शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

बियाणे कंपन्यांचा शेतकऱ्यांना ठेंगा

By admin | Updated: January 6, 2015 22:51 IST

खरीप २०१४ च्या हंगामात उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन विषयी ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी फक्त ७८ प्रकरणांत शेतकऱ्यांना रोख किंवा बियाणे स्वरुपात मदत मिळाली.

वांझोटे सोयाबीन बियाणे : ४९८ पैकी ७८ प्रकरणांत परतावा; ४२० शेतकरी प्रतीक्षेतगजानन मोहोड - अमरावतीखरीप २०१४ च्या हंगामात उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन विषयी ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी फक्त ७८ प्रकरणांत शेतकऱ्यांना रोख किंवा बियाणे स्वरुपात मदत मिळाली. ४२० शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना ठगविणाऱ्या महाबीज सह अन्य १५ बियाणे कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव कृषी विभागाने कृषी आयुक्तांकडे पाठविला. सर्व प्रकरणे न्यायालयीन कारवाईसाठी पात्र असताना केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल केले आहे. कृषी विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना ठगविणाऱ्या महाबीजसह अन्य १५ कंपन्यांनी भरपाईसाठी शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. जिल्ह्यात उगवणशक्ती नसल्याबाबत सोयाबीनच्या ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. २७० प्रकरणात तक्रार निवारण समितीने बियाणे सदोष ठरविले आहेत. ९० नमुने प्रयोगशाळेत नापास ठरले. अप्रमाणित बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली तरीही निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर खटले दाखल करण्यास विलंब का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. खरीप हंगाम संपला रबीची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. पंचनामे करणाऱ्या तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे निकृष्ट बियाण्यांची केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. केवळ २८ शेतकऱ्यांना ४६.५० क्विंटल व क्षेत्र ११४.६० हेक्टरसाठी बियाणे परतावा कंपन्याकडून देण्यात आला आहे तर ५० शेतकऱ्यांना १२२.८ हेक्टर क्षेत्राकरिता ७ लक्ष ३५ हजारांची मदत मिळावी. प्राप्त तक्रारींपैकी किमान १०० प्रकरणे न्यायालयीन कारवाईसाठी पात्र असताना कृषी विभागाने केवळ २१ प्रकरणांत खटले दाखल केले आहे. उर्वरित प्रकरण कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे प्रलंबित आहे.यंदाच्या खरीप हंगामात उगवणशक्तीची महाबीजदेखील हमी देऊ शकले नाही. किंबहुना निकृष्ट बियाण्यांच्या सर्वाधिक तक्रारी महाबीज कंपनीविरोधात आहे. अन्य १५ कंपन्यांचे बियाणे वांझोटे निघाले. पेरलेले बियाणे मिळाले नाही म्हणून दुबार व तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. शेतकऱ्यांनी ज्या कंपनीचे बियाणे पेरले त्या कंपनीच्या बॅग व पावती हा पुरावा सादर करून कृषी विभागाकडे तक्रारी केल्यात. महाबीजचे कृषी अधिकाऱ्यांशी संगनमत सोयाबीनची उगवणशक्ती नसलेल्या बियाणे कंपन्याविषयक सर्वाधिक तक्रारी पूर्णानगर परिसरातील २०० वर शेतकऱ्यांच्या आहे. सोयाबीन बियाण्यांचे प्लॉट क्र. ४०१५, ४०३४ व ४००९ हे वाण क्र. ३३५ चे आहे. बीज प्रमाणीकरण केंद्र परभरी येथील कृषी अधिकाऱ्यांनी या बियाण्यांची उगवणशक्ती ७५ टक्के दर्शविली. हेच बियाणे नागपूर येथील प्रयोगशाळेत केवळ ११ टक्के उगवणशक्तीचे निघाले असल्याने महाबीज व कृषी अधिकाऱ्यांचे संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते.बॅगच्या टॅगवर ‘त्या’ अधिकाऱ्याची स्वाक्षरीमहाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या कृषी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व उगवणशक्तीचा उल्लेख बियाण्यांच्या प्रत्येक बॅगच्या टॅगवर आहे. ७१ टक्के उगवणशक्ती दर्शविलेल्या लॉटमधील बियाण्यांची उगवणशक्ती केवळ ११ टक्केच होती हे नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘त्या’ कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी पूर्णानगर येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.