शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

हॉटेलमधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग; गुदमरल्याने केबल नेटवर्क अधिकार्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

फोटो पी ३१ हॉटेल व ठक्कर अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा ...

फोटो पी ३१ हॉटेल व ठक्कर

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. दिलिप चंद्रकांत ठक्कर (५४, रा. जमुना क्रमांक ३, सीए रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे जावई चेतन तेली (४०, एकनाथपुरम) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी हॉटेल संचालक रितेश लुल्ला (३२. रामपुरी कॅम्प) याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेने हॉटेलमधील एकंदरितच सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. राजापेठ पोलीस ठाण्यासमोर इम्पेरिया नामक चार माळ्याचे हॉटेल व लॉज आहे. तेथील तिसर्या मजल्यावर १३ खोल्या असून, त्यासमोरच इलेक्ट्रिक पॅनेल आहे. त्या पॅनेनला रात्री २ नंतर शार्ट सर्किटने आग लागली. ती आग धुमसत असतानाच धुराचा प्रचंड लोळ उठला. तो धूर निघून जाण्यासाठी त्या माळ्यावर पुरेशी जागा नसल्याने तो धूर खोल्यांमध्ये शिरला. त्या अंधार्या खोल्यांमध्ये देखील व्हेंटिलेशन नव्हते. धुराचे लोळ उठल्याने पळापळ झाली. त्यातच पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने दिलिप ठक्कर यांचा गुदमरून मृत्यू झाला.

//////////

२०२ मध्ये मिळाला मृतदेह

जीटीपीएल या केबल नेटवर्कचे विदर्भ व्यवस्थापक असलेले ठक्कर हे खोली क्रमांक २०५ मध्ये थांबलेले होते. तर त्यांचे पुण्याचे सहकारी दिपेश शहा हे बाजुच्या खोलीत होते. माहितीनुसार, पळापळ झाली तेव्हा, ठक्कर खोलीतून बाहेर पडले. मात्र, पॅसेजमध्ये अंधार व धूर साचल्याने ते बाहेर पडू शकले नाही. त्यांचा मृतदेह खोली क्रमांक २०२ मध्ये आढळून आला.

//////////

‘टिम राजापेठ’मुळे ‘ते’ पाच जण सुखरूप

हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सहिसलामत बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टिम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, राहुल ढे॑गेकर, नीलेश पोकळे, अतुल स॑भे, दानिश शेख, प्रशांत गिरडे, ढवळे यांनी प्राणाची बाजी लावत त्यांना हॉटेलबाहेर काढले.

///////

ना इमरजंसी एक्झिट ना फायर ऑडिट

हॉटेलमध्ये इमरजंसी एक्झिट नसल्याने ग्राहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. धूर असल्याने चिंचोळ्या जागेतून बाहेर जाणारा मार्ग त्याच भागात आग लागल्याने अवरूद्ध झाला. त्यामुळे ठक्कर यांना बाहेरच पडता आले नाही. या हॉटेलचे फायर ऑडिट झाले नसल्याचे देखील पोलिसांंना चौकशीदरम्यान सांगण्यात आले.