शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: November 1, 2014 22:45 IST

अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज

अमरावती : अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. न्याय न दिल्यास किमान ईच्छामरणाची तरी परवानगी दयावी, अशी मागणी करीत तीव्र भावना शासन व प्रशासनासमोर मांडल्यात. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर गावालगतच्या मौजे पळखेड शेतशिवारातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने बागायती व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ओलीत करण्यासाठी पाणी आहे. पण वीजपुरवठा सुरळीत नाही. परिणामी परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. हिरापूर, पळसखेड, निमखेड, चौसाळा, चिंचोना, सावरपाणी, गौरखेड हा बागायती परिसर आहे. या भागातील वीज वितरण कंपनीच्या डी.बी विशेषता पळखेड येथील सहारे डीबीचा पार बोजवारा उडाला आहे. अनेक डीबी ओव्हरलोड झाल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याकाठी टॉन्सफॉर्मर जळणे ही नित्याची बाब होऊन बसली आहे. बहुतांश डीबी मध्ये तेल नाही. वेळेवर मेन्टेनन्स नाही. याबाबत वेळोवेळी स्थानिक वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावरही दखल घेतली जात नाही. परिणामी शेतकरी स्वखर्चाने वर्गणी करून आतापर्यंत डीबीची कामे करीत आले. मात्र वीज कंपनी डीबी जळाल्यानंतरही ती दुरूस्ती करण्याबाबत कुठलीही उपाययोजना न करता बघ्याची भूमिका घेत आहे. एवढेच नव्हे, तर उपाय योजनेबाबत वीज कंपनीचे अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळेच या परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. वीज वितरण कंपनीने या भागात पुरवठयासाठी टाकलेली लाईन ही १९६० सालची आहे. ही लाईन कालबाह्य झाली असताना वारंवार तार तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना करण्यासाठी वीज वितरण कंपनी हेतुपुरस्सर डोळेझाक करीत आहे. एकंदरीत झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई द्यावी, याशिवाय सहारे डीबी व अन्य डीबीची दुरूस्ती करावी. याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राहुल सहारे, अनिल तुमसरे, गोपाल देशमुख यांच्यासह सुमारे ८० शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाव्दारे शुक्रवार ३१ आॅक्टोबर रोजी केली आहे. (प्रतिनिधी)