शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी आता ‘आधार’

By admin | Updated: April 17, 2017 00:13 IST

खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक बी- बियाणे, खतांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन चालविले आहे.

१ जूनपासून अंमलबजावणी : जिल्हा कृषी विभागाचे नियोजन अमरावती : खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक बी- बियाणे, खतांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन चालविले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार खत विक्रेत्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ‘आधार’वर खते देण्याची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून राबविली जाणार आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी खत विक्रेत्यांची यादी तयार केली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांना शेतकऱ्यांना खत खरेदी करताना गोंधळ उडू नये, यासाठी ‘पॉस’ मशीन देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याांना खत खरेदीला जाताना आधारकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. खत खरेदीपूर्वी शेतकऱ्यांना ‘पॉस’ मशीनमध्ये आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक ‘पॉस’ मशीनमध्ये टाकताच संंबंधित शेतकऱ्यांच्या आधारची माहिती मशीनवर झळकेल. ‘पॉस’ मशीनवर शेतकऱ्यांची ‘आधार’ माहिती दिसल्यानंतर सदर शेतकऱ्याला हाताच्या अंगठयाचे ठसे द्यावे लागेल. त्यानंतर खताचे पैसे दिल्यानंतर खत खरेदीचे बिल तयार होऊन शेतकऱ्यांना मिळेल. ‘पॉस’ मशीनसाठी इंटरनेटची सुविधा आवश्यक आहे. इंटरनेटचा खर्च खत कंपन्यांकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अनुदानित रक्कमेवर दिले जाते. मात्र ‘आधारकार्ड’ द्वारे दिले जाणारे खत हे अनुदानित रक्कमेवर दिले जात आहे अथवा नाही? ही बाब प्रशासनाने अद्यापही स्पष्ट केली नाही. सवलतीची रक्कम सरकार खत कंपनीला अदा करायचे. मात्र कंपनीला अनुदान देताना सरकारकडे शेतकऱ्यांनी खत खरेदी केले की नाही? याची माहिती नसते. परंतु आता शेतकऱ्यांंना ‘आधार’ अनिवार्य केल्यामुळे किती शेतकऱ्यांनी सवलतीत खत खरेदी केले, हे शासनाला कळणार आहे. खत निर्मिती कंपनी जिल्ह्याच्या ठोक विक्रेत्याला पुरवठा करते. त्यानंतर ठोक खत विक्रेते घाऊक विक्रेत्यांना खते पुरवितो. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी लागणार फलकयंदा खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना ‘आधार’ अनिवार्य करण्यात आले आहे. खत खरेदीत शेतकऱ्यांच्या नावे कंपन्यांकडून अनुदान उकळण्याचा होणारा गैरप्रकार बंद करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहे. शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी ‘आधार’ बाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीचे फलक लावले जाणार आहे. त्याकरिता कृषी विभाग कामाला लागला आहे.शेतकऱ्यांना खत खरेदी करताना पॉस मशीनमध्ये आधारक्रमांक अनिवार्य आहे. त्यामुळे ही प्रणाली राबविताना खत विक्रेत्यांना अडचणी येवू नये, यासाठी जिल्हाभरात प्रशिक्षण दिले जात आहे. ११०५ मशीन पोहचल्या आहेत.- उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी, जि.प.