शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

- तर शेतकरी कुटुंबीयांसह आत्महत्या करतील

By admin | Updated: August 31, 2016 00:06 IST

यवतमाळ व अमरावती जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी सर्वदूर गाजत असताना...

वीरेंद्र जगताप यांचे भाकित : नागपूर- मुंबई संचार द्रुतगती महामार्गाला विरोधअमरावती : यवतमाळ व अमरावती जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी सर्वदूर गाजत असताना या जिल्ह्यातील काही गावांमधून नागपूर - मुंबई संचार द्रुतगती महामार्ग निर्मितीचा हट्टहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. या महामार्ग निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे कल्याण होईल. महाराष्ट्र देशात सर्वात पुढारलेले राज्य बनेल, असे स्वप्न मुख्यमंत्री दाखवीत आहे. मात्र दोन, चार एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या महामार्गामुळे प्रकल्प बाधित होऊन कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या करावी लागेल, असे भाकीत आ. वीरेंद्र जगताप यांनी वर्तविले आहे. मात्र, काहीही झाले तरी मतदार संघातून या महामार्गाची निर्मिती होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.आ. वीरेंद्र जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात ३६ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेलू येथील शेतकरी पिता-पुत्रांनी नापिकी, आर्थिक विवंचना आणि कर्जाला कंटाळून एकाच झाडाला दोघांनी गळफास लावून जीवनयात्रा संपविली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर - मुंबई शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे जगणे सुकर होणार असे स्वप्ने दाखवीत आहेत. दोन, चार एकर शेतीच्या भरोवशावर शेतकऱ्यांचे जगणं असताना ते या महामार्ग निर्मितीसाठी ताब्यात घेतल्यास प्रकल्पग्रस्तांना बाधित व्हावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महामार्ग निर्मितीचा अट्टाहास केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवणार याचे भान मुख्यमंत्र्यांनी ठेवावे, असे आ. वीरेंद्र जगताप यांचे म्हणणे आहे. महामार्ग निर्मितीच्या सर्वेक्षणानुसार धामणगाव तालुक्यातील आष्टगाव येथून या महामार्गाची सुरुवात होणार आहे. याला आष्टगाववासियांचा विरोध आहे. तसेच २०१३ च्या भूमिअधिग्रहण कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या संमतीचा नियम लक्षात घेतला जात नाही. तरीदेखील मुख्यमंत्री या महामार्गाच्या निर्मितीसाठी आग्रही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही तर राज्य शासनाची हुकूमशाहीच आहे, असा आरोप आ. जगताप यांनी केला.नव्या भूमिअधिग्रहण कायद्यानुसार शेतकरी भागिदारीच्या (पीपीपी) प्रकल्पांसाठी ७० टक्के बाधित शेतजमीन मालकांची संमती कायदेशीर आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भागिदारीबाबत मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही उत्तर नाहीत. किंबहुना प्रशासकीय अधिकारी यासंदर्भात मोकळेपणे बोलत नाही. त्यामुळे या महामार्ग निर्मितीत नेमके दडले काय? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे. या महामार्गाला समांतर नागपूर- जालना- औरंगाबाद आणि नागपूर- मुंबई महामार्ग क्र. ६ असताना नवीन महामार्गाच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचा अट्टाहास का, असा प्रश्न आ. वीरेंद्र जगताप, तुकाराम भस्मे, केशवराव तांदुळकर, भानुदास मंदुरकर आदी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)विभागीय आयुक्तालयावर १४ सप्टेंबर रोजी धडकनागपूर - मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शिवणी रसुलापूर येथून निर्मित करू नये, यासाठी सर्वपक्षीय अधिग्रहण विरोधी संघर्ष समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत अमरावती, वाशीम व बुलडाणा येथील शेतकरी, शेतमजुरांचा सहभाग करण्यात आला आहे. महामार्ग निर्मितीस विरोध दर्शविण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देऊन शेतकरी भूमिअधिग्रहणाला विरोध करणार असल्याचे आ. वीरेंद्र जगताप यांनी कळविले आहे.