शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

सिंचन विभागातील फाईल वर्षभरापासून प्रलंबित

By admin | Updated: November 19, 2015 00:50 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी,

कामांना ब्रेक : जिल्हा परिषदेतील प्रकार, साठवण, कोल्हापुरी बंंधारेअमरावती : जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी, साठवण बंधाऱ्यांची कामे मागील जानेवारी महिन्यात निविदा काढून मंजूर केली आहेत. मात्र, वर्ष संपत असतांना कोट्यवधी रूपयांची ही कामे केवळ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी पेंडिंग असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद लघु सिंचन विभागात उघडकीस आला आहे.जलयुक्त शिवार ही योजना राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंधारण तसेच पाणी टंचाई निवारण्याचा संकल्प केला आहे. यामधून जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने कोट्यवधी रूपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाच्या निविदा मागील जानेवारी ते एप्रिल महिन्यातच काढल्या. या निविदांना जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व आणि स्थायी समितीची मंजूरी घेणे आवश्यक आहे. दोन्ही समितीची मान्यता झाल्यानंतर ज्या निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य शिलेदारांची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने माहे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मंजुर करण्यात आलेल्या निविदा प्रक्रीयेच्या फाईल संबंधित पदाधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार योजनेतील चिखलदरा तालुक्यातील पाटकोह, कालापांढरी, धारणीतील सुसर्दा, कवडाझिरी, चिचघाट, आणी चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव अशा सहा गावात कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर करुन तब्बल ११ महिन्यांचा कालावधी लोटून गेला. या मंजूर कामांच्या फाईल केवळ स्वाक्षरीसाठी अडकल्या असल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या वरील कामाचा कार्यारंभ आदेश देता आला नाही. परिणामी ही कामे अद्यापही सुरू झाली नसून उलट स्वाक्षरी अभावी पेन्डींग पडून आहेत. दरम्यान, याबाबत तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सदर कामे त्वरित सुरू करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या फाईल निकाली काढण्याची विनंती केली होती. यावर अद्यापही शिल्लेदारांनी स्वाक्षरी केली नसल्याने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा तयारी शिवसेनेचे जिल्हा परिषद गट नेता सुधीर सूर्यवंशी यांनी घेतली आहे. याबाबत सीईओना पत्र देऊन त्वरित निर्णय मागणी केली आहे. त्यामुळे यावर मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील हे काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.