शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

पिंप्रीच्या शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविले ‘रोटावेटर

By admin | Updated: October 14, 2015 00:17 IST

यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन सोने गहाण ठेवून तर काहींनी उसनवारी पैसे काढून शेतात सोयाबीन, तूर, कपाशी, मुगाची पेरणी केली.

सोयाबीन एकरी एक ते दोन पोते : सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्षनंदकिशोर इंगळे पापळयावर्षी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन सोने गहाण ठेवून तर काहींनी उसनवारी पैसे काढून शेतात सोयाबीन, तूर, कपाशी, मुगाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने पिकेसुद्धा जोमाने डोलू लागली. परंतु ऐन सोयाबीन फुले-कळ्यावर असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे परिसरातील पिंप्री निपाणी, हिवरा, वडाळा, कोव्हळा, सुकळी (गुरव), काजना, राजना, पिंप्री गावंडा, खेड आदी गावांतील शेतकऱ्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर आहे. काही सोयाबीन पिकांना तर अजिबातच शेंगा आल्या नाहीत. त्यातच सोयाबीन पिकावर यलो मॅझिकसारख्या रोगाने आक्रमण केल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नसल्याने या पिकावर शेतकऱ्यांना अखेर रोटावेटर फिरण्याची पाळी आली आहे. पिंप्री निपाणी येथील शेतकरी हेमंत प्रकाशचंद बोथरा या शेतकऱ्यांकडे ४० एक्कर शेतात २ लाख रुपये खर्च करून तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली. मात्र सोयाबीन पिकाला शेंगाच नसल्याने अखेर या शेतकऱ्याने शेतात गुरे-ढोरे घातले आणि शेतात रोटावेटर फिरवारे लागले. शेतकऱ्यांना चक्क एकरी कोणाला एक तर कोणाला दोन-तीन पोत्यांचा उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन सवंगणी व काढणे याचा धड खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीन पेरणीपासून पाहिजे त्यावेळी न पडलेल्या पावसामुळे वातावरणातील बदलामुळे तर उभ्या झालेल्या सोयाबीन पिकावर आलेल्या विविध संकटांमुळे पिकावर केलेला खर्च व्यर्थ गेल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. ज्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या यादीत मोडणाऱ्या नांदगाव (खंडेश्वर) तालुक्याच्या आणेवारीवर मात्र शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी अंधारात जाणार, हे वास्तव समोर आहे. सोयाबीन पिकाची मशागत व त्यासाठी लागणारा खर्च जास्त व येणारी आवक अत्यंत कमी यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोायाबीन काढलेच नाही. परंतु डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा कमी होईल, या विचारात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची कृषी विभाग व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाचे सर्वेक्षण करून सुधारित आणेवारी घोषित करावी व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पिंप्री निपाणी येथील शेतकऱ्याने शेतात जनावरे व रोटावेटर फिरवले सोयाबीन पिकाची गंभीर स्थिती पाहून पिंप्री निपाणी येथील शेतकरी हेमंत प्रकाश बोथरा याने शेतात जनावरे घालून शेत चारून रोटावेटर फिरविले. यावेळी पिंप्री निपाणीचे सरपंच विशाल रिठे, रामेश्वर जुंजारे, राजू धार्मिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद राऊत, गोवर्धन ठाकरे, रवींद्र रिठे, नरेंद्र वानखडे, कांतेश्वर मुरादे, रमाकांत मुरादे, गोरख नगराळे, शाम कडू, अनिल रिठे, शरद गावंडे, सचिन रिठे, ज्ञानेश्वर रिठे, राजू साबळे, नारायण मेश्राम, मुकेश रिठे, जगन्नाथ अतकरी, रामहरी अतकरी अन्य शेतकरी उपस्थित होते.