शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांना परीविक्षाधीन बनविले, वनविभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:29 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना अखेर १८ महिन्यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- गणेश वासनिकअमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना अखेर १८ महिन्यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी जबाबदारीच्या खुर्चीतून हे परीविक्षाधीन वनक्षेत्रपाल एकाच वेळी दोन्ही काम कसे सांभाळतील, हे मात्र कोडच आहे. ह्यलोकमतह्णच्या दणक्यामुळे वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.वनविभागात आय.एफ.एस. ते वनक्षेत्रपाल या पदापर्यंत १८ महिन्यांचे पदस्थापनेपूर्वीच परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून नंतर पोस्टिंग देण्यात यावे, असे शासन आदेश असतानासुद्धा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) नागपूर यांनी शासन निर्णयास केराची टोपली दाखवून एमपीएससीकडून आलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना थेट पोस्टिंग दिल्याने वनविभागात वादंग उठले होते. यासंदर्भात लोकमतने २० जानेवारी एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांना पदस्थापनेची खैरात या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) ए. आर. मंडे यांनी २० जानेवारी रोजी पत्र जारी करून पदस्थापना केलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना जबाबदारीच्या पदावरून कार्यमुक्त न करता त्या विभागात परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वनविभागाची गोची झाली. कारण १४६ वनक्षेत्रपालांमध्ये ९० च्या आसपास वनक्षेत्रपालांना प्रादेशिक व वन्यजीव विभागात पोस्टिंग देण्यात आली. त्यांना पोस्टिंग आणि प्रोबेशन एकाच वेळी कसे करता येईल, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय २९ फेब्रुवारी २०१६ व वनक्षेत्रपाल सेवा प्रवेश नियम ६ एप्रिल १९९८ प्रमाणे १८ महिन्यांचे स्वतंत्र परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करून त्यानंतरच त्यांची पोस्टिंग करणे गरजेचे आहे. नियमास बगल देऊन अगोदर पोस्टिंग आणि नंतर परीविक्षाधीन कालावधी असा प्रकार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) यांनी केलेला आहे. सदर पद्धत चुकीची ठरली आहे. हा प्रकार वरातीमागून घोडे दामटण्याचा असल्याचे बोलले जात आहे.अधिसंख्य पदे निर्माण केलेच नाहीलोकसेवा आयोगामार्फत १४६ वनक्षेत्रपाल येणार असल्याची माहिती वनविभागाला नव्हती. १८ महिन्यांचे परिविक्षाधीन कालावधी त्यांना पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, त्यासाठी तात्पुरती अधिसंख्य पदे निर्माण करून रिक्त पदांवर वनपालांना पदोन्नती देणे गरजेचे होते. तथापि, वन प्रशासनाने सरळ सेवा वनक्षेत्रपालांना थेट पोस्टिंग दिल्याने वनरक्षक-वनपाल संघटनेने याप्रकरणी वनविभागाचे प्रधान सचिवांकडे १९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. या प्रकाराविरूद्ध न्यायालयात जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.प्रोबेशनचा वनविभागात धुव्वावनविभागात येणारे आयएफएस किंवा इतर कनिष्ठ वनाधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर त्यांना वर्षभर किंवा दीड वर्षे प्रशिक्षण संपल्यावर प्रोबेशन केल्यावर आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावर मोक्याच्या जागेवर पोस्टिंग देण्याचे नियम आहे. मात्र, गत पाच वर्षांपासून थेट पोस्टिंग देण्याचा प्रघात पाडला आहे. हा प्रकार शासनाला आव्हान ठरणारा आहे. वनपालांना पदोन्नती देण्यासाठी सहा महिन्यांत पदोन्नती समितीची बैठक बोलावण्यात आलेली नाही. पदोन्नतीच्या कोट्यावर सरळसेवा वनक्षेत्रपालांना पोस्टिंग देण्यात आली, हे विशेष.