शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

पिंप्रीच्या शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविले ‘रोटावेटर

By admin | Updated: October 14, 2015 00:17 IST

यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन सोने गहाण ठेवून तर काहींनी उसनवारी पैसे काढून शेतात सोयाबीन, तूर, कपाशी, मुगाची पेरणी केली.

सोयाबीन एकरी एक ते दोन पोते : सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्षनंदकिशोर इंगळे पापळयावर्षी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन सोने गहाण ठेवून तर काहींनी उसनवारी पैसे काढून शेतात सोयाबीन, तूर, कपाशी, मुगाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने पिकेसुद्धा जोमाने डोलू लागली. परंतु ऐन सोयाबीन फुले-कळ्यावर असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे परिसरातील पिंप्री निपाणी, हिवरा, वडाळा, कोव्हळा, सुकळी (गुरव), काजना, राजना, पिंप्री गावंडा, खेड आदी गावांतील शेतकऱ्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर आहे. काही सोयाबीन पिकांना तर अजिबातच शेंगा आल्या नाहीत. त्यातच सोयाबीन पिकावर यलो मॅझिकसारख्या रोगाने आक्रमण केल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नसल्याने या पिकावर शेतकऱ्यांना अखेर रोटावेटर फिरण्याची पाळी आली आहे. पिंप्री निपाणी येथील शेतकरी हेमंत प्रकाशचंद बोथरा या शेतकऱ्यांकडे ४० एक्कर शेतात २ लाख रुपये खर्च करून तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली. मात्र सोयाबीन पिकाला शेंगाच नसल्याने अखेर या शेतकऱ्याने शेतात गुरे-ढोरे घातले आणि शेतात रोटावेटर फिरवारे लागले. शेतकऱ्यांना चक्क एकरी कोणाला एक तर कोणाला दोन-तीन पोत्यांचा उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन सवंगणी व काढणे याचा धड खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीन पेरणीपासून पाहिजे त्यावेळी न पडलेल्या पावसामुळे वातावरणातील बदलामुळे तर उभ्या झालेल्या सोयाबीन पिकावर आलेल्या विविध संकटांमुळे पिकावर केलेला खर्च व्यर्थ गेल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. ज्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या यादीत मोडणाऱ्या नांदगाव (खंडेश्वर) तालुक्याच्या आणेवारीवर मात्र शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी अंधारात जाणार, हे वास्तव समोर आहे. सोयाबीन पिकाची मशागत व त्यासाठी लागणारा खर्च जास्त व येणारी आवक अत्यंत कमी यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोायाबीन काढलेच नाही. परंतु डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा कमी होईल, या विचारात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची कृषी विभाग व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाचे सर्वेक्षण करून सुधारित आणेवारी घोषित करावी व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पिंप्री निपाणी येथील शेतकऱ्याने शेतात जनावरे व रोटावेटर फिरवले सोयाबीन पिकाची गंभीर स्थिती पाहून पिंप्री निपाणी येथील शेतकरी हेमंत प्रकाश बोथरा याने शेतात जनावरे घालून शेत चारून रोटावेटर फिरविले. यावेळी पिंप्री निपाणीचे सरपंच विशाल रिठे, रामेश्वर जुंजारे, राजू धार्मिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद राऊत, गोवर्धन ठाकरे, रवींद्र रिठे, नरेंद्र वानखडे, कांतेश्वर मुरादे, रमाकांत मुरादे, गोरख नगराळे, शाम कडू, अनिल रिठे, शरद गावंडे, सचिन रिठे, ज्ञानेश्वर रिठे, राजू साबळे, नारायण मेश्राम, मुकेश रिठे, जगन्नाथ अतकरी, रामहरी अतकरी अन्य शेतकरी उपस्थित होते.