शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:08 IST

बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.

चांदूररेल्वेत संताप : मुद्दा तूर खरेदीचा, मीनाकुमारीचा काढता पायचांदुररेल्वे : बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. अवघ्या १५ मिनिटांच्या भेटीनंतर त्यांनी बाजार समितीमधून काढता पाय घेतला.चांदूररेल्वे बाजार समितीमध्ये नाफे डद्वारा तूर खरेदी सुरू आहे. मुदतवाढीनंतर शनिवार १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान शासनाने सोमवारपासून तूर खरेदी पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोमवारी बाजार समितीमध्ये नाफेडचे ग्रेडर आले नसल्याने गोंधळ उडाला होता. एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन व शासनाच्या आदेशांचा आधार घेत नाफेडच्या ग्रेडरवर फौजदारी कार्यवाही करण्याचे कळविले होते. मंगळवारी दुपारी नाफेडच्या मुंबई केंद्रीय व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांनी अचानक चांदूररेल्वे बाजार समितीला भेट दिली. नाफेडच्या मोठ्या अधिकारी बाजार समितीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळताच तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून समस्या विशद केल्यात. नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाल्यावर सुरूवातीला व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली. जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजारपेठेत आणला तेव्हा तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय झाला. याशिवाय चांगल्या तुरीला चाळणी मारून भाव कमी करण्यात येत आहे. नाफे डचे ग्रेडर मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला. बाजार समिती सभापती प्रभाकर वाघ यांनीही नाफेड कर्मचाऱ्यांची मीना कुमारी यांच्यासमोर खरडपट्टी काढली. यानंतर शेतकऱ्यांची तूर मोजणी वेगात सुरू झाली. मंगळवारी केवळ ५१४ क्विंटल तुरीची मोजणी झाल्याने मोजणीच्या गतीवरही आक्षेप घेतला जात आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मौननाफेडच्या निकषांनुसार ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल, असे मीनाकुमारी यांनी सांगितले. मात्र, डिसेंबर महिन्यात कोणताही निकष न लावता हजारो क्विंटल तुरीची खरेदी केली, त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. नाफेड अधिकारी-कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही मीनाकुमारी यांनी मौन बाळगले होते.