शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने ...

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा

अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्र संचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंत ही केंद्रे सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज १० ते १५ जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.

कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यात मजूर, कामगार, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज दोन हजार ७२४ लोकांना जेवण दिले जाते. कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा राहत असतात. त्यातील गोरगरीब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असते. त्यातही थाळींची संख्या ही मोजकीच आहे. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या वाढविण्याची गरज आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे - २६

रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - २७२४

शहरातील शिवभोजन थाळी केंद्रे - ०५

शहरात रोज असलेल्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - १२९०

बॉक्स

पीडीएमसी रुग्णालय केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेक जण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे तेथील केंद्रावरील थाळी लवकर संपत असते. या केंद्रावर दिलेल्या वेळेनंतर आल्यास अनेक जण परत जातात.

बस स्थानक केंद्र

शहरात कामानिमित्त अनेक जण येत असतात. बसस्थानकात केंद्र असल्याने अनेक जण या केंद्रात जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच थाळीची मागणी अधिक असते. आजघडीला शासनाच्या सूचनेप्रमाणे मोफत जेवण दिले जात आहे. परिणामी मागणी अधिक असल्याने थाळी लवकरच संपते. त्यामुळे साधारणता १० ते १५ जण परत जातात.

बॉक्स

रोज २७२४ जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांचा लाभ २७२४ जण घेत असतात. वेळेनंतर गेल्यास अनेक केंद्रांवर बऱ्याचदा थाळी भेटत नाही. परिणामी आल्या पावली परत यावे लागते. एका केंद्रावर १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्रांची संख्या तसेच थाळ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.