शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

कर्ज कपात केल्यास बँक व्यवस्थापकावर एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:22 IST

शासनाने गारपीट, पीक विम्यासह बोंडअळी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतनिधी उपलब्ध केला. यामधून कुठलीही कर्जकपात करता येणार नाही. असला प्रकार बँक व्यवस्थापकांनी केल्यास त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करा, शेतकरी अडचणीत असताना त्यांना १०० टक्के खरीप पीककर्जवाटप व्हायलाच पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची तंबी : महिनाभरात खरीप कर्जवाटप हवेच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने गारपीट, पीक विम्यासह बोंडअळी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतनिधी उपलब्ध केला. यामधून कुठलीही कर्जकपात करता येणार नाही. असला प्रकार बँक व्यवस्थापकांनी केल्यास त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करा, शेतकरी अडचणीत असताना त्यांना १०० टक्के खरीप पीककर्जवाटप व्हायलाच पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली.येथील नियोजन भवनात शनिवारी खरीप पीककर्ज वाटपासंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर प्र. जिल्हा उपनिबंधक के.डी. धोपे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र झा, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते. शेतकरी बँकेत आल्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. त्यांच्याप्रती चांगली सद्भावना ठेवली पाहिजे.शेतकरी बँकेत गेल्यावर त्यांच्याशी नीट बोलले जात नाही. कामे आहेत, कर्मचारी कमी आहेत आदी सर्व मान्य मात्र, शेतकऱ्याची प्रतारणा झाल्यास खपवून घेतल्या जाणार नाही, अशी तंबी ना. पोटे यांनी दिली. गतवर्षी गावागावात कॅम्प घेण्यात आले. चावडीवर कर्ज मंजूर करण्यात आले. यंदाही हीच प्रक्रिया राबवा, बँक अधिकाऱ्यांनी पीआरओ ठेवा. महसूल यंत्रणेचे सहकार्य आहेच, मात्र, कुठल्याही स्थितीत महिनाभरात शेतकऱ्यांना कर्जवाटप झालेच पाहिजे, असे ना. पोटे यांनी निक्षूण सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांची बँकनिहाय झाडाझडतीखरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्ह्यातील बँकांव्दारा फक्त सात टक्केच कर्जवाटप झाल्याची बाब जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गंभीरतेने घेतली. शनिवारच्या बैठकीत त्यांनी बँकनिहाय विचारणा करून आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना तंबी दिली. अनुपस्थित जिल्हा समन्वयकांना तंबी देण्याविषयीच्या सूचना लीड बँकेच्या व्यवस्थापकांना दिल्या. शेतकरी अडचणीत असताना शासनाने त्यांना दिलेल्या मदतनिधीमधून बँका कर्जकपात करत असेल तर त्या बँक अधिकाऱ्यांविरुद्ध आपण स्वत:चा अधिकार वापरून गुन्हा दाखल करू, असे ते म्हणाले. खासगी बँकांमुळे कर्जवाटपाची टक्केवारी वाढली यात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या. या बँकांनी वाटपाचा टक्का तत्काळ न वाढविल्यास त्या बँकेमधील शासनाची रक्कम काढून घेऊ, जूनमध्ये संपूर्ण कर्जवाटप झालेच पाहिजे, असेही बांगर म्हणाले.जिल्ह्यात सद्यस्थितीत सात टक्केच वाटपयंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना गतवर्षीच्या तुलनेत कमीच असे १,६३० कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. खरीप कर्जवाटपाला दोन महिन्यांपासून सुरूवात झाली असली तरी आज तारखेपर्यंत ११,३६३ खातेदारांना ११८.१६ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी ३,४४२ खातेदारांना ३९.४५ कोटींचे वाटप केले. ग्रामीण बँकांनी १०६ शेतकºयांना ८२ लाख, तर जिल्हा बँकेने ७,७८९ शेतकºयांना ७७.८९ कोटींचे वाटप केलेले आहेत.