शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

उन्हाळा ऋतू ठरतोय वनकर्मचाऱ्यांसाठी "अग्निपरीक्षा"

By admin | Updated: April 16, 2017 00:07 IST

चराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे.

आगीसोबतच उन्हाची दाहकता : वन्यप्राण्यांसह राष्ट्रीय संपत्ती संवर्धनाचा उद्देशवैभव बाबरेकर अमरावतीचराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे. असे प्रकार उन्हाळ्यातच अनेकदा घडत असल्यामुळे उन्हाळा वनविभागासाठी आव्हानात्मक ठरत आहे. वनसवंर्धनासाठी झटणाऱ्या वनाअधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळा अग्निपरीक्षेसारखाच असून वन्यप्राणी व राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी अमरावती वनविभाग सातत्याने दिवसरात्र पहारा देत आहे. उन्हाळ्यातील उष्ण वातावरणात जंगलात अत्यंत भयाण स्थिती राहते. हिरवेगार असणारी वृक्ष कोमेजून जातात. पानगळीमुळे सर्वत्र शुकशुकाट असते. सूर्याचा थेट प्रकाश वनजमिनीवर पडत असल्यामुळे उन्हाळा वन्यप्राणी व वनकर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरतो. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी वनविभागाला सातत्याने लक्ष ठेवावेच लागते. रखरखत्या उन्हात वनाची सुरक्षा सांभाळणाऱ्यांसाठी त्यांना अग्निपरीक्षाच द्यावी लागते. नैसर्गिक पाणवठे आटल्याने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केलेत. गवत सुकलेले असल्यामुळे वणव्याची भीती आहे. मात्र, त्यापेक्षाही भयंकर स्थिती जंगलात आगी लावल्या जात असल्यामुळे निर्माण झाली आहे. जंगलात वणवा पेटण्याची स्थिती नसल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. आगी लागण्याचे प्रकार हे खोडसाळपणामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. जंगलात लागणाऱ्या आगींमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होऊन वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना लक्ष द्यावे लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागते. आगीच्या झळा सहन करीत उपाययोजना करणे भाग पडते. अशा्वेळी भूकतहान हरवून वनकर्मचारी आग विझविण्याचे सातत्याने प्रयत्न करावे लागते. या प्रक्रियेत वनमजुरापासून तर वनसरंक्षकापर्यंतची सर्व यंत्रणा कामी लागली आहे. आगी लागण्याची कारणेजिल्ह्यालगतच्या जंगलात सहजासहजी वणवा पेटणे शक्य नसल्याचे वनाधिकारी सांगतात. जंगलात सर्वाधिक आगी नागरिकांच्या खोडसाळपणामुळे लागतात. शेतकरी धुरे जाळतात. अशाप्रसंगी ती आग जंगलापर्यंत पोहचू शकते. जंगलात चराईबंदी ही पशुपालकांच्या जिव्हारी लागते. अशाप्रसंगी वनविभाग कारवाईचा वचपा काढण्यासाठीसुद्धा आगी लावली जाते. वनविभागाच्या कारवाईने दुखावलेले हे इसम जंगलात आगी लावतात. तसेच अनावधानाने अनेकजण जंगलातून जाताना जळती विडी, सिगारेट फेकून देतात. अशाप्रसंगीही आग लागते. नागरिकांचा खोडसाळपणा, शेतीच्या धुऱ्यावरील आग जगंलापर्यंत पसरते. जळती विडी व सिगारेट जंगलात फेकल्यास आग लाग लागते. यासारखे मुद्दे जंगलात आग लागण्यास कारणीभूत ठरते. सहजासहजी वणवा पेटू शकत नाही.- राजेंद्र बोंडे, सहायक उपवनसरंक्षक,