी उघड्यावरच खातात. यामुळे नगरपालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे.