शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: November 1, 2014 22:45 IST

अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज

अमरावती : अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. न्याय न दिल्यास किमान ईच्छामरणाची तरी परवानगी दयावी, अशी मागणी करीत तीव्र भावना शासन व प्रशासनासमोर मांडल्यात. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर गावालगतच्या मौजे पळखेड शेतशिवारातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने बागायती व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ओलीत करण्यासाठी पाणी आहे. पण वीजपुरवठा सुरळीत नाही. परिणामी परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. हिरापूर, पळसखेड, निमखेड, चौसाळा, चिंचोना, सावरपाणी, गौरखेड हा बागायती परिसर आहे. या भागातील वीज वितरण कंपनीच्या डी.बी विशेषता पळखेड येथील सहारे डीबीचा पार बोजवारा उडाला आहे. अनेक डीबी ओव्हरलोड झाल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याकाठी टॉन्सफॉर्मर जळणे ही नित्याची बाब होऊन बसली आहे. बहुतांश डीबी मध्ये तेल नाही. वेळेवर मेन्टेनन्स नाही. याबाबत वेळोवेळी स्थानिक वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावरही दखल घेतली जात नाही. परिणामी शेतकरी स्वखर्चाने वर्गणी करून आतापर्यंत डीबीची कामे करीत आले. मात्र वीज कंपनी डीबी जळाल्यानंतरही ती दुरूस्ती करण्याबाबत कुठलीही उपाययोजना न करता बघ्याची भूमिका घेत आहे. एवढेच नव्हे, तर उपाय योजनेबाबत वीज कंपनीचे अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळेच या परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. वीज वितरण कंपनीने या भागात पुरवठयासाठी टाकलेली लाईन ही १९६० सालची आहे. ही लाईन कालबाह्य झाली असताना वारंवार तार तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना करण्यासाठी वीज वितरण कंपनी हेतुपुरस्सर डोळेझाक करीत आहे. एकंदरीत झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई द्यावी, याशिवाय सहारे डीबी व अन्य डीबीची दुरूस्ती करावी. याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राहुल सहारे, अनिल तुमसरे, गोपाल देशमुख यांच्यासह सुमारे ८० शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाव्दारे शुक्रवार ३१ आॅक्टोबर रोजी केली आहे. (प्रतिनिधी)