शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सिंचन विभागातील फाईल वर्षभरापासून प्रलंबित

By admin | Updated: November 19, 2015 00:50 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी,

कामांना ब्रेक : जिल्हा परिषदेतील प्रकार, साठवण, कोल्हापुरी बंंधारेअमरावती : जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी, साठवण बंधाऱ्यांची कामे मागील जानेवारी महिन्यात निविदा काढून मंजूर केली आहेत. मात्र, वर्ष संपत असतांना कोट्यवधी रूपयांची ही कामे केवळ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी पेंडिंग असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद लघु सिंचन विभागात उघडकीस आला आहे.जलयुक्त शिवार ही योजना राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंधारण तसेच पाणी टंचाई निवारण्याचा संकल्प केला आहे. यामधून जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने कोट्यवधी रूपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाच्या निविदा मागील जानेवारी ते एप्रिल महिन्यातच काढल्या. या निविदांना जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व आणि स्थायी समितीची मंजूरी घेणे आवश्यक आहे. दोन्ही समितीची मान्यता झाल्यानंतर ज्या निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य शिलेदारांची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने माहे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मंजुर करण्यात आलेल्या निविदा प्रक्रीयेच्या फाईल संबंधित पदाधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार योजनेतील चिखलदरा तालुक्यातील पाटकोह, कालापांढरी, धारणीतील सुसर्दा, कवडाझिरी, चिचघाट, आणी चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव अशा सहा गावात कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर करुन तब्बल ११ महिन्यांचा कालावधी लोटून गेला. या मंजूर कामांच्या फाईल केवळ स्वाक्षरीसाठी अडकल्या असल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या वरील कामाचा कार्यारंभ आदेश देता आला नाही. परिणामी ही कामे अद्यापही सुरू झाली नसून उलट स्वाक्षरी अभावी पेन्डींग पडून आहेत. दरम्यान, याबाबत तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सदर कामे त्वरित सुरू करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या फाईल निकाली काढण्याची विनंती केली होती. यावर अद्यापही शिल्लेदारांनी स्वाक्षरी केली नसल्याने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा तयारी शिवसेनेचे जिल्हा परिषद गट नेता सुधीर सूर्यवंशी यांनी घेतली आहे. याबाबत सीईओना पत्र देऊन त्वरित निर्णय मागणी केली आहे. त्यामुळे यावर मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील हे काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.