शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

By admin | Updated: April 17, 2016 00:03 IST

शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, ....

कृषी खात्याची योजना : जिल्ह्यात पाच प्रस्ताव दाखलसचिन सुंदरकर अमरावतीशेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सदर योजनेचे नामाभिधान आता 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना' असे करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच ठरली आहे. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत पाच प्रस्ताव दाखल झाले आहेत.शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक स्वरुपात दोन लाख रुपये, एक अवयव अपंग झाल्यास एक लाख रुपये, दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये लाभ देण्याची तरतूद या विमा योजनेत आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ठेवण्यात आला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल कागदपत्रे सात-बारा फेरफार नोंदणीकृत असणे आवश्यक असून वयोमर्यादा १० ते १५ वर्ष ठेवण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर लवकरात-लवकर सबंधीत कृषी पर्यवेक्षकांमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणत्याही विधीज्ञ किंवा एजंट नेमण्याची गरज नाही. विमा संरक्षणासाठी रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, सर्पदंश, प्राणिदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल अशा प्रकारच्या अपघातांचा समावेश आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी म्हणून त्यांच्या नावाचा समावेश असलेल्या सातबाराचा उतारा, ६ (ड) ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे सातबारावर नाव असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे ६ (क) शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांची झालेली नोंद वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे. स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र वारसाचे दावा पत्र, शवविच्छेदन अहवाल असल्यास 'व्हिसेरा रिपोर्ट', अपंगत्व असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र बँकेच्या पासबुकची प्रत असणे आवश्यक आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा विमा उतरविण्याची अधिकृत जबाबदारी पुण्याच्या नॅशनल इंन्शोरन्स कंपनीकडे असून विमा सल्लागार कंपनी म्हणून बजाज कॅपिटल इन्शोरन्स ब्रोकिंग लिमिटेड काम पाहत आहे. शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक (कृषी) यांनी केले आहे.