शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

शाळा, शिक्षकांना न पाहताच पहिलीतील मुले गेली दुसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामीण भागातील बरेच कुटुंबातील पालकांना स्मार्ट फोन कसा हाताळवा, हेच कळत नाही. चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना यातील ...

अमरावती : ग्रामीण भागातील बरेच कुटुंबातील पालकांना स्मार्ट फोन कसा हाताळवा, हेच कळत नाही. चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना यातील ज्ञान फार कमी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांचा चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. असे असताना शाळा व शिक्षकांना न पाहताच पहिलीच्या मुलांना दुसऱ्या वर्गात दाखल करण्यात आले. दुसरीत जाऊनही या मुलांना येत नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने शाळा महाविद्यालय बंद ठेवली आहेत. यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबली. मात्र, ग्रामीण भागात या प्रणालीचा फारसा लाभ झाला नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत आणि ज्यांच्याकडे आहेत ते नेटवर्कमुळे वैतागले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. मुलाला मागील वर्षी जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात दाखल केले, गणवेश पुस्तके ही मिळाली पण शिक्षण मिळाले नाही. आता तो वर्ग खोलीत न बसता आणि शिक्षकांना न पाहताच शासनाचे निर्णयामुळे दुसरीत गेला असे पालक सांगत आहेत.

बॉक्स

पुन्हा अ आ इ पासून सुरुवात

कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी दिवसभर शेतात असतात आणि मुले खेळण्यात व्यस्त असतात. त्यामुळे मुले पुस्तक उघडून पाहत नाही. परिणामी मागील शिक्षण नाही विसरत असल्याचे दिसून येते. यामुळे या मुलांना पुन्हा अ.आ.ई.पासून शिकवावे लागेल की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.