शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने ...

दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा

अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्र संचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंत ही केंद्रे सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज १० ते १५ जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.

कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यात मजूर, कामगार, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज दोन हजार ७२४ लोकांना जेवण दिले जाते. कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा राहत असतात. त्यातील गोरगरीब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असते. त्यातही थाळींची संख्या ही मोजकीच आहे. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या वाढविण्याची गरज आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे - २६

रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - २७२४

शहरातील शिवभोजन थाळी केंद्रे - ०५

शहरात रोज असलेल्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - १२९०

बॉक्स

पीडीएमसी रुग्णालय केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेक जण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे तेथील केंद्रावरील थाळी लवकर संपत असते. या केंद्रावर दिलेल्या वेळेनंतर आल्यास अनेक जण परत जातात.

बस स्थानक केंद्र

शहरात कामानिमित्त अनेक जण येत असतात. बसस्थानकात केंद्र असल्याने अनेक जण या केंद्रात जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच थाळीची मागणी अधिक असते. आजघडीला शासनाच्या सूचनेप्रमाणे मोफत जेवण दिले जात आहे. परिणामी मागणी अधिक असल्याने थाळी लवकरच संपते. त्यामुळे साधारणता १० ते १५ जण परत जातात.

बॉक्स

रोज २७२४ जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांचा लाभ २७२४ जण घेत असतात. वेळेनंतर गेल्यास अनेक केंद्रांवर बऱ्याचदा थाळी भेटत नाही. परिणामी आल्या पावली परत यावे लागते. एका केंद्रावर १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्रांची संख्या तसेच थाळ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.