शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

उन्हाळा ऋतू ठरतोय वनकर्मचाऱ्यांसाठी "अग्निपरीक्षा"

By admin | Updated: April 16, 2017 00:07 IST

चराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे.

आगीसोबतच उन्हाची दाहकता : वन्यप्राण्यांसह राष्ट्रीय संपत्ती संवर्धनाचा उद्देशवैभव बाबरेकर अमरावतीचराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे. असे प्रकार उन्हाळ्यातच अनेकदा घडत असल्यामुळे उन्हाळा वनविभागासाठी आव्हानात्मक ठरत आहे. वनसवंर्धनासाठी झटणाऱ्या वनाअधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळा अग्निपरीक्षेसारखाच असून वन्यप्राणी व राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी अमरावती वनविभाग सातत्याने दिवसरात्र पहारा देत आहे. उन्हाळ्यातील उष्ण वातावरणात जंगलात अत्यंत भयाण स्थिती राहते. हिरवेगार असणारी वृक्ष कोमेजून जातात. पानगळीमुळे सर्वत्र शुकशुकाट असते. सूर्याचा थेट प्रकाश वनजमिनीवर पडत असल्यामुळे उन्हाळा वन्यप्राणी व वनकर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरतो. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी वनविभागाला सातत्याने लक्ष ठेवावेच लागते. रखरखत्या उन्हात वनाची सुरक्षा सांभाळणाऱ्यांसाठी त्यांना अग्निपरीक्षाच द्यावी लागते. नैसर्गिक पाणवठे आटल्याने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केलेत. गवत सुकलेले असल्यामुळे वणव्याची भीती आहे. मात्र, त्यापेक्षाही भयंकर स्थिती जंगलात आगी लावल्या जात असल्यामुळे निर्माण झाली आहे. जंगलात वणवा पेटण्याची स्थिती नसल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. आगी लागण्याचे प्रकार हे खोडसाळपणामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. जंगलात लागणाऱ्या आगींमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होऊन वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना लक्ष द्यावे लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागते. आगीच्या झळा सहन करीत उपाययोजना करणे भाग पडते. अशा्वेळी भूकतहान हरवून वनकर्मचारी आग विझविण्याचे सातत्याने प्रयत्न करावे लागते. या प्रक्रियेत वनमजुरापासून तर वनसरंक्षकापर्यंतची सर्व यंत्रणा कामी लागली आहे. आगी लागण्याची कारणेजिल्ह्यालगतच्या जंगलात सहजासहजी वणवा पेटणे शक्य नसल्याचे वनाधिकारी सांगतात. जंगलात सर्वाधिक आगी नागरिकांच्या खोडसाळपणामुळे लागतात. शेतकरी धुरे जाळतात. अशाप्रसंगी ती आग जंगलापर्यंत पोहचू शकते. जंगलात चराईबंदी ही पशुपालकांच्या जिव्हारी लागते. अशाप्रसंगी वनविभाग कारवाईचा वचपा काढण्यासाठीसुद्धा आगी लावली जाते. वनविभागाच्या कारवाईने दुखावलेले हे इसम जंगलात आगी लावतात. तसेच अनावधानाने अनेकजण जंगलातून जाताना जळती विडी, सिगारेट फेकून देतात. अशाप्रसंगीही आग लागते. नागरिकांचा खोडसाळपणा, शेतीच्या धुऱ्यावरील आग जगंलापर्यंत पसरते. जळती विडी व सिगारेट जंगलात फेकल्यास आग लाग लागते. यासारखे मुद्दे जंगलात आग लागण्यास कारणीभूत ठरते. सहजासहजी वणवा पेटू शकत नाही.- राजेंद्र बोंडे, सहायक उपवनसरंक्षक,