शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

अभिप्राय नाकारले, पुन्हा आॅफिस-आॅफिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:52 IST

भाजपक्षातील श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेल्या स्वच्छतेच्या १५० कोटींच्या कंत्राटाबाबत अंतिम निर्णय होणे अभिप्रेत असताना हा कंत्राट अधिकाऱ्यांच्याच गळ्याशी आला आहे.

ठळक मुद्देसुस्पष्ट मत न दिल्याचा ठपका : १५० कोटींचे स्वच्छता कंत्राट रेंगाळले

ऑनलाईन लोकमतअमरावती : भाजपक्षातील श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेल्या स्वच्छतेच्या १५० कोटींच्या कंत्राटाबाबत अंतिम निर्णय होणे अभिप्रेत असताना हा कंत्राट अधिकाऱ्यांच्याच गळ्याशी आला आहे. सुस्पष्ट अभिप्राय न दिल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांकडून पुन्हा स्वयंस्पष्ट अभिप्राय मागितला गेला आहे. ‘सिंगल कॉन्ट्रॅक्ट’ची ही फाईल गुरुवारी पुन्हा एकदा उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक व स्वच्छता विभागप्रमुखांकडे पाठविण्यात आली आहे. या कंत्राटाचे पुरस्कर्ते असलेल्या तुषार भारतीय यांची स्थायी समिती सभापतीपदाची कारकीर्द २८ फेब्रुवारीला संपुष्टात येत असताना पुन्हा या फाईलचा प्रवास ‘आॅफिस-आॅफिस’ सुरू झाला आहे.या कंत्राटासाठी तांत्रिक निविदेत एकच कंपनी पात्र ठरत असल्याने त्या एकमेव कंपनीचा वित्तीय लिफाफा उघडायचा की कसे? यासाठी आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखाधिकारी व स्वच्छता विभागप्रमुख व उपायुक्त सामान्य यांच्याकडून स्वयंस्पष्ट अभिप्राय मागविले होते. यातील उपायुक्तांच्या अभिप्रायाचा धागा पकडून आयुक्तांनी गुरुवारी सकाळी ती फाईल लांबलचक शेरा लिहून परतवून लावली. नियमात स्पष्टता नसल्याने अभिप्रायास मुख्य लेखापरीक्षकांनी नकार दिला होता. तर आणीबाणीची स्थिती नसल्याचे मत स्वच्छता विभागप्रमुखांनी व्यक्त केले होते. हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून नियम स्पष्ट आहेत. असे असताना त्यांनी स्पष्ट अभिप्रायासह नियमांशी सुसंगत प्रस्ताव सादर करणे अभिप्रेत आहे. मात्र केवळ वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे. असे म्हणून अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरू शकतात, असा शेरा आयुक्तांनी गुरुवारी लिहिला. त्यामुळे सिंगल कॉन्ट्रॅक्टला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे.निर्णय २८ फेब्रवारीनंतरचविद्यमान स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. ते या कंत्राटासाठी आग्रही आहेत. मात्र त्यांच्या विरोधकांचा त्यास असलेला जोरकस विरोध सर्वश्रुत आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा तो भारतीय यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरच घेण्यासाठी प्रशासनावर अनामिक दबाव आहे.मुख्य लेखाधिकाऱ्यांना अभयअन्य अधिकाऱ्यांवर आयुक्त जबाबदारी निश्चित करायला निघाले असताना त्यांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांना दिलेले अभय अनाकलनीय आहे. ज्या शासननिर्णयाचा संदर्भ दिला जात आहे, त्यातील ४.४.३.१ या तरतुदीनुसार निर्णय घेणे अभिप्रेत असल्याचा त्यांचा अभिप्राय आहे. मात्र, पुनर्निविदा करायची की कसे, याबाबत त्यांनीही सुस्पष्ट मत दिलेले नाही. मात्र, आयुक्तांनी त्यांना क्लिनचिट दिली.