शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

शेतकरी आल्याचे बघून अधिकारी झाले पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:12 IST

नागपूर महामार्गालगतच्या पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून तोकड्या भावात खरेदी केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. मात्र, शेतकरी आल्याचे बघून संबंधित अधिकाऱ्याने तेथून पळ काढला.

ठळक मुद्देभूसंपादन मोबदल्याची प्रतीक्षा : एमआयडीसी कार्यालयात शेतकऱ्यांच्या ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूर महामार्गालगतच्या पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून तोकड्या भावात खरेदी केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. मात्र, शेतकरी आल्याचे बघून संबंधित अधिकाऱ्याने तेथून पळ काढला.एमआयडीसी कार्यालयावर यापूर्वी ४ जानेवारी रोजी कोर्टाच्या आदेशाने जप्तीची कारवाई करण्यात आली. मात्र, अद्यापही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला एमआयडीसीने दिलेला नाही. १९८९ साली ५२ शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसी निर्मितीसाठी ताब्यात घेण्यात आली. यापैकी २० शेतकऱ्यांनी एमआयडीसी कार्यालयात चकरा मारून जीवनयात्रा संपविली. जिल्हा सत्र न्यायालयाने एमआयडीसी निर्मितीसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचे वाढीव दराने मोबदला द्यावा, असे आदेश सन- २०१६ मध्ये दिले आहे. मात्र, दोन वर्षांनंतरही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. पुन्हा शेतकऱ्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले असता तीन महिन्यांत एमआयडीसीने रक्कम द्यावी, असे निर्देश दिले होते. परंतु, एमआयडीसीचे संबंधित अधिकारी आश्वासन देतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यासंदर्भात डेडलाईन होती. अखेर सोमवारी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी एमआयडीसी गाठले. मात्र, चार तासांनंतरही अधिकारी आलेच नाही. साहेब बाहेर गेले, हे टिपीकल उत्तर शेतकऱ्यांना मिळाले. यावेळी सुभाष राठोड, गणपत राठोड, बन्सी चव्हाण, सुदाम राठोड, भासू चव्हाण, अशोक कोमावार, बाबुसिंग राठोड हे शेतकरी उपस्थित होते.जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकारएमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी संघर्ष संपत नाही, तोच दुसरीकडे अधिकाऱ्यांनी सात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम दिल्याचा आक्षेप आहे. जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात सात शेतकऱ्यांचे कागदपत्रेदेखील असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगलट येत असल्याने इतर शेतकºयांवर अन्याय केला जात असल्याचे अन्यायग्रस्त शेतकºयांचे म्हणणे आहे.