शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

दरदिवशी शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली दडी, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन यामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वैतागून मृत्यूला कवटाळत आहे.

कधी संपणार दुष्टचक्र ? : तीन महिन्यांत ९२ आत्महत्याअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली दडी, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन यामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वैतागून मृत्यूला कवटाळत आहे. यंदा जून ते सप्टेंबर या ९१ दिवसांत ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा पाश आवळला. शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सुरू असलेले शासनाचे प्रयत्न मुळात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.राज्यात १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यंदाच्या जुलै महिन्यात ३६, आॅगस्टमध्ये ४१ व सप्टेंबर महिन्यात १६ अशाप्रकारे ९१ दिवसांत ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे. मागील वर्षी २०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा मात्र आॅगस्ट महिन्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा पार झाला आहे. सप्टेंबर अखेर २१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी १४५ प्रकरणे निकषात पात्र ठरली तर ४२ अपात्र ठरली असून २९ प्रकरणे प्रलंबित आहेत.यंदा आॅगस्टअखेर कोरडवाहू क्षेत्रात पीक न झाल्यामुळे ७० शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यापैकी ६० प्रकरणे पात्र ठरली. कालव्याअभावी ५, बोअरअभावी ६, सिंचनासाठी विहीरी नसल्याने ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३० प्रकरणे निकषांमध्ये पात्र ठरलीत. कौटुंबिक कलहामुळे ६, खासगी कर्जामुळे २, आजारपणामुळे ७ व ईतर कारणांमुळे ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)अत्यल्प भूधारकांच्या सर्वाधिक आत्महत्याजानेवारी ते आॅगस्टअखेर २०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यापैकी ७० आत्महत्या या अडीच एकराच्या आतील शेतकऱ्यांच्या म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अल्पभूधारक (५ एकर) ३२ व बहुभूधारक ४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे.आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक आत्महत्याजिल्ह्यात जानेवारी २००१ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान सर्वाधिक २६१ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झाल्या आहेत. यंदादेखील सर्वाधिक ४१ आत्महत्या आॅगस्ट महिन्यातच झाल्या आहेत. अल्पभूधारक व युवा शेतकऱ्यांना तणावातून ‘रिलॅक्स’ करण्यासाठी उपाययोजना सुरू करणार आहोत. यासाठी गाव समिती स्थापन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आरोग्य व रेशन आदी सुविधा दिल्या जात आहेत.- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वालंबन मिशन.