शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार कृषियंत्र, अवजारे

By admin | Updated: July 24, 2016 00:09 IST

राष्ट्रीय अन्न सुरषा व कृषि यांत्रिकीकरण या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे व साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे.

दिलासा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा, कृषी यांत्रिकीकरण अभियानअमरावती : राष्ट्रीय अन्न सुरषा व कृषि यांत्रिकीकरण या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे व साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.जिल्ह्यात प्राप्त लक्षांकानुसार शेतकऱ्यांना पॉवर, नॅपसॅक स्प्रेपंप, बहुपीक पेरणी लागवड यंत्र, ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्र रोटाव्हेटर, बहुपिक पेरणी मळणी यंत्र, तुषार संच, पंपसंच, पाईप (पिव्हीसी व एचडीपीई) कल्टीव्हेटर, गादीवाफा लागवड यंत्रण, बीबीएफ यंत्र व सरी वरंबा लागवड यंत्र याचा अनुदानावर लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकरी लाभार्थींना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे कृषी अधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीनुसार २० दिवसाच्या आत पूर्ण रक्कम भरून खरेदी करावी लागणार आहे. देयकासह प्राप्त अहवालानुसार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे शासनाने निवड केलेल्या उत्पादकांची कृषियंत्रे अनुदानावर देण्यात येतील. यामध्ये ट्रॅक्टर, औजारे, पिक संरक्षक उपकरणे, प्रक्रिया सयंत्रे, ही अनु. जाती, जमाती व अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख २५ हजार व इतर शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार ते १ लाख अनुदान देय आहे. कृषी अवजारासाठी अनु. जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या ५० टक्के व ईतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान देय आहे. (प्रतिनिधी)