शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

अमरावती : पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. वामन महादेव मानकर ...

अमरावती : पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. वामन महादेव मानकर (७०, रा. वासेवाडी. ता. भातकुली) असे मृताचे नाव आहे.

वामन मानकर यांनी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. धरणात ८ एकर शेतजमीन गेल्यानंतर सरकारकडून अल्प मोबदला मिळाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सोमवारी दुपारी काही गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या पेढी धरणाच्या भिंतीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला. वामन मानकर हे भातकुली येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पैसे काढण्यास गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धट वागणूक दिली व त्रास दिला. ८ एकर शेतीच्या मिळालेल्या अत्यल्प मोबदल्यात कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच रवि राणा यांनी तत्काळ वासेवाडी गावात कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेस जबाबदार असलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

साततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी त्रस्त असून, मुख्यमंत्र्यांनी आतातरी जागे व्हावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी केली. धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही आ. राणा म्हणाले.

चौकट

वासेवाडी येथील वामन मानकर यांनी बँकेच्या जाचाला कंटाळून पेढी बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केली. धरणात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने व सततच्या नापिकीला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली. आत्महत्याग्रस्त मानकर कुटुंबाला तात्काळ १० लाख रुपये मदत द्यावी.

- रवि राणा, आमदार, बडनेरा

--------------------