शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

तुरीच्या कवडीमोल भावाने शेतकरी गोंधळला

By admin | Updated: February 6, 2016 00:08 IST

महिन्याभरापूर्वी दहा हजारांवर गेलेला तुरीचा भाव सरासरी आठ हजारापर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

भावात प्रचंड तफावत : माल येताच घसरणसचिन सुंदरकर अमरावतीमहिन्याभरापूर्वी दहा हजारांवर गेलेला तुरीचा भाव सरासरी आठ हजारापर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच तुरीची खरेदी कुणी करायची? यावर वादंग झाल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा आरोप होत आहे. बाजार समिती, व्यापारी आणि एफसीआयच्या वादामध्ये शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी पेरणीक्षेत्र ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर आहे. यात २०१५ च्या खरीप हंगामात १ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला. यंदा वातावरणातील बदलामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. या पार्श्वभूमिवर तुरीचे प्रतिक्विंटल दरही वाढले. मात्र, जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला वेगवेगळा भाव मिळत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अमरावती तालुक्यात तुरीचे १० हजार ४४६ हेक्टर इतके सर्वाधिक क्षेत्र आहे तर सर्वात कमी ५ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र धारणी तालुक्यात आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ६ लाख ८२ हजार १६३ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. त्यापैकी जिल्ह्यात तुरीचा पेरा सुमारे १ लाख हेक्टरच्या आसपास होता. परंतु वातावरणातील बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे तुरीच्या उत्पादनात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.रेकॉर्डब्रेक भाव गेले कुठे ?अमरावती : तुरीच्या उत्पादनासाठी अचानक पडलेली थंडी कारणीभूत असल्याचे निरीक्षणशेती तज्ञांनी नोंदविले आहे. महाराष्ट्रात एफसीआय व नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदी सुरु आहे. परंंतु तुरीच्या खरेदीत प्रचंड चढ-उतार जाणवू लागल्याने शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. अनेक ठिकाणी बाजार समितीचे संचालक मंडळ आणि तूर खरेदीदार समोरासमोर ठाकल्याने आंदोलनाची वेळ येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपूर्वी अचलपूर बाजार समितीत दरावरुन मोठा वाद झाला होता. तीन दिवसांपूर्वी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत उदभवलेल्या वादानंतर जिल्हा उपनिबंधकांनी तोडगा काढत तूर खरेदीची जबाबदारी बाजार समितीकडे सोपविली होती. कापसाप्रमाणेच रोख रकमेचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत नाफेडतर्फे शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा शुभारंंभ झाला आहे. काही सुरूवात होत आहे. यंदा निसर्गाच्या असमतोलामुळे सर्वत्र नापिकी असताना तुरीने काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा दिला तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.महाराष्ट्रात तुरीचे घटलेले उत्पादन पाहता सुमारे दीड महिन्यांपूूर्वी तुरीला प्रतिक्विंटल १० हजार रुपये असा भाव मिळाला होता. परंंतु आता शेतकऱ्यांची तूर बाजारात विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली असताना पुन्हा भाव पडल्याने शेतकरी हताश झाला आहे. (प्रतिनिधी)