शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उपोषणकर्त्याचा जिल्हा क चेरीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:11 IST

चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून ती आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला.

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : १५ दिवसांपासून न्याय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून ती आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर अन्यायग्रस्त माजी सैनिक व शेतमजुरांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा मंगळवार हा १५ दिवस आहे. मात्र, अद्यापही उपोषणकर्त्यांना न्याय न मिळाल्याने १८ डिसेंबर रोजी उपोषणकर्त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या दालनात ठिय्या दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी हजर नसल्याने आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याशी चर्चा केली. तातडीने तोडगा काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले.जिल्हा कचेरीसमोर माजी सैनिक नारायण थोरात, अविनाश सिरसाट, बेबी जायले, संगीता सपकाळ, नंदा झोड, अनिल बोदुले, देविदास बोदुले, रामदास बोदुले, दिवाकर बोदुले आदींनी उपोषण थाटले. मुख्य सचिवांच्या परिपत्रकाला तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी केराची टोपली दाखविल्याचा आरोप करीत उपोषणकर्त्यांनी जमिनीचा ताबा मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ११ डिसेंबर रोजी दिलेल्या आश्वासनानंतरही काहीच तोडगा न काढल्याने संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र, जिल्हाधिकारी हजर नव्हते. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याशी उपोषणकर्त्यांनी चर्चा केली. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडून तोडगा काढण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या, अशी माहिती मिळाली आहे.दरम्यान, मागील १५ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या माजी सैनिकांसह शेतमजुरांच्या मागण्या त्वरित मान्य करू न उपोषण सोडवावे आणि त्यांना शासनाने दिलेल्या जमिनीवर ताबा करू देणाºया व बहाल जमिनीच्या कागदपत्रात घोळ करणाºया शासकीय कर्मचारी व अधिकाºयांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी इंटननॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश खोडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.