शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: November 1, 2014 22:45 IST

अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज

अमरावती : अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. न्याय न दिल्यास किमान ईच्छामरणाची तरी परवानगी दयावी, अशी मागणी करीत तीव्र भावना शासन व प्रशासनासमोर मांडल्यात. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर गावालगतच्या मौजे पळखेड शेतशिवारातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने बागायती व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ओलीत करण्यासाठी पाणी आहे. पण वीजपुरवठा सुरळीत नाही. परिणामी परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. हिरापूर, पळसखेड, निमखेड, चौसाळा, चिंचोना, सावरपाणी, गौरखेड हा बागायती परिसर आहे. या भागातील वीज वितरण कंपनीच्या डी.बी विशेषता पळखेड येथील सहारे डीबीचा पार बोजवारा उडाला आहे. अनेक डीबी ओव्हरलोड झाल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याकाठी टॉन्सफॉर्मर जळणे ही नित्याची बाब होऊन बसली आहे. बहुतांश डीबी मध्ये तेल नाही. वेळेवर मेन्टेनन्स नाही. याबाबत वेळोवेळी स्थानिक वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावरही दखल घेतली जात नाही. परिणामी शेतकरी स्वखर्चाने वर्गणी करून आतापर्यंत डीबीची कामे करीत आले. मात्र वीज कंपनी डीबी जळाल्यानंतरही ती दुरूस्ती करण्याबाबत कुठलीही उपाययोजना न करता बघ्याची भूमिका घेत आहे. एवढेच नव्हे, तर उपाय योजनेबाबत वीज कंपनीचे अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळेच या परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. वीज वितरण कंपनीने या भागात पुरवठयासाठी टाकलेली लाईन ही १९६० सालची आहे. ही लाईन कालबाह्य झाली असताना वारंवार तार तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना करण्यासाठी वीज वितरण कंपनी हेतुपुरस्सर डोळेझाक करीत आहे. एकंदरीत झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई द्यावी, याशिवाय सहारे डीबी व अन्य डीबीची दुरूस्ती करावी. याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राहुल सहारे, अनिल तुमसरे, गोपाल देशमुख यांच्यासह सुमारे ८० शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाव्दारे शुक्रवार ३१ आॅक्टोबर रोजी केली आहे. (प्रतिनिधी)