शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

मोर्शी : कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा खतांच्या वाढीव किमतीमुळे अजून अडचणीत सापडला आहे. काही दिवसांत रासायनिक ...

मोर्शी : कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा खतांच्या वाढीव किमतीमुळे अजून अडचणीत सापडला आहे. काही दिवसांत रासायनिक खतांच्या किमती वाढल्या असून, शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे उत्पादनाचा खर्च वाढल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, जिल्ह्यात मशागतीची कामे सुरू आहेत. गतवर्षी अतिपाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर सरासरी अधिकच वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. केंद्र शासनाने खतांच्या वाढविलेल्या किमती तात्काळ कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे करण्यात आली.

पुढील आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने खतांच्या किमतीत प्रतीबॅग जवळपास ३५० ते ७०० रुपये वाढ केली आहे. आधीच महागाई वाढत आहे. त्यातच आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर कहरच केला आहे. सध्या १०० रुपये प्रतिलिटर पेट्रोल, तर डिझेलही ९२ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या विविध कामांची देखील भाडेवाढ झाली आहे. मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती मशागतीसाठी गतवर्षापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे.

कोट १

यंदा पुन्हा रासायनिक खताचे दर वाढल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

- रुपेश वाळके, उपाध्यक्ष राकाँ, मोर्शी

कोट २

खतांची दरवाढ झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण सुरू आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून वाढलेल्या पेट्रोल - डिझेलच्या किमती व रासायनिक खताच्या किमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- नरेंद्र जिचकार, अध्यक्ष, राकाँ, मोर्शी