शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

सिंचन विभागातील फाईल वर्षभरापासून प्रलंबित

By admin | Updated: November 19, 2015 00:50 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी,

कामांना ब्रेक : जिल्हा परिषदेतील प्रकार, साठवण, कोल्हापुरी बंंधारेअमरावती : जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी, साठवण बंधाऱ्यांची कामे मागील जानेवारी महिन्यात निविदा काढून मंजूर केली आहेत. मात्र, वर्ष संपत असतांना कोट्यवधी रूपयांची ही कामे केवळ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी पेंडिंग असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद लघु सिंचन विभागात उघडकीस आला आहे.जलयुक्त शिवार ही योजना राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंधारण तसेच पाणी टंचाई निवारण्याचा संकल्प केला आहे. यामधून जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने कोट्यवधी रूपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाच्या निविदा मागील जानेवारी ते एप्रिल महिन्यातच काढल्या. या निविदांना जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व आणि स्थायी समितीची मंजूरी घेणे आवश्यक आहे. दोन्ही समितीची मान्यता झाल्यानंतर ज्या निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य शिलेदारांची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने माहे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मंजुर करण्यात आलेल्या निविदा प्रक्रीयेच्या फाईल संबंधित पदाधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार योजनेतील चिखलदरा तालुक्यातील पाटकोह, कालापांढरी, धारणीतील सुसर्दा, कवडाझिरी, चिचघाट, आणी चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव अशा सहा गावात कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर करुन तब्बल ११ महिन्यांचा कालावधी लोटून गेला. या मंजूर कामांच्या फाईल केवळ स्वाक्षरीसाठी अडकल्या असल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या वरील कामाचा कार्यारंभ आदेश देता आला नाही. परिणामी ही कामे अद्यापही सुरू झाली नसून उलट स्वाक्षरी अभावी पेन्डींग पडून आहेत. दरम्यान, याबाबत तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सदर कामे त्वरित सुरू करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या फाईल निकाली काढण्याची विनंती केली होती. यावर अद्यापही शिल्लेदारांनी स्वाक्षरी केली नसल्याने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा तयारी शिवसेनेचे जिल्हा परिषद गट नेता सुधीर सूर्यवंशी यांनी घेतली आहे. याबाबत सीईओना पत्र देऊन त्वरित निर्णय मागणी केली आहे. त्यामुळे यावर मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील हे काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.