शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

तुरीच्या कवडीमोल भावाने शेतकरी गोंधळला

By admin | Updated: February 6, 2016 00:08 IST

महिन्याभरापूर्वी दहा हजारांवर गेलेला तुरीचा भाव सरासरी आठ हजारापर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

भावात प्रचंड तफावत : माल येताच घसरणसचिन सुंदरकर अमरावतीमहिन्याभरापूर्वी दहा हजारांवर गेलेला तुरीचा भाव सरासरी आठ हजारापर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच तुरीची खरेदी कुणी करायची? यावर वादंग झाल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा आरोप होत आहे. बाजार समिती, व्यापारी आणि एफसीआयच्या वादामध्ये शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी पेरणीक्षेत्र ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर आहे. यात २०१५ च्या खरीप हंगामात १ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला. यंदा वातावरणातील बदलामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. या पार्श्वभूमिवर तुरीचे प्रतिक्विंटल दरही वाढले. मात्र, जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला वेगवेगळा भाव मिळत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अमरावती तालुक्यात तुरीचे १० हजार ४४६ हेक्टर इतके सर्वाधिक क्षेत्र आहे तर सर्वात कमी ५ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र धारणी तालुक्यात आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ६ लाख ८२ हजार १६३ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. त्यापैकी जिल्ह्यात तुरीचा पेरा सुमारे १ लाख हेक्टरच्या आसपास होता. परंतु वातावरणातील बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे तुरीच्या उत्पादनात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.रेकॉर्डब्रेक भाव गेले कुठे ?अमरावती : तुरीच्या उत्पादनासाठी अचानक पडलेली थंडी कारणीभूत असल्याचे निरीक्षणशेती तज्ञांनी नोंदविले आहे. महाराष्ट्रात एफसीआय व नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदी सुरु आहे. परंंतु तुरीच्या खरेदीत प्रचंड चढ-उतार जाणवू लागल्याने शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. अनेक ठिकाणी बाजार समितीचे संचालक मंडळ आणि तूर खरेदीदार समोरासमोर ठाकल्याने आंदोलनाची वेळ येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपूर्वी अचलपूर बाजार समितीत दरावरुन मोठा वाद झाला होता. तीन दिवसांपूर्वी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत उदभवलेल्या वादानंतर जिल्हा उपनिबंधकांनी तोडगा काढत तूर खरेदीची जबाबदारी बाजार समितीकडे सोपविली होती. कापसाप्रमाणेच रोख रकमेचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत नाफेडतर्फे शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा शुभारंंभ झाला आहे. काही सुरूवात होत आहे. यंदा निसर्गाच्या असमतोलामुळे सर्वत्र नापिकी असताना तुरीने काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा दिला तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.महाराष्ट्रात तुरीचे घटलेले उत्पादन पाहता सुमारे दीड महिन्यांपूूर्वी तुरीला प्रतिक्विंटल १० हजार रुपये असा भाव मिळाला होता. परंंतु आता शेतकऱ्यांची तूर बाजारात विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली असताना पुन्हा भाव पडल्याने शेतकरी हताश झाला आहे. (प्रतिनिधी)