शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘झीरो बजेट’ शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:05 IST

अलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत चाललाय. ‘झीरो बजेट’शेतीचा पर्याय निवडल्यास शेतकरी आत्महत्या हमखास थांबतील.

सुभाष पाळेकर : नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन दर्यापूर : अलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत चाललाय. ‘झीरो बजेट’शेतीचा पर्याय निवडल्यास शेतकरी आत्महत्या हमखास थांबतील. नैसर्गिक शेतीला साडेदहा हजार वर्षांचा इतिहास आहे. आजच्या काळात झीरो बजेट शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्श्री सुभाष पाळेकर यांनी केले. लोकनेत्या कोकिळाबाई गावंडे यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात रविवारी आयोजित ‘झीरो बजेट’ नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले. सर्वप्रथम बाबासाहेब सांगळुदकर, कोकिळाबाई गावंडे (सांगळुदकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार राहुल तायडे यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले. अकोटचे आ. प्रकाश पाटील भारसाकळे यांनीही कार्यशाळेला भेट दिली. पाळेकर पुढे बोलताना म्हणाले, देप्रथमच एका शेतकऱ्याला कोणत्याही नामांकनाविना शासनाने पद्मश्री बहाल केली. हा सन्मान आपला नसून तोे दशातील ८० कोटी शेतकऱ्यांचा आहे. ‘झीरो बजेट’ नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत केल्यास जमिनीची सुपिकता वाढेल, असेही पाळेकर पुढे म्हणाले. जे. डी. पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.माजी मंत्री जगदीश गुप्ता, बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील बरवट, उपसभापती नरेंद्र ब्राम्हणकर, संचालक कुलदीप गावंडे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्ष कांचनमाला गावंडे, जे.डी.पाटील सांगळुदकर स्मृती केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे तसेच बाजार समिती संचालक व काही निवडक शेतकऱ्यांच्या हस्ते सुभाष पाळेकर यांना मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. आले. याप्रसंगी माजी मंत्री जगदीश गुप्ता, कांचनमाला गावंडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी झीरो बजेट शेती यशस्वीरीत्या करणारे शेंडगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण बनसोड यांचा पाळेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक कुलदीप पाटील गावंडे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन हेरोळे तर आभार प्रदर्शन कुलभूषण गावंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय देवलाल आठवले यांनी करून दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)