शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा

By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST

बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले.

बडनेरा : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागात मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. कौटुंबिक हिस्से वाटण्या, शेतीला लागणारा खर्च व उत्पन्नाचा मेळ बसविणे कठीण होत चालल्याने शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा, असे आवाहन के.ए.धापके यांनी केले.काटेकोर शेती विकास केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विज्ञान केंद्र (दुर्गापूर)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार-रविवारी आयोजित द्वि-दिवसीय हरितगृह तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला संशोधक विजय कानडे, सुनील भंडारे, हेमंत मुजुमदार, सचिन मोरे, दुर्गापूर केंद्राचे प्रफुल्ल महल्ले, के.पी. सिंग, ओ.एल. शेखावत, शरद अवचट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना धापके म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा शेतीच्या लहान तुकड्यात व्यवस्थित वापर करता येतो. हरितगृह हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. फुल पिके, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान व परदेशी भाजीपाला लागवड याविषयी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल महल्ले तर आभार सचिन पिंजरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रतापराव जायले, विजय शिरभाते, अर्चना काकडे, संतोष देशमुख, किशोर अजबे, सचिन आखरे, सोनल बोंद्रे, दिनकर कामखेडे, लक्ष्मण भजबुजे, ज्ञानेश्वर जिराफे यांनी परिश्रम घेतले. हरितक्रांती तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराला अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ यासह इतरही जिल्ह्यातील मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना इतर महत्त्वपूर्ण विषयांवर सुध्दा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.