शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

करजगावच्या तलाठ्याला शेतकऱ्यांनी बदडले

By admin | Updated: July 12, 2014 23:26 IST

तालुक्यात गारपीटग्रस्तांच्या अनुदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये वरिष्ठांकडे तलाठ्यांच्या तक्रारी

वरूड : तालुक्यात गारपीटग्रस्तांच्या अनुदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये वरिष्ठांकडे तलाठ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तलाठ्यांना घेराव घातला. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान करजगावच्या शेतकऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरुड पोलिसांनी जगदीश वानखडे, विजय दापुरकर, सतीश लांडगे, गजानन बहुरुपी, राहुल बहुरुपी, सचिन बहातकर, गौरव बहुरुपी, सुनील कुरवाळे सर्व रा. करजगाव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१३ च्या जनू ते सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. जानेवारी २०१४ पासून फेब्रुवारी, मार्चपर्यंत गारपिटीच्या तडाख्याने संत्रा, गहू, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. विमा योजनाही फसवी निघाली. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. यामध्ये लोकसभा निवडणूक आणि मार्च अखेरच्या घाईगर्दीत वाटेल तशा याद्या तयार केल्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला. खचलेल्या विहिरींच्या अनुदानाकरिता पंचनामे करताना तलाठ्यांनी लाच घेतली. यामुळे ेशेतकऱ्यांचा असंतोष वाढतच गेला. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत कुठे तलाठ्याला घेराव तर कुठे ओढाताण करण्याचे प्रकार घडले.शुक्रवारी करजगावच्या तलाठ्याला शेकडो शेतकऱ्यांनी घेराव घालून मारहाण केल्याची घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. करजगाव (गांधी घर) येथे गारपीटग्रस्तांच्या कमी-अधिक अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची काही नावे यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. खचलेल्या विहिरींच्या अनुदानाकरिता पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून रक्कम उकळण्याचा गोरखधंदा करणाऱ्या तलाठ्याबद्दल रोष अनावर झाल्याने शेतकऱ्यांनी चोप दिल्याची माहिती आहे. महसूल अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. शेतकऱ्यांवर निसर्गाने केलेला अन्याय आणि प्रशासनाकडून त्यांची होेणारी हेळसांड लक्षात घेता शेतकऱ्यांची स्थिती किती विदारक आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच शेतकऱ्यांचा असंतोष आता उफाळून येऊ लागला आहे. (तालुका प्रतिनिधी)