शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने ...

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा

अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्र संचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंत ही केंद्रे सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज १० ते १५ जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.

कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यात मजूर, कामगार, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज दोन हजार ७२४ लोकांना जेवण दिले जाते. कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा राहत असतात. त्यातील गोरगरीब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असते. त्यातही थाळींची संख्या ही मोजकीच आहे. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या वाढविण्याची गरज आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे - २६

रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - २७२४

शहरातील शिवभोजन थाळी केंद्रे - ०५

शहरात रोज असलेल्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - १२९०

बॉक्स

पीडीएमसी रुग्णालय केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेक जण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे तेथील केंद्रावरील थाळी लवकर संपत असते. या केंद्रावर दिलेल्या वेळेनंतर आल्यास अनेक जण परत जातात.

बस स्थानक केंद्र

शहरात कामानिमित्त अनेक जण येत असतात. बसस्थानकात केंद्र असल्याने अनेक जण या केंद्रात जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच थाळीची मागणी अधिक असते. आजघडीला शासनाच्या सूचनेप्रमाणे मोफत जेवण दिले जात आहे. परिणामी मागणी अधिक असल्याने थाळी लवकरच संपते. त्यामुळे साधारणता १० ते १५ जण परत जातात.

बॉक्स

रोज २७२४ जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांचा लाभ २७२४ जण घेत असतात. वेळेनंतर गेल्यास अनेक केंद्रांवर बऱ्याचदा थाळी भेटत नाही. परिणामी आल्या पावली परत यावे लागते. एका केंद्रावर १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्रांची संख्या तसेच थाळ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.