शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी आता ‘आधार’

By admin | Updated: April 17, 2017 00:13 IST

खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक बी- बियाणे, खतांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन चालविले आहे.

१ जूनपासून अंमलबजावणी : जिल्हा कृषी विभागाचे नियोजन अमरावती : खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक बी- बियाणे, खतांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन चालविले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार खत विक्रेत्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ‘आधार’वर खते देण्याची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून राबविली जाणार आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी खत विक्रेत्यांची यादी तयार केली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांना शेतकऱ्यांना खत खरेदी करताना गोंधळ उडू नये, यासाठी ‘पॉस’ मशीन देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याांना खत खरेदीला जाताना आधारकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. खत खरेदीपूर्वी शेतकऱ्यांना ‘पॉस’ मशीनमध्ये आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक ‘पॉस’ मशीनमध्ये टाकताच संंबंधित शेतकऱ्यांच्या आधारची माहिती मशीनवर झळकेल. ‘पॉस’ मशीनवर शेतकऱ्यांची ‘आधार’ माहिती दिसल्यानंतर सदर शेतकऱ्याला हाताच्या अंगठयाचे ठसे द्यावे लागेल. त्यानंतर खताचे पैसे दिल्यानंतर खत खरेदीचे बिल तयार होऊन शेतकऱ्यांना मिळेल. ‘पॉस’ मशीनसाठी इंटरनेटची सुविधा आवश्यक आहे. इंटरनेटचा खर्च खत कंपन्यांकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अनुदानित रक्कमेवर दिले जाते. मात्र ‘आधारकार्ड’ द्वारे दिले जाणारे खत हे अनुदानित रक्कमेवर दिले जात आहे अथवा नाही? ही बाब प्रशासनाने अद्यापही स्पष्ट केली नाही. सवलतीची रक्कम सरकार खत कंपनीला अदा करायचे. मात्र कंपनीला अनुदान देताना सरकारकडे शेतकऱ्यांनी खत खरेदी केले की नाही? याची माहिती नसते. परंतु आता शेतकऱ्यांंना ‘आधार’ अनिवार्य केल्यामुळे किती शेतकऱ्यांनी सवलतीत खत खरेदी केले, हे शासनाला कळणार आहे. खत निर्मिती कंपनी जिल्ह्याच्या ठोक विक्रेत्याला पुरवठा करते. त्यानंतर ठोक खत विक्रेते घाऊक विक्रेत्यांना खते पुरवितो. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी लागणार फलकयंदा खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना ‘आधार’ अनिवार्य करण्यात आले आहे. खत खरेदीत शेतकऱ्यांच्या नावे कंपन्यांकडून अनुदान उकळण्याचा होणारा गैरप्रकार बंद करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहे. शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी ‘आधार’ बाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीचे फलक लावले जाणार आहे. त्याकरिता कृषी विभाग कामाला लागला आहे.शेतकऱ्यांना खत खरेदी करताना पॉस मशीनमध्ये आधारक्रमांक अनिवार्य आहे. त्यामुळे ही प्रणाली राबविताना खत विक्रेत्यांना अडचणी येवू नये, यासाठी जिल्हाभरात प्रशिक्षण दिले जात आहे. ११०५ मशीन पोहचल्या आहेत.- उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी, जि.प.