शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

तुरीच्या कवडीमोल भावाने शेतकरी गोंधळला

By admin | Updated: February 6, 2016 00:08 IST

महिन्याभरापूर्वी दहा हजारांवर गेलेला तुरीचा भाव सरासरी आठ हजारापर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

भावात प्रचंड तफावत : माल येताच घसरणसचिन सुंदरकर अमरावतीमहिन्याभरापूर्वी दहा हजारांवर गेलेला तुरीचा भाव सरासरी आठ हजारापर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच तुरीची खरेदी कुणी करायची? यावर वादंग झाल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा आरोप होत आहे. बाजार समिती, व्यापारी आणि एफसीआयच्या वादामध्ये शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी पेरणीक्षेत्र ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर आहे. यात २०१५ च्या खरीप हंगामात १ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला. यंदा वातावरणातील बदलामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. या पार्श्वभूमिवर तुरीचे प्रतिक्विंटल दरही वाढले. मात्र, जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला वेगवेगळा भाव मिळत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अमरावती तालुक्यात तुरीचे १० हजार ४४६ हेक्टर इतके सर्वाधिक क्षेत्र आहे तर सर्वात कमी ५ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र धारणी तालुक्यात आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ६ लाख ८२ हजार १६३ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. त्यापैकी जिल्ह्यात तुरीचा पेरा सुमारे १ लाख हेक्टरच्या आसपास होता. परंतु वातावरणातील बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे तुरीच्या उत्पादनात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.रेकॉर्डब्रेक भाव गेले कुठे ?अमरावती : तुरीच्या उत्पादनासाठी अचानक पडलेली थंडी कारणीभूत असल्याचे निरीक्षणशेती तज्ञांनी नोंदविले आहे. महाराष्ट्रात एफसीआय व नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदी सुरु आहे. परंंतु तुरीच्या खरेदीत प्रचंड चढ-उतार जाणवू लागल्याने शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. अनेक ठिकाणी बाजार समितीचे संचालक मंडळ आणि तूर खरेदीदार समोरासमोर ठाकल्याने आंदोलनाची वेळ येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपूर्वी अचलपूर बाजार समितीत दरावरुन मोठा वाद झाला होता. तीन दिवसांपूर्वी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत उदभवलेल्या वादानंतर जिल्हा उपनिबंधकांनी तोडगा काढत तूर खरेदीची जबाबदारी बाजार समितीकडे सोपविली होती. कापसाप्रमाणेच रोख रकमेचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत नाफेडतर्फे शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा शुभारंंभ झाला आहे. काही सुरूवात होत आहे. यंदा निसर्गाच्या असमतोलामुळे सर्वत्र नापिकी असताना तुरीने काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा दिला तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.महाराष्ट्रात तुरीचे घटलेले उत्पादन पाहता सुमारे दीड महिन्यांपूूर्वी तुरीला प्रतिक्विंटल १० हजार रुपये असा भाव मिळाला होता. परंंतु आता शेतकऱ्यांची तूर बाजारात विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली असताना पुन्हा भाव पडल्याने शेतकरी हताश झाला आहे. (प्रतिनिधी)