शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच

By admin | Updated: June 19, 2015 00:41 IST

मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, ....

कावली वसाड : मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, रबी पीक उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. आता शेती कशाच्या भरवशावर करावी, हा प्रश्न पडला आहे. तरीदेखील शेतकरी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत. आज ना उद्या मार्ग सापडेल आणि खरिपाची पेरणी होईल, या आशेवर शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे.भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी पूर्णत: आर्थिकदृष्ट्या खचून गेला आहे. शासनाचे धोरणही शेतकरीविरोधी असून व्यापारी आणि उद्योजकाच्या हिताचे असल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे.हाडाचे पाणी करुन काबाडकष्ट करून तसेच उधार, उसणवारीने पैसे आणून मागील वर्षी पेरणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लावलेला खर्चसुद्धा निघाले नाही आणि उरल्या-सुरल्या मालाला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणलेल्या कर्जाचीदेखील परतफेड करणे शक्य झाले नाही. आता बी-बियाणे आणावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात खासगी सावकारांकडे धाव घेऊन व्याजाने पैसे आणल्याचे समजते.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शेतकरी अधिक प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे खासगी अवैध सावकारही आहे. मात्र याची वाच्यता केली जात नाही. कारण आपल्या शेतीला पैसा दिला कोण्या संबंधाने, हे अधिकाऱ्याला किंवा सामाजिक काम करणाऱ्याला सांगितले तर आपले काम होणार नाही. त्यामुळे शेतकरी व्याजाच्या दरात मोठ्या प्रमाणात भरडला जात असल्याचे ग्रामीण भागाचे चित्र आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. कधी उत्पन्न होते. परंतु भाव मिळत नाही आणि भाव मिळाले तर उत्पन्न कमी, पिकांची स्थिती चांगली तर निसर्ग साथ देत नाही, अशा परिस्थितीतून शेतकऱ्याला वाट काढवी लागत आहे. त्यामुळे अवैध सावकारी कर्जाचा डोंगर वाढतो आहे. कारण मागील उधारी परत न केल्याने यावर्षी कर्जही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ते संकटात आहेत.