शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

चांदूरबाजारमध्ये पॅसेंजरच्या खोळंब्याची कारणे शोधणार

By admin | Updated: May 29, 2014 23:31 IST

जलद रेल्वे गाड्यांना मोर्शी येथे थांबा मिळावा, या मागणीची पूर्तता करणे आपल्या हाती नाही; मात्र चांदूरबाजार येथे पॅसेंजर एक तासपर्यंत खोळंबून राहते. यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करता येऊ शकेल,

मोर्शी : जलद रेल्वे गाड्यांना मोर्शी येथे थांबा मिळावा, या मागणीची पूर्तता करणे आपल्या हाती नाही; मात्र चांदूरबाजार येथे पॅसेंजर एक तासपर्यंत खोळंबून राहते. यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करता येऊ शकेल, असे नागपूरचे विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग यांनी सांगितले. विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग येथील रेल्वे स्थानकाच्या निरीक्षणाकरिता आले असता स्थानिक विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन अमरावती-नरखेड मार्गावर सुरु असलेल्या दोन साप्ताहिक रेल्वे गाड्यांना मोर्शीला थांबा मिळावा, रेल्वे स्थानकावर संगणकीकृत तिकिटांची आणि आरक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण वलगावपर्यंत झाले असून कामाला गती देऊन नरखेडपर्यंत विद्युतीकरण व्हावे, रेल्वे स्थानकावर थंड पाण्याची सोय व्हावी, याशिवाय अमरावतीकडे जाणारी पॅसेंजर चांदूरबाजारला जवळपास एक तासपर्यंत थांबविली जाते. पर्यायाने अमरावती, अकोल्याकडे जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होते, प्रवासी रेल्वेने जाण्याऐवजी बसने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेचे नुकसान होत असल्याची बाब यावेळी किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास कापसे, ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय उल्हे, वाहतूकदार रामदास कापसे, कापड विक्रेता संघाचे मिलिंद ढोले इत्यादींनी रेल्वे प्रबंधकांच्या नजरेस आणून दिली. विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग यांनी प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करताना एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न हा थेट रेल्वे मंत्रालयाशी निगडित असल्याचे विशद केले. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाकरिता जेवढा निधी उपलब्ध होता त्यातून वलगावपर्यंंत विद्युतीकरण झाले. पुढे निधी उपलब्ध होताच विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात येईल, विद्युतीकरणानंतर संगणकीय प्रणाली सुरु करता येईल, असे त्यांनी विशद केले. चांदूरबाजार येथे एक तासापर्यंत पॅसेंजर का थांबविण्यात येते? यासंदर्भात उपस्थित  अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा करुन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग हे मोर्शीला आले होते. त्यावेळीसुद्धा विविध संघटनांनी त्यांना या मागण्यांचे निवेदन दिले होते. (तालुका प्रतिनिधी)