शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

अपूर्ण कामांमुळे सक्कर तलाव फुटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

५० टक्के साठा ठेवण्याचे आदेश, नंदनवनात दिवसाआड पाणी, हिवाळ्यातच करावी लागणार भटकंती चिखलदरा : चिखलदरा पर्यटनस्थळासाठी महत्त्वपूर्ण सक्कर तलाव ...

५० टक्के साठा ठेवण्याचे आदेश, नंदनवनात दिवसाआड पाणी, हिवाळ्यातच करावी लागणार भटकंती

चिखलदरा : चिखलदरा पर्यटनस्थळासाठी महत्त्वपूर्ण सक्कर तलाव ५० टक्केच भरण्याचे आदेश असल्याने उन्हाळ्यापासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा मुसळधार पाऊस कोसळूनही दररोज झालेला नाही. हिवाळा लागताच येथील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होण्याचे चित्र आहे.

इंग्रजकालीन सक्कर तलावात पावसाच्या पाण्याने दुसरीकडून वाहून जात होते. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासून एक कोटी रुपये खर्चून अचलपूर येथील उपकार्यकारी अभियंता मध्यम व लघु पाटबंधारे विभागामार्फत काम केले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात ५० टक्केच काम झाल्यामुळे पाणीसाठा जास्त न होऊ देण्याचे आदेशपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला देण्यात आले आहे.

box

पाण्याचा विसर्ग सुरू, गंभीर स्थिती उद्भवणार

चिखलदऱ्याची लोकसंख्या पाच हजार असली तरी लाखोंच्या संख्येत पर्यटक येतात. त्यामुळे सक्कर तलाव अंतर्गत पाणीपुरवठा जानेवारी महिन्यापर्यंत केला जातो. त्यानंतर कालापानी साठवण तलाव आणि सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी येथील बोअरवेलमधून एक दिवसाआड पुरवठा केला जातो. परंतु, सक्कर तलावाच्या अपूर्ण कामामुळे पन्नास टक्के भरण्याचे आदेश पाहता, यंदा चिखलदऱ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ऑक्टोबरपासूनच भटकंती करावी लागणार असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

कोट

सक्कर तलाव दुरुस्तीचे काम करणाऱ्या संबंधित विभागामार्फत पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे पन्नास टक्केच पाणी ठेवून पुरवठा केला जाईल. हिवाळा व उन्हाळ्यात टंचाई भासणार आहे.

- विजय शेंडे, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण, अंजनगाव

कोट

संबंधित तलावाचे काम ५० टक्के होणे बाकी आहे. जास्त पाणी साठवण केल्यास खोदकाम आणि लिकेजमुळे कुठलीच अप्रिय घटना होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पाणी साठवण ५० टक्के करण्याचे पत्र दिले आहे.

- सचिन पाल, उपकार्यकारी अभियंता, मध्यम व लघु पाटबंधारे विभाग