शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

शेतकरी आल्याचे बघून अधिकारी झाले पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:12 IST

नागपूर महामार्गालगतच्या पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून तोकड्या भावात खरेदी केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. मात्र, शेतकरी आल्याचे बघून संबंधित अधिकाऱ्याने तेथून पळ काढला.

ठळक मुद्देभूसंपादन मोबदल्याची प्रतीक्षा : एमआयडीसी कार्यालयात शेतकऱ्यांच्या ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूर महामार्गालगतच्या पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून तोकड्या भावात खरेदी केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. मात्र, शेतकरी आल्याचे बघून संबंधित अधिकाऱ्याने तेथून पळ काढला.एमआयडीसी कार्यालयावर यापूर्वी ४ जानेवारी रोजी कोर्टाच्या आदेशाने जप्तीची कारवाई करण्यात आली. मात्र, अद्यापही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला एमआयडीसीने दिलेला नाही. १९८९ साली ५२ शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसी निर्मितीसाठी ताब्यात घेण्यात आली. यापैकी २० शेतकऱ्यांनी एमआयडीसी कार्यालयात चकरा मारून जीवनयात्रा संपविली. जिल्हा सत्र न्यायालयाने एमआयडीसी निर्मितीसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचे वाढीव दराने मोबदला द्यावा, असे आदेश सन- २०१६ मध्ये दिले आहे. मात्र, दोन वर्षांनंतरही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. पुन्हा शेतकऱ्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले असता तीन महिन्यांत एमआयडीसीने रक्कम द्यावी, असे निर्देश दिले होते. परंतु, एमआयडीसीचे संबंधित अधिकारी आश्वासन देतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यासंदर्भात डेडलाईन होती. अखेर सोमवारी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी एमआयडीसी गाठले. मात्र, चार तासांनंतरही अधिकारी आलेच नाही. साहेब बाहेर गेले, हे टिपीकल उत्तर शेतकऱ्यांना मिळाले. यावेळी सुभाष राठोड, गणपत राठोड, बन्सी चव्हाण, सुदाम राठोड, भासू चव्हाण, अशोक कोमावार, बाबुसिंग राठोड हे शेतकरी उपस्थित होते.जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकारएमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी संघर्ष संपत नाही, तोच दुसरीकडे अधिकाऱ्यांनी सात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम दिल्याचा आक्षेप आहे. जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात सात शेतकऱ्यांचे कागदपत्रेदेखील असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगलट येत असल्याने इतर शेतकºयांवर अन्याय केला जात असल्याचे अन्यायग्रस्त शेतकºयांचे म्हणणे आहे.