शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

१० लाख पशुधनाला वैरण, पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: March 8, 2015 00:06 IST

जनावरांसाठी दरदिवशी १५ किलो वाळलेला व ५ किलो हिरवा चारा आवश्यक आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख असल्याने २० लाख मेट्रिक टन चारा एका हंगामात लागणार आहे.

गजानन मोहोड अमरावतीजनावरांसाठी दरदिवशी १५ किलो वाळलेला व ५ किलो हिरवा चारा आवश्यक आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख असल्याने २० लाख मेट्रिक टन चारा एका हंगामात लागणार आहे. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत, अशी वैरण साठवण होण्याची सुतराम शक्यता नाही. वैरण पाणीटंचाईची झळ जाणवू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. पावसाअभावी खरीप २०१५ चा हंगाम उद्ध्वस्त झाला. जिल्हा टंचाईग्रस्त घोषित करण्यात आला. अपुऱ्या व खंडित पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडू लागले. प्रकल्पातील पाणी पिण्यास गुरांना मनाई आहे. वैरणाची भीषण टंचाई आहे. प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन न देणारी जनावरे शेतकऱ्यांना कत्तलखान्याकडे मार्गस्थ करण्याचा निरुपाय झाला आहे. खरीप २०१५च्या हंगामात पेरणीपासून पावसाने दडी मारली. पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. परिणामी आज जनावरांना वैरण उपलब्ध नाही. पाऊस कमी, जमिनीत पाण्याची कमतरता. यामुळे नदी-नाले कोरडे पडले. पाणी प्रवाहित नसल्यामुळे तुंबलेल्या पाण्यात 'जलपर्णी' वाढून गटारे निर्माण झालीत. हे पाणी जनावरांना पिण्यास अयोग्य आहे. पशुधन पाळणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी ते विक्रीला काढली आहे. त्यामुळे जनावरे बेभाव खरेदी करणे सुरू केले आहे. १९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात पाच वर्षांच्या तुलनेत बैलांची संख्या १४ हजार २५ इतकी कमी झाली. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ६.३ टक्के आहे. वैरणटंचाई, वाढती मजुरी, वर्षाकाठी लाखावर पोहचलेला घरगड्याचा महिना, हीदेखील त्यामागील कारणे आहेत. दुधाळू जनावारांच्या संख्येत मात्र दखलनीय वाढ झाली आहे.