शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By admin | Updated: February 18, 2017 00:11 IST

शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे.

किरण गित्ते : प्रशिक्षणासाठी ३०० ट्रॅक्टर चालकांची नोंदणीअमरावती : शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे. मात्र खारपाणपट्ट्यात जमिनीचा पोत नरम असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मागेल त्यांना शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.जलयुक्त शिवार योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकासअंतर्गत प्रभा मंगलम् कार्यालय, अंजनगाव येथे आयोजित ट्रॅक्टरचालक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, उपसंचालक कौशल्य विकास महेश देशपांडे, सहायक संचालक कौशल्यविकास अशोक पाईकराव, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी उपस्थित होते.जिल्ह्यात सद्यस्थीतीत शेततळे तयार करण्यासाठी राजस्थानी लोक येतात. स्थानिकांना त्याप्रमाणे कौशल्य प्राप्त नसते. स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी ट्रॅक्टर चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अंजनगाव दयार्पूर व भातकुली या तालुक्यामध्ये खारपाणपट्टा आहे. २२ गावातील खारपाणपट्ट्यातील गावांना शेततळ्याची गरज आहे. जिल्ह्यात ४५०० शेततळ्याचे उद्दिष्ट्य असून त्यापैकी २५०० हे अंजनगाव दर्यापूर तालुक्यात करायचे आहेत. वैज्ञानिक पद्धतीने शेततळे केले तर जास्तीत जास्त अर्धा एकरपर्यंत शेत जाऊ शकते. मात्र त्यातून उर्वरित शेताला संरक्षित सिंचन देऊन पिकाची उत्पादकता वाढवता येते. रामागड व नरदोडा या गावांमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून हरभऱ्याच्या पिकात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात ५०६ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली असून येत्या एप्रिल मध्ये २५० गावे आणखी जलयुक्त शिवारमध्ये घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात २५० विहिरी धडक सिंचन मोहिमेत घेण्यात आल्यात. मार्च २०१६ अखेरपर्यंत वीजजोडणीसाठी जवळपास १७०० शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिला डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा दोन शेतकऱ्यांना देण्यात आला. शेततळ्याची निर्मिती करून वाढीव उत्पन्न घेणाऱ्या विलास टाले नरदोडा व विजय लांजूळकर या दोन शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. आशुतोष गोळे या शेतकऱ्याला ट्रॅक्टरची चावी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आली. शेततळे तयार करण्याचे उद्दिष्टे असल्याने त्यासाठी ट्रॅक्टरसह कुशल मनुष्यबळ तयार करणे, हेसुद्धा आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित ट्रॅक्टरचालक तयार झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. या कौशल्य विकास कार्यक्रमात ३०० ट्रॅक्टरचालकांची नोंदणी झाली आहे.