शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

शेतकऱ्यांनी केली पालेभाज्यांची निर्मिती

By admin | Updated: April 11, 2016 00:10 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ....

विकास, समृद्धीकडे वाटचाल : योग्य नियोजनामुळेच शेती व्यवसाय शक्यनितीन टाले  कावली वसाडधामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून अप्पर वर्धा धरणाचे पाणी व बगाजी सागरमुळे पाण्याची आवक वाढल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. या गावाची ओळख भाजीपाला उत्पादन करणारे गाव अशी झाली आहे. त्यामुळे दाभाडा गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पीक घेणे कठीण झाले. लागलेले पैसे मिळणे कठीण झाले. त्यामुळे दाभाडा येथील शेतकरी नंदकिशोर कोकटे यांनी १० एकर शेतात वांगी, टमाटर, केळी ही पिके लावून योग्य त्याची दखल घेत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वत: एक चारचाकी वाहन घेतले आणि वर्धा, अमरावती, पुलगाव, आर्वी, धामणगाव येथील बाजारपेठेत विकण्यास शेतकरी नेत आहे. महादेव हलवारे यांनीही आलू, मका यासारखी पिके घेऊन एक आदर्श ठेवला. दिलीप वसू हे शेतकरी भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ते स्वत: पालेभाज्यांची विक्री करतात, हे विशेष. एकीकडे ज्वारीसारखे पीक वन्यप्राण्यांमुळे फस्त होत असल्याने या पिकाकडे कुणीही पाहत नव्हते. मात्र, राजू बुगल यांनी विक्रमी ज्वारीचे पीक घेतले आहे. कमलकिशोर पनपालीया यांनी आपल्या शेतात लसून आणि कांद्याची लागवड केली. विक्रमी पीक झाल्याने अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. विजय पनपालिया यांनी आपल्या शेतात केळी, मिरची, टरबूज ही पिके घेण्याची सुरुवात केली. परंतु यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तरीही हार न मानता त्या पिकांची योग्य देखभाल करून तसेच पाण्याचे वेळेवर नियोजन करून पीक घेण्यासाठी सज्ज झाले. सोबतच अनेक शेतकरी आपल्या परीने शेतात सांभार, पालक, ढेमस, काकडी, भेंडी यासारखी पिके लावून संसाराचा गाडा ओढत आहे. अनेक शेतकरी शेती सोबतच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. गावातून दररोज ३०० ते ४०० लिटर दूध धामणगाव रेल्वेच्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जाते. गाई आणि म्हशींची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आहे. पालेभाज्यांप्रमाणे दुग्ध व्यवसायाकडे गावातील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.