शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी केली पालेभाज्यांची निर्मिती

By admin | Updated: April 11, 2016 00:10 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ....

विकास, समृद्धीकडे वाटचाल : योग्य नियोजनामुळेच शेती व्यवसाय शक्यनितीन टाले  कावली वसाडधामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून अप्पर वर्धा धरणाचे पाणी व बगाजी सागरमुळे पाण्याची आवक वाढल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. या गावाची ओळख भाजीपाला उत्पादन करणारे गाव अशी झाली आहे. त्यामुळे दाभाडा गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पीक घेणे कठीण झाले. लागलेले पैसे मिळणे कठीण झाले. त्यामुळे दाभाडा येथील शेतकरी नंदकिशोर कोकटे यांनी १० एकर शेतात वांगी, टमाटर, केळी ही पिके लावून योग्य त्याची दखल घेत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वत: एक चारचाकी वाहन घेतले आणि वर्धा, अमरावती, पुलगाव, आर्वी, धामणगाव येथील बाजारपेठेत विकण्यास शेतकरी नेत आहे. महादेव हलवारे यांनीही आलू, मका यासारखी पिके घेऊन एक आदर्श ठेवला. दिलीप वसू हे शेतकरी भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ते स्वत: पालेभाज्यांची विक्री करतात, हे विशेष. एकीकडे ज्वारीसारखे पीक वन्यप्राण्यांमुळे फस्त होत असल्याने या पिकाकडे कुणीही पाहत नव्हते. मात्र, राजू बुगल यांनी विक्रमी ज्वारीचे पीक घेतले आहे. कमलकिशोर पनपालीया यांनी आपल्या शेतात लसून आणि कांद्याची लागवड केली. विक्रमी पीक झाल्याने अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. विजय पनपालिया यांनी आपल्या शेतात केळी, मिरची, टरबूज ही पिके घेण्याची सुरुवात केली. परंतु यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तरीही हार न मानता त्या पिकांची योग्य देखभाल करून तसेच पाण्याचे वेळेवर नियोजन करून पीक घेण्यासाठी सज्ज झाले. सोबतच अनेक शेतकरी आपल्या परीने शेतात सांभार, पालक, ढेमस, काकडी, भेंडी यासारखी पिके लावून संसाराचा गाडा ओढत आहे. अनेक शेतकरी शेती सोबतच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. गावातून दररोज ३०० ते ४०० लिटर दूध धामणगाव रेल्वेच्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जाते. गाई आणि म्हशींची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आहे. पालेभाज्यांप्रमाणे दुग्ध व्यवसायाकडे गावातील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.