शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

अग्निशमन ‘नगरविकास’वर भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:14 IST

बाजारभावाच्या तिप्पाट किमतीत खरेदी करण्यात आलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन प्रकरणातील अनियमितता दडपविण्याचा घाट अग्निशमन विभागाने रचला आहे.

ठळक मुद्देदोन कोटींची अनियमितता दडवण्याचा खटाटोप : चौकशीला मुहूर्त मिळेना, सूत्रधार वेगळाच

आॅनलाईन लोकमतअमरावती : बाजारभावाच्या तिप्पाट किमतीत खरेदी करण्यात आलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन प्रकरणातील अनियमितता दडपविण्याचा घाट अग्निशमन विभागाने रचला आहे. याप्रकरणी नगरविकास मंत्रालयासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, अग्निशमन अधीक्षकांनी ते आदेश झिडकारल्याचे रखडलेल्या चौकशीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या सुमारे १.५० कोटी रुपयांच्या अनियमिततेचा खरा सूत्रधार महापालिकेतील एक बडा अधिकारी व एक तथाकथित कन्सल्टंट असल्याचा आरोप महापालिका वर्तुळात होत आहे.अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चौहान हे नगरविकास खात्यासह महसूल यंत्रणेतील उच्च अधिकाºयांना जुमानत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्याने फायर रेस्क्यू वाहनाच्या खरेदी प्रक्रियेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे सप्रमाण दर्शवून दिले आहे. त्या तक्रारीतील वस्तुनिष्ठता पाहून नगरविकास विभागासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना त्याची दखल घ्यावी लागली. तिन्ही बड्या अधिकाºयांकडून चौकशीचे आदेश आलेत. मात्र, ते चौकशीचे आदेश भारतसिंह चौहान यांनी या वाहन खरेदीच्या फाइलमध्ये ठेवण्याची तसदी तेवढी घेतली आहे. मात्र, दीड महिना उलटला असतानाही चौहान यांनी चौकशी किंवा त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सोपविला नसल्याने या व्यवहारात त्यांचेही हात ‘ओले’ झाले नसावेत ना, अशी शंका तक्रारकर्त्यांनी व्यक्त केली आहे. बाजारात ५० ते ७० लाख रुपयांमध्ये उपलब्ध असलेले मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन अग्निशमन विभागाने तब्बल २ कोटी ४ लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्यासाठी एका स्थानिक व्यक्तीने कन्सल्टंटशी संधान साधून निधी एंटरप्रायजेससाठी किल्ला लढविला. त्यानंतर मॅन्यूफॅक्चरर नसताना निधी एंटरप्रायजेसला २.०४ कोटींमध्ये हे वाहन पुरविण्याचे आदेश देण्यात आले. पुरवठा आदेशातील कालावधीही महिन्यापूर्वीच संपुष्टात आला आहे. या व्यवहारात किती जणांचे हात ‘ओले’ झाले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.असे आलेत चौकशीचे आदेशविभागीय आयुक्तांनी ३१ जानेवारीला, जिल्हाधिकाºयांनी १२ फेब्रुवारीला, तर मुंबईच्या नगरविकास विभागाने १५ फेब्रुवारीला या प्रकरणाचे चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेत. मात्र, २८ मार्चपर्यंत अग्निशमन अधीक्षक वा वरिष्ठांनी कुठलीही चौकशी आरंभली नाही किंवा कुठलाही अहवाल वरिष्ठांना पोहोचता केला नाही. यावरुन चौहानांची लेटलतिफी उघड झाली आहे.प्रकरणाच्या चौकशीबाबत पत्र प्राप्त झालेत. चौकशी झाल्यानंतर अहवाल तिन्ही यंत्रणांना पाठविण्यात येईल.भारतसिंह चौहानअग्निशमन अधीक्षक, महापालिका