शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

नाफेडच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:08 IST

बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.

चांदूररेल्वेत संताप : मुद्दा तूर खरेदीचा, मीनाकुमारीचा काढता पायचांदुररेल्वे : बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. अवघ्या १५ मिनिटांच्या भेटीनंतर त्यांनी बाजार समितीमधून काढता पाय घेतला.चांदूररेल्वे बाजार समितीमध्ये नाफे डद्वारा तूर खरेदी सुरू आहे. मुदतवाढीनंतर शनिवार १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान शासनाने सोमवारपासून तूर खरेदी पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोमवारी बाजार समितीमध्ये नाफेडचे ग्रेडर आले नसल्याने गोंधळ उडाला होता. एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन व शासनाच्या आदेशांचा आधार घेत नाफेडच्या ग्रेडरवर फौजदारी कार्यवाही करण्याचे कळविले होते. मंगळवारी दुपारी नाफेडच्या मुंबई केंद्रीय व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांनी अचानक चांदूररेल्वे बाजार समितीला भेट दिली. नाफेडच्या मोठ्या अधिकारी बाजार समितीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळताच तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून समस्या विशद केल्यात. नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाल्यावर सुरूवातीला व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली. जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजारपेठेत आणला तेव्हा तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय झाला. याशिवाय चांगल्या तुरीला चाळणी मारून भाव कमी करण्यात येत आहे. नाफे डचे ग्रेडर मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला. बाजार समिती सभापती प्रभाकर वाघ यांनीही नाफेड कर्मचाऱ्यांची मीना कुमारी यांच्यासमोर खरडपट्टी काढली. यानंतर शेतकऱ्यांची तूर मोजणी वेगात सुरू झाली. मंगळवारी केवळ ५१४ क्विंटल तुरीची मोजणी झाल्याने मोजणीच्या गतीवरही आक्षेप घेतला जात आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मौननाफेडच्या निकषांनुसार ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल, असे मीनाकुमारी यांनी सांगितले. मात्र, डिसेंबर महिन्यात कोणताही निकष न लावता हजारो क्विंटल तुरीची खरेदी केली, त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. नाफेड अधिकारी-कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही मीनाकुमारी यांनी मौन बाळगले होते.