शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

शेतकऱ्यांनी केली पालेभाज्यांची निर्मिती

By admin | Updated: April 11, 2016 00:10 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ....

विकास, समृद्धीकडे वाटचाल : योग्य नियोजनामुळेच शेती व्यवसाय शक्यनितीन टाले  कावली वसाडधामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून अप्पर वर्धा धरणाचे पाणी व बगाजी सागरमुळे पाण्याची आवक वाढल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. या गावाची ओळख भाजीपाला उत्पादन करणारे गाव अशी झाली आहे. त्यामुळे दाभाडा गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पीक घेणे कठीण झाले. लागलेले पैसे मिळणे कठीण झाले. त्यामुळे दाभाडा येथील शेतकरी नंदकिशोर कोकटे यांनी १० एकर शेतात वांगी, टमाटर, केळी ही पिके लावून योग्य त्याची दखल घेत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वत: एक चारचाकी वाहन घेतले आणि वर्धा, अमरावती, पुलगाव, आर्वी, धामणगाव येथील बाजारपेठेत विकण्यास शेतकरी नेत आहे. महादेव हलवारे यांनीही आलू, मका यासारखी पिके घेऊन एक आदर्श ठेवला. दिलीप वसू हे शेतकरी भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ते स्वत: पालेभाज्यांची विक्री करतात, हे विशेष. एकीकडे ज्वारीसारखे पीक वन्यप्राण्यांमुळे फस्त होत असल्याने या पिकाकडे कुणीही पाहत नव्हते. मात्र, राजू बुगल यांनी विक्रमी ज्वारीचे पीक घेतले आहे. कमलकिशोर पनपालीया यांनी आपल्या शेतात लसून आणि कांद्याची लागवड केली. विक्रमी पीक झाल्याने अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. विजय पनपालिया यांनी आपल्या शेतात केळी, मिरची, टरबूज ही पिके घेण्याची सुरुवात केली. परंतु यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तरीही हार न मानता त्या पिकांची योग्य देखभाल करून तसेच पाण्याचे वेळेवर नियोजन करून पीक घेण्यासाठी सज्ज झाले. सोबतच अनेक शेतकरी आपल्या परीने शेतात सांभार, पालक, ढेमस, काकडी, भेंडी यासारखी पिके लावून संसाराचा गाडा ओढत आहे. अनेक शेतकरी शेती सोबतच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. गावातून दररोज ३०० ते ४०० लिटर दूध धामणगाव रेल्वेच्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जाते. गाई आणि म्हशींची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आहे. पालेभाज्यांप्रमाणे दुग्ध व्यवसायाकडे गावातील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.