शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

अखेर रेड्डी याचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST

फोटो ३० एएमपीएच ०१.१२ यशोमती ठाकूर यांची कठोर भूमिका, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट लोगो - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण अमरावती ...

फोटो ३० एएमपीएच ०१.१२

यशोमती ठाकूर यांची कठोर भूमिका, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

लोगो - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विशेष बाब म्हणून रेड्डीचे निलंबन करून घेतले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला धारणी पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दीपाली चव्हाण यांनी चार पानांच्या सुसाईड नोटमधून विनोद शिवकुमारसह एम.एस. रेड्डी हा सुद्धा तितकाच जवाबदार असल्याचे स्पष्ट झाले. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. वनविभागात महिला अधिकारी, कर्मचारी असुरक्षित असल्याचे या निमित्ताने पुढे आले. त्यामुळे महिला व बाल कल्याणमंत्री यांनी मेळघाटच्या जंगलात ‘लेडी सिंघम’ अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अपर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या गंभीर प्रकरणाची माहिती देत निलंबनाचे आदेश जारी करून घेतले.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर विनोद शिवकुमार याला आरोपी करण्यात आले. त्यानंतर २६ मार्च रोजी एम.एस. रेड्डी यांना नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश निर्गमित झाले. मात्र, रेड्डी यांनी ही बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नसल्याचे स्पष्ट करीत वनखात्याला चॅलेंज केले होते. बदली आदेशाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारीदेखील चालविली होती. मात्र, ना. यशोमती ठाकूर यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अखेर रेड्डी यांचे निलंबन झाले, हे विशेष.

बॉक्स

लैगिक अत्याचारात सामील असलेल्यांना कडक शासन होईल - यशोमती ठाकूर

आया, बहिणींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंबरोबर सरकारी तसेच खासगी कार्यालयात लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकविण्याची ही वेळ आहे. राज्यात अशा गुन्ह्यांना व गुन्हेगारांना माफी नाही. सगळ्यांना कडक शिक्षा मिळेल. एकूणच कार्यालयामध्ये विशाखा समित्यांचा आढावा घेण्यात येईल. हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. गुन्हेगार आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा कडक शिक्षा व्हायला पाहिजे. लोक कायदा हातात घेण्याची भाषा बोलतात. अशांना पोलिसांनी धडा शिकविला पाहिजे. लैंगिक अत्याचारात सामील असलेल्यांना कडक शासन होईल, हेच माझे वचन आहे. एकालाही सोडणार नाही. कुणाला त्रास असेल, अशा महिलांनी महिला आयोगाकडे तक्रारी करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेईन, असे वचन राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘लाेकमत’शी बोलताना दिले.