शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

शेतकरी कर्जवाटप विलंबास जिल्हा बँक जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:08 IST

सततची नापिकी, अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला.

भाजपचा आरोप : संचालक मंडळ बरखास्तीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततची नापिकी, अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्याकरिता शेतकऱ्यांना १० हजार रूपये अग्रीम रक्कम देण्याची हमी शासनाने घेतली. तरीही जिल्हा बँकेने कर्जवाटपास विलंब केल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून केला.सूर्यवंशी यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाच्या अफलातून कारभारावर बोट ठेवले. कर्जमाफीच्या प्रवासाची मालिका विशद करताना सूर्यवंशी यांनी कर्जमाफीची रक्कम वाटप करण्यात जिल्हा बँक जबाबदार असल्याची बाब स्पष्ट केली. १४ जून २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. तर ४ जुलै २०१७ रोजी शेतकऱ्यांना पेरणीसाठी १० हजारांची अग्रीम रक्कम देण्याची हमी घेतली, तसे लेखी पत्र शिखर बँकेला पाठविले. परंतु जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख हे काँग्रेसचे नेते, जिल्हाध्यक्ष आहेत. असे असतानाही त्यांनी २९ जून रोजी संचालक मंडळाची बैठक उशिरा घेण्याचे कारण काय, असा सवाल सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. शासनाने जिल्हा बँकेकडे असलेल्या ७० कोटी रूपयांच्या जुन्या नोट्या बदलवून घेतल्या. तथापि बँकेच्या माध्यमातून काँग्रेसचे हे राजकारण संयुक्तिक नाही. जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, असेही ते म्हणाले. अकोला, यवतमाळ जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना अग्रीम १० हजार रूपयांचे वाटप केले आहेत. मग, तर अमरावती जिल्हा बँकेने का केले नाही, असा सवाल आता गाव-खेड्यात विचारला जाईल. वेळप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते बँकेच्या संचालकांची मानगुट धरतील व त्यांना घेराव घालून जाब विचारतील, असेही दिनेश सूर्यवंशी म्हणाले. केवळ होर्डिंग्ज लाऊन भाजप शासनाची बदनामी करण्याचा प्रकार बंद करावा, असेही सूर्यवंशी म्हणाले. पत्रपरिषदेला जयंत आमले, रवि पवार, नीलेश सातपुते, सुधीर रसे, राजेश्वर निस्ताणे, विजय मेंढे, अनिल कुंडलवार, सोपान गुडधे, रविराज देशमुख आदी उपस्थित होते. सुकाणू समितीसमोरच कर्जमाफीचा निर्णयराज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुकाणू समितीला विश्वासात घेतले होते. ही बाब दिनेश सूर्यवंशी यांनी स्पष्ट केली. कर्जमाफीत जे काही निकष, अटी-शर्ती लादल्या त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पूरक असल्याचा दावाही त्यांनी केला. याकर्जमाफीमुळे धनदांडग्यांना लाभ मिळणार नाही, हे सत्य आहे. सुकाणू समितीमधील काही सदस्यांच्या कर्जमाफीच्या निकषाला वैयक्तिक विरोध असल्याची शेलकी दिनेश सूर्यवंशी यांनी लगावली.कर्जमाफीबाबतच्या राज्य सरकारच्या धोरणात विसंगती आहे. चार वेळा शासन निर्णय निर्गमित केले. यातील काही निर्णय अद्यापही अप्राप्त आहेत. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार फसवे आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणे, हाच भाजपचा फंडा आहे. वेळप्रसंगी भाजपाला जशास तसे उत्तर देण्याची काँग्रेसची तयारी आहे.- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, अमरावती.