शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच

By admin | Updated: June 19, 2015 00:41 IST

मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, ....

कावली वसाड : मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, रबी पीक उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. आता शेती कशाच्या भरवशावर करावी, हा प्रश्न पडला आहे. तरीदेखील शेतकरी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत. आज ना उद्या मार्ग सापडेल आणि खरिपाची पेरणी होईल, या आशेवर शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे.भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी पूर्णत: आर्थिकदृष्ट्या खचून गेला आहे. शासनाचे धोरणही शेतकरीविरोधी असून व्यापारी आणि उद्योजकाच्या हिताचे असल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे.हाडाचे पाणी करुन काबाडकष्ट करून तसेच उधार, उसणवारीने पैसे आणून मागील वर्षी पेरणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लावलेला खर्चसुद्धा निघाले नाही आणि उरल्या-सुरल्या मालाला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणलेल्या कर्जाचीदेखील परतफेड करणे शक्य झाले नाही. आता बी-बियाणे आणावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात खासगी सावकारांकडे धाव घेऊन व्याजाने पैसे आणल्याचे समजते.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शेतकरी अधिक प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे खासगी अवैध सावकारही आहे. मात्र याची वाच्यता केली जात नाही. कारण आपल्या शेतीला पैसा दिला कोण्या संबंधाने, हे अधिकाऱ्याला किंवा सामाजिक काम करणाऱ्याला सांगितले तर आपले काम होणार नाही. त्यामुळे शेतकरी व्याजाच्या दरात मोठ्या प्रमाणात भरडला जात असल्याचे ग्रामीण भागाचे चित्र आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. कधी उत्पन्न होते. परंतु भाव मिळत नाही आणि भाव मिळाले तर उत्पन्न कमी, पिकांची स्थिती चांगली तर निसर्ग साथ देत नाही, अशा परिस्थितीतून शेतकऱ्याला वाट काढवी लागत आहे. त्यामुळे अवैध सावकारी कर्जाचा डोंगर वाढतो आहे. कारण मागील उधारी परत न केल्याने यावर्षी कर्जही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ते संकटात आहेत.