शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांनी केली पालेभाज्यांची निर्मिती

By admin | Updated: April 11, 2016 00:10 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ....

विकास, समृद्धीकडे वाटचाल : योग्य नियोजनामुळेच शेती व्यवसाय शक्यनितीन टाले  कावली वसाडधामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून अप्पर वर्धा धरणाचे पाणी व बगाजी सागरमुळे पाण्याची आवक वाढल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. या गावाची ओळख भाजीपाला उत्पादन करणारे गाव अशी झाली आहे. त्यामुळे दाभाडा गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पीक घेणे कठीण झाले. लागलेले पैसे मिळणे कठीण झाले. त्यामुळे दाभाडा येथील शेतकरी नंदकिशोर कोकटे यांनी १० एकर शेतात वांगी, टमाटर, केळी ही पिके लावून योग्य त्याची दखल घेत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वत: एक चारचाकी वाहन घेतले आणि वर्धा, अमरावती, पुलगाव, आर्वी, धामणगाव येथील बाजारपेठेत विकण्यास शेतकरी नेत आहे. महादेव हलवारे यांनीही आलू, मका यासारखी पिके घेऊन एक आदर्श ठेवला. दिलीप वसू हे शेतकरी भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ते स्वत: पालेभाज्यांची विक्री करतात, हे विशेष. एकीकडे ज्वारीसारखे पीक वन्यप्राण्यांमुळे फस्त होत असल्याने या पिकाकडे कुणीही पाहत नव्हते. मात्र, राजू बुगल यांनी विक्रमी ज्वारीचे पीक घेतले आहे. कमलकिशोर पनपालीया यांनी आपल्या शेतात लसून आणि कांद्याची लागवड केली. विक्रमी पीक झाल्याने अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. विजय पनपालिया यांनी आपल्या शेतात केळी, मिरची, टरबूज ही पिके घेण्याची सुरुवात केली. परंतु यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तरीही हार न मानता त्या पिकांची योग्य देखभाल करून तसेच पाण्याचे वेळेवर नियोजन करून पीक घेण्यासाठी सज्ज झाले. सोबतच अनेक शेतकरी आपल्या परीने शेतात सांभार, पालक, ढेमस, काकडी, भेंडी यासारखी पिके लावून संसाराचा गाडा ओढत आहे. अनेक शेतकरी शेती सोबतच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. गावातून दररोज ३०० ते ४०० लिटर दूध धामणगाव रेल्वेच्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जाते. गाई आणि म्हशींची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आहे. पालेभाज्यांप्रमाणे दुग्ध व्यवसायाकडे गावातील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.