शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

उन्हाळा ऋतू ठरतोय वनकर्मचाऱ्यांसाठी "अग्निपरीक्षा"

By admin | Updated: April 16, 2017 00:07 IST

चराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे.

आगीसोबतच उन्हाची दाहकता : वन्यप्राण्यांसह राष्ट्रीय संपत्ती संवर्धनाचा उद्देशवैभव बाबरेकर अमरावतीचराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे. असे प्रकार उन्हाळ्यातच अनेकदा घडत असल्यामुळे उन्हाळा वनविभागासाठी आव्हानात्मक ठरत आहे. वनसवंर्धनासाठी झटणाऱ्या वनाअधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळा अग्निपरीक्षेसारखाच असून वन्यप्राणी व राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी अमरावती वनविभाग सातत्याने दिवसरात्र पहारा देत आहे. उन्हाळ्यातील उष्ण वातावरणात जंगलात अत्यंत भयाण स्थिती राहते. हिरवेगार असणारी वृक्ष कोमेजून जातात. पानगळीमुळे सर्वत्र शुकशुकाट असते. सूर्याचा थेट प्रकाश वनजमिनीवर पडत असल्यामुळे उन्हाळा वन्यप्राणी व वनकर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरतो. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी वनविभागाला सातत्याने लक्ष ठेवावेच लागते. रखरखत्या उन्हात वनाची सुरक्षा सांभाळणाऱ्यांसाठी त्यांना अग्निपरीक्षाच द्यावी लागते. नैसर्गिक पाणवठे आटल्याने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केलेत. गवत सुकलेले असल्यामुळे वणव्याची भीती आहे. मात्र, त्यापेक्षाही भयंकर स्थिती जंगलात आगी लावल्या जात असल्यामुळे निर्माण झाली आहे. जंगलात वणवा पेटण्याची स्थिती नसल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. आगी लागण्याचे प्रकार हे खोडसाळपणामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. जंगलात लागणाऱ्या आगींमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होऊन वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना लक्ष द्यावे लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागते. आगीच्या झळा सहन करीत उपाययोजना करणे भाग पडते. अशा्वेळी भूकतहान हरवून वनकर्मचारी आग विझविण्याचे सातत्याने प्रयत्न करावे लागते. या प्रक्रियेत वनमजुरापासून तर वनसरंक्षकापर्यंतची सर्व यंत्रणा कामी लागली आहे. आगी लागण्याची कारणेजिल्ह्यालगतच्या जंगलात सहजासहजी वणवा पेटणे शक्य नसल्याचे वनाधिकारी सांगतात. जंगलात सर्वाधिक आगी नागरिकांच्या खोडसाळपणामुळे लागतात. शेतकरी धुरे जाळतात. अशाप्रसंगी ती आग जंगलापर्यंत पोहचू शकते. जंगलात चराईबंदी ही पशुपालकांच्या जिव्हारी लागते. अशाप्रसंगी वनविभाग कारवाईचा वचपा काढण्यासाठीसुद्धा आगी लावली जाते. वनविभागाच्या कारवाईने दुखावलेले हे इसम जंगलात आगी लावतात. तसेच अनावधानाने अनेकजण जंगलातून जाताना जळती विडी, सिगारेट फेकून देतात. अशाप्रसंगीही आग लागते. नागरिकांचा खोडसाळपणा, शेतीच्या धुऱ्यावरील आग जगंलापर्यंत पसरते. जळती विडी व सिगारेट जंगलात फेकल्यास आग लाग लागते. यासारखे मुद्दे जंगलात आग लागण्यास कारणीभूत ठरते. सहजासहजी वणवा पेटू शकत नाही.- राजेंद्र बोंडे, सहायक उपवनसरंक्षक,