शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:08 IST

जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कॅम्प स्थित कार्यालयास मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे आग : कार्यकारी अभियंता कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज भस्मसात

आॅनलाईन लोकमतअमरावती : जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कॅम्प स्थित कार्यालयास मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यालयातील टेबल, खुर्च्यांसह संगणक जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.पाटबंधारे मंडळाच्या यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे ऊर्ध्व वर्धा क्वार्टर परिसरात कार्यालय असून, या कार्यालयाची इमारत ३५ वर्षे जुनी आहे. नागपूर येथील कार्यालयाच्या अधिपत्याखाली या यांत्रिकी विभागात धरण, कालवे, तलाव, स्वच्छताविषयक कामकाज चालते. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कार्यालयाला आग लागल्याचे चौकीदार दखणे यांना दिसले. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत अग्निशमनला कळविले. तोपर्यंत ऊर्ध्व वर्धा परिसरातील क्वार्टरमध्ये राहणाऱ्यां नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळातच अग्निशमन पथकाने घटनास्थळ गाठून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे कार्यालयातील आस्थापना, भांडार, लेखा व यांत्रिकी विभागातील बहुतांश भाग जळून खाक झाला होता. घटनेच्या माहितीवरून यांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत कार्यालयातील दस्तावेज बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही दस्तावेज बचावले.अग्निशमन दलाच्या सात ते आठ पाण्याच्या बंबांनी तीन ते चार तासांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनेच्या माहितीवरून जलसंपदाचे नागपूर येथील अधीक्षक अभियंता सी.बी. मढामे, अभियंता अ.ल. राजनेकर, आर.के. ढवळे यांनी कार्यालयाला भेट दिली.मोरबागच्या आरको गॅरेजला आगमंगळवारी सकाळी जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाला आग लागल्यानंतर काही वेळातच मोरबाग येथील आरको गॅरेजला भीषण आग लागली. त्यामुळे अग्निशमन पथकाची चांगलीच ताराबंळ उडाली होती.आगीत आरको गॅरेजमधील भंगार साहित्य जळून खाक झाले. दाट वस्तीच्या परिसरात असणाºया या गॅरेजची भीषण आग वेळेवर नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन विभागाच्या तीन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.सिचंन घोटाळ्याशी तार जुळण्याचा संशयसिंचन घोटाळ्याने राज्यभरात खळबळ माजवली असताना, जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाला आग लागल्याची बाब संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याविषयी अमरावती विभागात दोन ठिकाणी गुन्हे दाखल असून, त्याची चौकशी सुरू आहे. या सिंचन प्रकल्पाची उघड चौकशी सुरू असून, या संबंधाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना संबंधित प्रकल्पांविषयीचे दस्तावेज मागविले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत ते दस्तावेज एसीबीला प्राप्त झाले नाही. त्यामुळे यांत्रिकी विभागाला लागलेली आग लागली की लावण्यात आली, याबाबत शहरात घमासान चर्चा आहे.