शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने ...

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा

अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्र संचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंत ही केंद्रे सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज १० ते १५ जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.

कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यात मजूर, कामगार, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज दोन हजार ७२४ लोकांना जेवण दिले जाते. कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा राहत असतात. त्यातील गोरगरीब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असते. त्यातही थाळींची संख्या ही मोजकीच आहे. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या वाढविण्याची गरज आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे - २६

रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - २७२४

शहरातील शिवभोजन थाळी केंद्रे - ०५

शहरात रोज असलेल्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - १२९०

बॉक्स

पीडीएमसी रुग्णालय केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेक जण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे तेथील केंद्रावरील थाळी लवकर संपत असते. या केंद्रावर दिलेल्या वेळेनंतर आल्यास अनेक जण परत जातात.

बस स्थानक केंद्र

शहरात कामानिमित्त अनेक जण येत असतात. बसस्थानकात केंद्र असल्याने अनेक जण या केंद्रात जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच थाळीची मागणी अधिक असते. आजघडीला शासनाच्या सूचनेप्रमाणे मोफत जेवण दिले जात आहे. परिणामी मागणी अधिक असल्याने थाळी लवकरच संपते. त्यामुळे साधारणता १० ते १५ जण परत जातात.

बॉक्स

रोज २७२४ जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांचा लाभ २७२४ जण घेत असतात. वेळेनंतर गेल्यास अनेक केंद्रांवर बऱ्याचदा थाळी भेटत नाही. परिणामी आल्या पावली परत यावे लागते. एका केंद्रावर १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्रांची संख्या तसेच थाळ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.