शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दरदिवशी शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली दडी, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन यामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वैतागून मृत्यूला कवटाळत आहे.

कधी संपणार दुष्टचक्र ? : तीन महिन्यांत ९२ आत्महत्याअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली दडी, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन यामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वैतागून मृत्यूला कवटाळत आहे. यंदा जून ते सप्टेंबर या ९१ दिवसांत ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा पाश आवळला. शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सुरू असलेले शासनाचे प्रयत्न मुळात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.राज्यात १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यंदाच्या जुलै महिन्यात ३६, आॅगस्टमध्ये ४१ व सप्टेंबर महिन्यात १६ अशाप्रकारे ९१ दिवसांत ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे. मागील वर्षी २०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा मात्र आॅगस्ट महिन्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा पार झाला आहे. सप्टेंबर अखेर २१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी १४५ प्रकरणे निकषात पात्र ठरली तर ४२ अपात्र ठरली असून २९ प्रकरणे प्रलंबित आहेत.यंदा आॅगस्टअखेर कोरडवाहू क्षेत्रात पीक न झाल्यामुळे ७० शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यापैकी ६० प्रकरणे पात्र ठरली. कालव्याअभावी ५, बोअरअभावी ६, सिंचनासाठी विहीरी नसल्याने ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३० प्रकरणे निकषांमध्ये पात्र ठरलीत. कौटुंबिक कलहामुळे ६, खासगी कर्जामुळे २, आजारपणामुळे ७ व ईतर कारणांमुळे ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)अत्यल्प भूधारकांच्या सर्वाधिक आत्महत्याजानेवारी ते आॅगस्टअखेर २०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यापैकी ७० आत्महत्या या अडीच एकराच्या आतील शेतकऱ्यांच्या म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अल्पभूधारक (५ एकर) ३२ व बहुभूधारक ४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे.आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक आत्महत्याजिल्ह्यात जानेवारी २००१ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान सर्वाधिक २६१ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झाल्या आहेत. यंदादेखील सर्वाधिक ४१ आत्महत्या आॅगस्ट महिन्यातच झाल्या आहेत. अल्पभूधारक व युवा शेतकऱ्यांना तणावातून ‘रिलॅक्स’ करण्यासाठी उपाययोजना सुरू करणार आहोत. यासाठी गाव समिती स्थापन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आरोग्य व रेशन आदी सुविधा दिल्या जात आहेत.- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वालंबन मिशन.