शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

नाफेडच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:08 IST

बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.

चांदूररेल्वेत संताप : मुद्दा तूर खरेदीचा, मीनाकुमारीचा काढता पायचांदुररेल्वे : बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. अवघ्या १५ मिनिटांच्या भेटीनंतर त्यांनी बाजार समितीमधून काढता पाय घेतला.चांदूररेल्वे बाजार समितीमध्ये नाफे डद्वारा तूर खरेदी सुरू आहे. मुदतवाढीनंतर शनिवार १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान शासनाने सोमवारपासून तूर खरेदी पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोमवारी बाजार समितीमध्ये नाफेडचे ग्रेडर आले नसल्याने गोंधळ उडाला होता. एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन व शासनाच्या आदेशांचा आधार घेत नाफेडच्या ग्रेडरवर फौजदारी कार्यवाही करण्याचे कळविले होते. मंगळवारी दुपारी नाफेडच्या मुंबई केंद्रीय व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांनी अचानक चांदूररेल्वे बाजार समितीला भेट दिली. नाफेडच्या मोठ्या अधिकारी बाजार समितीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळताच तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून समस्या विशद केल्यात. नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाल्यावर सुरूवातीला व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली. जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजारपेठेत आणला तेव्हा तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय झाला. याशिवाय चांगल्या तुरीला चाळणी मारून भाव कमी करण्यात येत आहे. नाफे डचे ग्रेडर मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला. बाजार समिती सभापती प्रभाकर वाघ यांनीही नाफेड कर्मचाऱ्यांची मीना कुमारी यांच्यासमोर खरडपट्टी काढली. यानंतर शेतकऱ्यांची तूर मोजणी वेगात सुरू झाली. मंगळवारी केवळ ५१४ क्विंटल तुरीची मोजणी झाल्याने मोजणीच्या गतीवरही आक्षेप घेतला जात आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मौननाफेडच्या निकषांनुसार ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल, असे मीनाकुमारी यांनी सांगितले. मात्र, डिसेंबर महिन्यात कोणताही निकष न लावता हजारो क्विंटल तुरीची खरेदी केली, त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. नाफेड अधिकारी-कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही मीनाकुमारी यांनी मौन बाळगले होते.