शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज कपात केल्यास बँक व्यवस्थापकावर एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:22 IST

शासनाने गारपीट, पीक विम्यासह बोंडअळी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतनिधी उपलब्ध केला. यामधून कुठलीही कर्जकपात करता येणार नाही. असला प्रकार बँक व्यवस्थापकांनी केल्यास त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करा, शेतकरी अडचणीत असताना त्यांना १०० टक्के खरीप पीककर्जवाटप व्हायलाच पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची तंबी : महिनाभरात खरीप कर्जवाटप हवेच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने गारपीट, पीक विम्यासह बोंडअळी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतनिधी उपलब्ध केला. यामधून कुठलीही कर्जकपात करता येणार नाही. असला प्रकार बँक व्यवस्थापकांनी केल्यास त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करा, शेतकरी अडचणीत असताना त्यांना १०० टक्के खरीप पीककर्जवाटप व्हायलाच पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली.येथील नियोजन भवनात शनिवारी खरीप पीककर्ज वाटपासंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर प्र. जिल्हा उपनिबंधक के.डी. धोपे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र झा, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते. शेतकरी बँकेत आल्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. त्यांच्याप्रती चांगली सद्भावना ठेवली पाहिजे.शेतकरी बँकेत गेल्यावर त्यांच्याशी नीट बोलले जात नाही. कामे आहेत, कर्मचारी कमी आहेत आदी सर्व मान्य मात्र, शेतकऱ्याची प्रतारणा झाल्यास खपवून घेतल्या जाणार नाही, अशी तंबी ना. पोटे यांनी दिली. गतवर्षी गावागावात कॅम्प घेण्यात आले. चावडीवर कर्ज मंजूर करण्यात आले. यंदाही हीच प्रक्रिया राबवा, बँक अधिकाऱ्यांनी पीआरओ ठेवा. महसूल यंत्रणेचे सहकार्य आहेच, मात्र, कुठल्याही स्थितीत महिनाभरात शेतकऱ्यांना कर्जवाटप झालेच पाहिजे, असे ना. पोटे यांनी निक्षूण सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांची बँकनिहाय झाडाझडतीखरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्ह्यातील बँकांव्दारा फक्त सात टक्केच कर्जवाटप झाल्याची बाब जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गंभीरतेने घेतली. शनिवारच्या बैठकीत त्यांनी बँकनिहाय विचारणा करून आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना तंबी दिली. अनुपस्थित जिल्हा समन्वयकांना तंबी देण्याविषयीच्या सूचना लीड बँकेच्या व्यवस्थापकांना दिल्या. शेतकरी अडचणीत असताना शासनाने त्यांना दिलेल्या मदतनिधीमधून बँका कर्जकपात करत असेल तर त्या बँक अधिकाऱ्यांविरुद्ध आपण स्वत:चा अधिकार वापरून गुन्हा दाखल करू, असे ते म्हणाले. खासगी बँकांमुळे कर्जवाटपाची टक्केवारी वाढली यात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या. या बँकांनी वाटपाचा टक्का तत्काळ न वाढविल्यास त्या बँकेमधील शासनाची रक्कम काढून घेऊ, जूनमध्ये संपूर्ण कर्जवाटप झालेच पाहिजे, असेही बांगर म्हणाले.जिल्ह्यात सद्यस्थितीत सात टक्केच वाटपयंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना गतवर्षीच्या तुलनेत कमीच असे १,६३० कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. खरीप कर्जवाटपाला दोन महिन्यांपासून सुरूवात झाली असली तरी आज तारखेपर्यंत ११,३६३ खातेदारांना ११८.१६ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी ३,४४२ खातेदारांना ३९.४५ कोटींचे वाटप केले. ग्रामीण बँकांनी १०६ शेतकºयांना ८२ लाख, तर जिल्हा बँकेने ७,७८९ शेतकºयांना ७७.८९ कोटींचे वाटप केलेले आहेत.