शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अखेर एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांना परीविक्षाधीन बनविले, वनविभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:29 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना अखेर १८ महिन्यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- गणेश वासनिकअमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना अखेर १८ महिन्यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी जबाबदारीच्या खुर्चीतून हे परीविक्षाधीन वनक्षेत्रपाल एकाच वेळी दोन्ही काम कसे सांभाळतील, हे मात्र कोडच आहे. ह्यलोकमतह्णच्या दणक्यामुळे वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.वनविभागात आय.एफ.एस. ते वनक्षेत्रपाल या पदापर्यंत १८ महिन्यांचे पदस्थापनेपूर्वीच परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून नंतर पोस्टिंग देण्यात यावे, असे शासन आदेश असतानासुद्धा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) नागपूर यांनी शासन निर्णयास केराची टोपली दाखवून एमपीएससीकडून आलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना थेट पोस्टिंग दिल्याने वनविभागात वादंग उठले होते. यासंदर्भात लोकमतने २० जानेवारी एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांना पदस्थापनेची खैरात या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) ए. आर. मंडे यांनी २० जानेवारी रोजी पत्र जारी करून पदस्थापना केलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना जबाबदारीच्या पदावरून कार्यमुक्त न करता त्या विभागात परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वनविभागाची गोची झाली. कारण १४६ वनक्षेत्रपालांमध्ये ९० च्या आसपास वनक्षेत्रपालांना प्रादेशिक व वन्यजीव विभागात पोस्टिंग देण्यात आली. त्यांना पोस्टिंग आणि प्रोबेशन एकाच वेळी कसे करता येईल, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय २९ फेब्रुवारी २०१६ व वनक्षेत्रपाल सेवा प्रवेश नियम ६ एप्रिल १९९८ प्रमाणे १८ महिन्यांचे स्वतंत्र परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करून त्यानंतरच त्यांची पोस्टिंग करणे गरजेचे आहे. नियमास बगल देऊन अगोदर पोस्टिंग आणि नंतर परीविक्षाधीन कालावधी असा प्रकार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) यांनी केलेला आहे. सदर पद्धत चुकीची ठरली आहे. हा प्रकार वरातीमागून घोडे दामटण्याचा असल्याचे बोलले जात आहे.अधिसंख्य पदे निर्माण केलेच नाहीलोकसेवा आयोगामार्फत १४६ वनक्षेत्रपाल येणार असल्याची माहिती वनविभागाला नव्हती. १८ महिन्यांचे परिविक्षाधीन कालावधी त्यांना पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, त्यासाठी तात्पुरती अधिसंख्य पदे निर्माण करून रिक्त पदांवर वनपालांना पदोन्नती देणे गरजेचे होते. तथापि, वन प्रशासनाने सरळ सेवा वनक्षेत्रपालांना थेट पोस्टिंग दिल्याने वनरक्षक-वनपाल संघटनेने याप्रकरणी वनविभागाचे प्रधान सचिवांकडे १९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. या प्रकाराविरूद्ध न्यायालयात जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.प्रोबेशनचा वनविभागात धुव्वावनविभागात येणारे आयएफएस किंवा इतर कनिष्ठ वनाधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर त्यांना वर्षभर किंवा दीड वर्षे प्रशिक्षण संपल्यावर प्रोबेशन केल्यावर आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावर मोक्याच्या जागेवर पोस्टिंग देण्याचे नियम आहे. मात्र, गत पाच वर्षांपासून थेट पोस्टिंग देण्याचा प्रघात पाडला आहे. हा प्रकार शासनाला आव्हान ठरणारा आहे. वनपालांना पदोन्नती देण्यासाठी सहा महिन्यांत पदोन्नती समितीची बैठक बोलावण्यात आलेली नाही. पदोन्नतीच्या कोट्यावर सरळसेवा वनक्षेत्रपालांना पोस्टिंग देण्यात आली, हे विशेष.