भावात प्रचंड तफावत : माल येताच घसरणसचिन सुंदरकर अमरावतीमहिन्याभरापूर्वी दहा हजारांवर गेलेला तुरीचा भाव सरासरी आठ हजारापर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच तुरीची खरेदी कुणी करायची? यावर वादंग झाल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा आरोप होत आहे. बाजार समिती, व्यापारी आणि एफसीआयच्या वादामध्ये शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी पेरणीक्षेत्र ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर आहे. यात २०१५ च्या खरीप हंगामात १ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला. यंदा वातावरणातील बदलामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. या पार्श्वभूमिवर तुरीचे प्रतिक्विंटल दरही वाढले. मात्र, जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला वेगवेगळा भाव मिळत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अमरावती तालुक्यात तुरीचे १० हजार ४४६ हेक्टर इतके सर्वाधिक क्षेत्र आहे तर सर्वात कमी ५ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र धारणी तालुक्यात आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ६ लाख ८२ हजार १६३ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. त्यापैकी जिल्ह्यात तुरीचा पेरा सुमारे १ लाख हेक्टरच्या आसपास होता. परंतु वातावरणातील बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे तुरीच्या उत्पादनात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.रेकॉर्डब्रेक भाव गेले कुठे ?अमरावती : तुरीच्या उत्पादनासाठी अचानक पडलेली थंडी कारणीभूत असल्याचे निरीक्षणशेती तज्ञांनी नोंदविले आहे. महाराष्ट्रात एफसीआय व नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदी सुरु आहे. परंंतु तुरीच्या खरेदीत प्रचंड चढ-उतार जाणवू लागल्याने शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. अनेक ठिकाणी बाजार समितीचे संचालक मंडळ आणि तूर खरेदीदार समोरासमोर ठाकल्याने आंदोलनाची वेळ येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपूर्वी अचलपूर बाजार समितीत दरावरुन मोठा वाद झाला होता. तीन दिवसांपूर्वी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत उदभवलेल्या वादानंतर जिल्हा उपनिबंधकांनी तोडगा काढत तूर खरेदीची जबाबदारी बाजार समितीकडे सोपविली होती. कापसाप्रमाणेच रोख रकमेचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत नाफेडतर्फे शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा शुभारंंभ झाला आहे. काही सुरूवात होत आहे. यंदा निसर्गाच्या असमतोलामुळे सर्वत्र नापिकी असताना तुरीने काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा दिला तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.महाराष्ट्रात तुरीचे घटलेले उत्पादन पाहता सुमारे दीड महिन्यांपूूर्वी तुरीला प्रतिक्विंटल १० हजार रुपये असा भाव मिळाला होता. परंंतु आता शेतकऱ्यांची तूर बाजारात विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली असताना पुन्हा भाव पडल्याने शेतकरी हताश झाला आहे. (प्रतिनिधी)
तुरीच्या कवडीमोल भावाने शेतकरी गोंधळला
By admin | Updated: February 6, 2016 00:08 IST