शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांचे ‘शोले’

By admin | Updated: May 31, 2017 00:25 IST

तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना एक वर्षापासून मंजूर झालेले अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने...

प्रहारचे नेतृत्व : पोलिसांचा तगडा बंदोबस्तलोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना एक वर्षापासून मंजूर झालेले अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी प्रहारचे विजय पाचारे यांच्या नेतृत्वात हिवरखेड येथील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी पद्धतीने आंदोलन केले. गारपीटग्रस्तांना मंजूर झालेले अनुदान तत्काळ देण्यात यावे, उष्ण तापमानामुळे संत्रा, आंबिया फळांची गळती होऊन अतोनात नुकसान झाले. अश्या शेतकऱ्यांना शासनाने सर्व्हे करून हेक्टरी ५० हजार रूपये अनुदान जाहीर करावे. खरीप हंगामासाठी सरसकट शेतकऱ्यांना १५ दिवसाच्या आता बिनाअट कर्जपुरवठा करण्यात यावा. हे अभिनव आंदोलन सकाळी ९ वाजतापासून सुरू करण्यात आले. दरम्यान संतप्त आंदोलकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाही, तोपर्यंत शेतकरी पाण्याचे टाकीवरून खाली उतरणार नाही. जर जिल्हाधिकारी यांनी हिवरखेड येथे येऊन शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या निकाली काढतील तरच टाकीवरून खाली उतरू किंवा आत्मदहन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, ठाणेदार नंदकिशोर शर्मा हे आपल्या अधिनस्त पोलीस ताफ्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहून तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या रास्त असून त्या मी शासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो, असे लेखी आश्वासन देऊन १५ दिवसांच्या आत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल, असेसुद्धा लेखी आश्वासन दिल्याने शेवटी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.