शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच

By admin | Updated: June 19, 2015 00:41 IST

मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, ....

कावली वसाड : मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, रबी पीक उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. आता शेती कशाच्या भरवशावर करावी, हा प्रश्न पडला आहे. तरीदेखील शेतकरी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत. आज ना उद्या मार्ग सापडेल आणि खरिपाची पेरणी होईल, या आशेवर शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे.भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी पूर्णत: आर्थिकदृष्ट्या खचून गेला आहे. शासनाचे धोरणही शेतकरीविरोधी असून व्यापारी आणि उद्योजकाच्या हिताचे असल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे.हाडाचे पाणी करुन काबाडकष्ट करून तसेच उधार, उसणवारीने पैसे आणून मागील वर्षी पेरणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लावलेला खर्चसुद्धा निघाले नाही आणि उरल्या-सुरल्या मालाला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणलेल्या कर्जाचीदेखील परतफेड करणे शक्य झाले नाही. आता बी-बियाणे आणावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात खासगी सावकारांकडे धाव घेऊन व्याजाने पैसे आणल्याचे समजते.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शेतकरी अधिक प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे खासगी अवैध सावकारही आहे. मात्र याची वाच्यता केली जात नाही. कारण आपल्या शेतीला पैसा दिला कोण्या संबंधाने, हे अधिकाऱ्याला किंवा सामाजिक काम करणाऱ्याला सांगितले तर आपले काम होणार नाही. त्यामुळे शेतकरी व्याजाच्या दरात मोठ्या प्रमाणात भरडला जात असल्याचे ग्रामीण भागाचे चित्र आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. कधी उत्पन्न होते. परंतु भाव मिळत नाही आणि भाव मिळाले तर उत्पन्न कमी, पिकांची स्थिती चांगली तर निसर्ग साथ देत नाही, अशा परिस्थितीतून शेतकऱ्याला वाट काढवी लागत आहे. त्यामुळे अवैध सावकारी कर्जाचा डोंगर वाढतो आहे. कारण मागील उधारी परत न केल्याने यावर्षी कर्जही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ते संकटात आहेत.