शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

By admin | Updated: April 17, 2016 00:03 IST

शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, ....

कृषी खात्याची योजना : जिल्ह्यात पाच प्रस्ताव दाखलसचिन सुंदरकर अमरावतीशेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सदर योजनेचे नामाभिधान आता 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना' असे करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच ठरली आहे. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत पाच प्रस्ताव दाखल झाले आहेत.शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक स्वरुपात दोन लाख रुपये, एक अवयव अपंग झाल्यास एक लाख रुपये, दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये लाभ देण्याची तरतूद या विमा योजनेत आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ठेवण्यात आला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल कागदपत्रे सात-बारा फेरफार नोंदणीकृत असणे आवश्यक असून वयोमर्यादा १० ते १५ वर्ष ठेवण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर लवकरात-लवकर सबंधीत कृषी पर्यवेक्षकांमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणत्याही विधीज्ञ किंवा एजंट नेमण्याची गरज नाही. विमा संरक्षणासाठी रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, सर्पदंश, प्राणिदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल अशा प्रकारच्या अपघातांचा समावेश आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी म्हणून त्यांच्या नावाचा समावेश असलेल्या सातबाराचा उतारा, ६ (ड) ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे सातबारावर नाव असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे ६ (क) शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांची झालेली नोंद वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे. स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र वारसाचे दावा पत्र, शवविच्छेदन अहवाल असल्यास 'व्हिसेरा रिपोर्ट', अपंगत्व असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र बँकेच्या पासबुकची प्रत असणे आवश्यक आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा विमा उतरविण्याची अधिकृत जबाबदारी पुण्याच्या नॅशनल इंन्शोरन्स कंपनीकडे असून विमा सल्लागार कंपनी म्हणून बजाज कॅपिटल इन्शोरन्स ब्रोकिंग लिमिटेड काम पाहत आहे. शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक (कृषी) यांनी केले आहे.