शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बियाणे जमिनीत, नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

धारणी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चार-पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून बियाणे शेतात टाकण्यात आले. ...

धारणी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चार-पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून बियाणे शेतात टाकण्यात आले. मात्र, चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आशेने पाहू लागले आहे.

रोज सकाळी आकाशात पावसाचे ढग घोंगावत असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात संध्याकाळ होता होता आकाश निरभ्र होत चालले असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मेळघाटातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात यंदासुद्धा सोयाबीनला पहिली पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ मक्‍याच्या पेरणीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अशातच पावसाने मृग नक्षत्रात ८ ते १३ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला. दरम्यान, पावसाने आता मोकळीक दिली आहे. आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. अनेकांची बियाणे उगवले आहे, तर काही शिवारात त्यांनी जमिनीबाहेर डोके काढले आहे. पावसाने आणखी उशीर केल्यास हजेरी न लावल्यास बियाणे खराब होऊन दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती बळीराजा व्यक्त करीत आहे.

दुसरीकडे कृषी विभागाकडून समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला वारंवार देण्यात येत आहे. तथापि, ऐनवेळी पावसाने उसंत न दिल्यास पेरणीत अडचण निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. मेळघाटात खरीप हंगामात धान, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिके घेण्यात येतात. प्रामुख्याने सोयाबीन, धान, तूर व मका यंदा शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहेत.