शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात अग्नी तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:49 IST

रिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे.

 अमरावती - हरिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे. त्यामुळे माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकाºयांसह पथक वेळीच जंगलात पोहचले खरे; मात्र या वनपरिक्षक्षेत्रात पाणवठ्यांची संख्या अल्प असल्याने पाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून आगी नियंत्रण मिळविल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.अमरावती मुख्य रस्त्याच्या हरिसाल व रोरा या गावाच्या मध्यभागी असलेल्या अकोट फाट्याजवळील व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात आगीने अग्नी तांडव केल्याने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात झाले. या आगीत जवळपास ४० ते ५० हेक्टर जंगल खाक झाल्याची माहिती समोर आलीे आहे. विशेष म्हणजे हरिसाल वनपरिक्षेत्रात सिपना डोह असल्याने येथे पाणी पिण्यासाठी बहुतांश वन्यप्राणी येतात. वाघ, राणगवा, म्हैस, ससे, मोर, हरिण, सांबर आदी वन्यप्राण्यांची या भागात सर्वाधिक संख्या असल्याने या आगीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला.

सिपना नदी असून बारामाही सिपना नदीत पाणी राहत असल्याने जवळपास उन्हाळ्यात वन्य प्राणी याच सिपना नदीवर पाणी पिण्याकरिता येतात. मात्र या आगीने जंगल जाळून खाक झाल्याने वन्यप्राणी असुरक्षित झाल्याचे बोलल्या जात आहे. वन्यजीव  विभागाकडून होणाºया वन्यप्राणी गणनेवर परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांसह वनौषधींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती