शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे पशुधन इतिहासजमा

By admin | Updated: April 2, 2016 00:14 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसायही येथे चालतो. मात्र, ३-४ वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे.

सततच्या दुष्काळाने चाऱ्याचीही कमतरता : शेतीसाठी धोक्याची घंटा सुनील देशपांडे अचलपूरभारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसायही येथे चालतो. मात्र, ३-४ वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम पशुपालन व्यवसायावर होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जनावरांच्या वैरणाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकरी पशुधन कवडीमोल भावात विकत आहेत. पर्जन्यमान अनिश्चित आहे. पाऊस वेळी-अवेळी बरसत असल्याने शेतीपिकांची नासाडी होत आहे. अगोदरच नापिकी असताना अवकाळी पाऊस उरले सुरले पिकही वाहून नेतो. दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नसल्याने मागील १२ वर्षात १०० पेक्षा अधिक आत्महत्या शेतकऱ्यांनी तालुक्यात केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशुपालन करावे, असा सल्ला राजकीय पुढारी देत असले तरी या जोडधंद्यासाठी लागणारा चाराही शेतकऱ्यांच्या शेतात उगवत नाही, याची माहिती स्वत:ला शेतकऱ्याची पोर म्हणविणाऱ्या पुढाऱ्यांनाही नाही. अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी शेतीच्या मशागतीकरिता बैलांचा वापर करतात. बैलांना शेतकऱ्यांचा सखा म्हणून संबोधले जाते. दोघांच्या मेहेनतीने अन्नाची निर्मिती होते. पण, आज पोशिंद्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. गाय हिंदू धर्मात गोमाता म्हणून ओळखली जाते. तिच्यावर लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गोधन शेतकऱ्यांच्या घरी असणे म्हणजे श्रद्धा आणि सधनतेचे लक्षण समजले जाते. मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता शेतीपयोगी येणारे वखर नांगर, डवरा इत्यादी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.परिणामी मागील आठ-दहा वर्षापासून बैलाची दावण दिसणे देखील कठीण झाले आहे. अचलपूर तालुक्यात परतवाडा येथे दर गुरूवारी जनावरे विक्रीसाठी येत असतात. त्यात बैलांची संख्या अधिक असते आणि खरेदीदार कमी असतात. या बैलांची कवडीमोल भावात विक्री होते. विक्री केलेले बैल शेतीच्या उपयोगासाठी नेले जातात की अवैध कत्तलखान्याकडे नेले जातात, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली बैल आणि गार्इंची संख्या पर्यावरण विकासाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, असे जातीवंत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पशुपालकांना दिलासा देण्याची गरज आहे.