शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

अखेर यशोमती ठाकुरांच्या आंदोलनापुढे नमले शासन

By admin | Updated: August 30, 2014 23:20 IST

तिवसा विधानसभा मतदारसंघात सन २००७ पासून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रेंगाळलेला होता. या मुद्द्यावर शनिवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील शेकडो पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी

अमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघात सन २००७ पासून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रेंगाळलेला होता. या मुद्द्यावर शनिवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील शेकडो पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ठिय्या मांडला. अखेर यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. याबाबत लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आदेशही धडकलेत. आमदार यशोमती ठाकूर यांच्या अांदोलनाची फलश्रुती म्हणून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा निकाली निघाला. सन २००७मध्ये महापूर व अतिवृष्टीची झळ शेकडो कुटुंबियांना पोहचली होती. पुनर्वसनासाठी २० कोटी द्यावलगाव, रेवसा, देवरा, शिराळा, पुसदा, नांदुरा, देवरी, फाजलापूर, अंतोरा, सालोरा, टेंभा, गोपालपूर, कठोरा बु., कामुंजा, वझरखेड, थुगाव खानापूर, भातकुली तालुक्यातील धामोरी, तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा आदी गावांतील पूरग्रस्तांचे तसेच पेढी बॅरेज प्रकल्पाअंतर्गत रोहणखेडा, पर्वतापूर, दनद, टेंभा या गावांतील लोकांचे पुनर्वसन शासनाने सन २००७ पासून अद्यापपर्यंतही केले नाही. परिणामी वरील गावांतील शेकडो कुटुंब आजही निवाऱ्याविना वास्तव्य करीत असल्याने पूरग्रस्त हक्काचे निवाऱ्यापासून वंचित आहेत. यासंदर्भात अनेकदा विविध प्रकारे आंदोलने केल्यानंतरही याची दखल शासन व प्रशासनाने घेतली नाही. परिणामी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता तातडीने २० कोटी रुपयांची मंजुरी शासनाने देऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे रेटून धरली. जोपर्यंत या मागण्या निकाली काढणार नाही तोपर्यंत सभागृहातून हटणार नाही, असा इशारा ठाकूर यांनी दिला. त्यांची जिल्हाधिकारी गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंह पवार, भूसंपादन अधिकारी मोहन पातुरकर यांनी समजूत काढल्यानंतरही त्या आपल्या मागणीवर ठाम होत्या. दरम्यान आंदोलनकऱ्यांनी सभागृहातच प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. सभागृहातच झुणका भाकर खाऊन आंदोलन चालूच ठेवल्यामुळे प्रशासनासमोर प्रेचप्रसंग निर्माण झाला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यत आंदोलन सुरूच होते . आमदार यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाची तीव्रता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सातत्याने मंत्रालय स्तरावर कळविली. समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्याना या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पुरग्रस्ताच्या पूनर्वसनासाठी त्वरीत १० कोटी रूपयाचा निधी मंजूर केला. आणि उर्वरीत १० कोटी रूपयांच्या निधीबाबत सोमवारी निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. निधी मंजुरीचा लेखी आदेश आला. त्यानंतरच आमदार यशोमती ठाकूर यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात आमदार यशोमती ठाकूर यांच्यासोबत ज्योती यावलीकर, हरीश मोरे, सुधीर उगले, गजानन देशमुख, शरद ठाकरे, श्याम बनसोड, राजेश ठाकरे, अनिल कडू, वीरेंद्र जाधव, अलकेश काळबांडे, प्रभाकर नांदणे, देवेंद्र देशमुख, हैदर शहा, कपिल वाघमारे, यांच्यासह शेकडो महिला पुरुषांचा समावेश होता. (प्रतिनिधी)