शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

शाळा, शिक्षकांना न पाहताच पहिलीतील मुले गेली दुसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामीण भागातील बरेच कुटुंबातील पालकांना स्मार्ट फोन कसा हाताळवा, हेच कळत नाही. चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना यातील ...

अमरावती : ग्रामीण भागातील बरेच कुटुंबातील पालकांना स्मार्ट फोन कसा हाताळवा, हेच कळत नाही. चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना यातील ज्ञान फार कमी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांचा चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. असे असताना शाळा व शिक्षकांना न पाहताच पहिलीच्या मुलांना दुसऱ्या वर्गात दाखल करण्यात आले. दुसरीत जाऊनही या मुलांना येत नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने शाळा महाविद्यालय बंद ठेवली आहेत. यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबली. मात्र, ग्रामीण भागात या प्रणालीचा फारसा लाभ झाला नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत आणि ज्यांच्याकडे आहेत ते नेटवर्कमुळे वैतागले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. मुलाला मागील वर्षी जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात दाखल केले, गणवेश पुस्तके ही मिळाली पण शिक्षण मिळाले नाही. आता तो वर्ग खोलीत न बसता आणि शिक्षकांना न पाहताच शासनाचे निर्णयामुळे दुसरीत गेला असे पालक सांगत आहेत.

बॉक्स

पुन्हा अ आ इ पासून सुरुवात

कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी दिवसभर शेतात असतात आणि मुले खेळण्यात व्यस्त असतात. त्यामुळे मुले पुस्तक उघडून पाहत नाही. परिणामी मागील शिक्षण नाही विसरत असल्याचे दिसून येते. यामुळे या मुलांना पुन्हा अ.आ.ई.पासून शिकवावे लागेल की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.