शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पर्यटन क्षेत्र व्याघ्र परिक्षेत्रात नेण्याचा घाट

By admin | Updated: February 26, 2017 00:15 IST

विदर्भाचे एकमेव नंदनवन संपविण्याचा घाट रचला जात असून येथील संपूर्ण परिसर अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र परिक्षेत्रात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उपस्थितांमध्ये खळबळ : पर्यटन महोत्सवात नगराध्यक्षांचा आरोपचिखलदरा : विदर्भाचे एकमेव नंदनवन संपविण्याचा घाट रचला जात असून येथील संपूर्ण परिसर अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र परिक्षेत्रात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी या सर्व गोपनीय असल्या तरी यातून चिखलदरा पर्यटन नामशेष होण्याचा आरोप नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी चिखलदरा पर्यटन महोत्सवात केला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विदर्भाचे पर्यटन स्थळ पूर्वीपासूनच विकासापासून वंचित आहे. अशात या परिसराला पूर्ण व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात नेण्याचा डाव नॅशनल व्याघ्र प्राधिकरणाने रचला आहे. अत्यंत गोपनियतेने याचे कार्य केले जात असून संरक्षित असलेले वनविभागाचे क्षेत्र अतिसंरक्षित करून पूर्णत: विकास थांबविला जाणार असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी म्हटले आहे. व्याघ्र प्रकल्प की सिडको संभ्रम कायमचिखलदरा परिसरातील मोथा, लवादा, मडकी, आलाडोह, शहापूर हा परिसर सिडको अंतर्गत विकासासाठी घेण्यात आला. मात्र आता हाच परिसर वन विभागातून थेट व्याघ्र प्रकल्पात नेल्या जात आहे. व्याघ्र प्रकल्पाचे नियम अत्यंत कडक असल्याने या परिसरात पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा व इतर प्रकल्प करणे शक्य नाही. सिडको की व्याघ्र प्रकल्प अशा द्विधा मन:स्थितीत हे पर्यटन स्थळ सापडल्याचा आरोप नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)सिडकोचे गाजर, विकास शून्यचिखलदरा पर्यटन स्थळाचा विकास सर्वांगिण व्हावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बंद झालेला पर्यटन महोत्सव पुन्हा सुरू केला. येथे आ. सुनील देशमुख यांनी आणलेल्या सिडको प्राधिकरणाला गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी जाहीर केला. मात्र सिडकोतर्फे केवळ वेळ मारुन नेल्या जात आहे, तर प्रत्यक्षात आठ वर्षांत कुठल्याच कामाला सुरुवात झाली नाही, हे विशेष. परिणामी सिडकोमुळे एकप्रकारे विकास थांबल्याचे आता जाणवू लागल्याने पर्यटकांची संख्या रोडावू लागली आहे.चिखलदरा व परिसराला व्याघ्र प्रकल्पात नेण्याचा सध्या कुठल्याच प्रकारचा प्रस्ताव नाही. अजूनपर्यंत तसे निर्देश प्राप्त झाले नाहीत.- संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक, अमरावती प्रादेशिक