शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शेतकऱ्यांनी शेतीला उपयुक्त पशू जोपासना करावी

By admin | Updated: January 17, 2016 00:06 IST

पशुपालनाचा खर्च परवडत नाही म्हणून पशू पालनाची मानसिकता शेतकऱ्यांकडे राहिली नाही.

ना. प्रवीण पोटे : प्रदर्शनी, शेतकरी मेळाव्याप्रसंगी प्रतिपादनअमरावती : पशुपालनाचा खर्च परवडत नाही म्हणून पशू पालनाची मानसिकता शेतकऱ्यांकडे राहिली नाही. मात्र गाई-म्हैशी पालनातून घरातील स्त्रियांच्या हातात खेळता पैसा राहतो. त्यातून ती स्त्री घराचा थोडातरी खर्च भागवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला उपयुक्त पशू जोपासना करावी, असे आवाहन उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. शनिवारी तळेगाव दशासर येथे आयोजित पशू प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. वीरेंद्र जगताप, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, पं.स.सभापती झाडे, धामणगाव रेल्वे पंसचे सभापती गणेश राजनकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय मुळे, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, सचिन पाटील, प्रीती ढोबळे, रोशन कंगाले, संगीता निमकर, वनिता राऊत, मनोज बानोडे, अब्दुल बशीर शेख हुसेन, कृषक मंडळाचे अध्यक्ष विनोद देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अशोक हजारे उपस्थित होते. मुद्रा योजनेच्यामार्फत तरुणांनी उद्योगासाठी अर्थसहाय्य घेऊन स्वत:ची प्रगती साधावी, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार, पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान याविषयीचा धावता आढावा घेतला. यावेळी समाधान शिबिरांतर्गत लागलेल्या वेगवगेळ्या स्टॉलना पालकमंत्र्यांनी भेट दिली. आ.वीरेंद्र जगताप यांनी तळेगाव दशासर येथील तिनशे वर्षांपासूनची शंकरपटांची परंपरा पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली. जिल्ह्यात एकूण लोकसंख्या २८ लक्ष असून त्यापैकी फक्त २ लाख ४८ हजार लोकांकडेच गायी-म्हैशी आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले की, शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही. तेव्हा शेतीला कुक्कुटपालनाचे, मेंढीपालनाचा पूरक व्यवसाय करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)