शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘झीरो बजेट’ शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:05 IST

अलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत चाललाय. ‘झीरो बजेट’शेतीचा पर्याय निवडल्यास शेतकरी आत्महत्या हमखास थांबतील.

सुभाष पाळेकर : नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन दर्यापूर : अलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत चाललाय. ‘झीरो बजेट’शेतीचा पर्याय निवडल्यास शेतकरी आत्महत्या हमखास थांबतील. नैसर्गिक शेतीला साडेदहा हजार वर्षांचा इतिहास आहे. आजच्या काळात झीरो बजेट शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्श्री सुभाष पाळेकर यांनी केले. लोकनेत्या कोकिळाबाई गावंडे यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात रविवारी आयोजित ‘झीरो बजेट’ नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले. सर्वप्रथम बाबासाहेब सांगळुदकर, कोकिळाबाई गावंडे (सांगळुदकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार राहुल तायडे यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले. अकोटचे आ. प्रकाश पाटील भारसाकळे यांनीही कार्यशाळेला भेट दिली. पाळेकर पुढे बोलताना म्हणाले, देप्रथमच एका शेतकऱ्याला कोणत्याही नामांकनाविना शासनाने पद्मश्री बहाल केली. हा सन्मान आपला नसून तोे दशातील ८० कोटी शेतकऱ्यांचा आहे. ‘झीरो बजेट’ नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत केल्यास जमिनीची सुपिकता वाढेल, असेही पाळेकर पुढे म्हणाले. जे. डी. पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.माजी मंत्री जगदीश गुप्ता, बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील बरवट, उपसभापती नरेंद्र ब्राम्हणकर, संचालक कुलदीप गावंडे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्ष कांचनमाला गावंडे, जे.डी.पाटील सांगळुदकर स्मृती केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे तसेच बाजार समिती संचालक व काही निवडक शेतकऱ्यांच्या हस्ते सुभाष पाळेकर यांना मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. आले. याप्रसंगी माजी मंत्री जगदीश गुप्ता, कांचनमाला गावंडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी झीरो बजेट शेती यशस्वीरीत्या करणारे शेंडगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण बनसोड यांचा पाळेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक कुलदीप पाटील गावंडे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन हेरोळे तर आभार प्रदर्शन कुलभूषण गावंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय देवलाल आठवले यांनी करून दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)