शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बदलत्या काळानुरुप समाजोपयोगी शिक्षण मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:56 IST

भारतीय शिक्षण पध्दतीत मध्यंतरीच्या काळात अनेक आमुलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नवनवीन बाबींचा समावेश शिक्षण पध्दतीत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत.

ठळक मुद्देकुलगुरू : विद्यापीठात पंचवार्षिक बृहत् आराखडा कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय शिक्षण पध्दतीत मध्यंतरीच्या काळात अनेक आमुलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नवनवीन बाबींचा समावेश शिक्षण पध्दतीत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. शिक्षण क्षेत्राकडूनही समाजाच्या अपेक्षा पूर्वी पेक्षा वाढल्या आहे. विद्यार्थ्यांना हवे असलेले शिक्षण मिळावे, यासाठी पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करावयाचा असून आयोजित कार्यशाळा त्यादृष्टिने मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले.सन २०१९-२० ते २०२३-२४ असा पाच वर्षीय शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्यासाठी विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात कार्यशाळा संपन्न झाली, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, आनंद मापूसकर, मिलिंद सोहनी, बी.एन. जगताप, कुलसचिव अजय देशमुख, उपकुलसचिव सुलभा पाटील उपस्थित होते.कुलगुरु म्हणाले, विद्यापीठाचे पुढील पाच वर्षांचे शिक्षण कसे राहील, यासाठी बृहत आराखडा कार्यशाळांचे आयोजन होत असून त्यावरुन राज्याचा शैक्षणिक बृहत आराखडा तयार होणार आहे. पूर्वी व्यक्तीकेंद्रीत शैक्षणिक प्रवास होता; पण आता समाजामध्ये शैक्षणिक जागृती झाली आहे. समाजाच्या शैक्षणिक अपेक्षा वाढल्या आहेत. पारंपारिक शिक्षण, पदवी नोकरीसाठी पुरेशी नाही, असे ते महणाले.